शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
4
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
5
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
6
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
7
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
8
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
9
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
10
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
11
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
12
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
13
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
14
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
15
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
16
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
17
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
18
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
19
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
20
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
Daily Top 2Weekly Top 5

जागेसाठी शेणी ग्रामस्थांचा उपोषण लढा..!

By admin | Updated: December 13, 2014 23:53 IST

लातूर : अहमदपूर तालुक्यातील शेणी हे गावं. या गावच्या दलित वस्तीतील समाजमंदिराच्या जागेवर सवर्णांनी केलेल्या अतिक्रमणाविरुध्द मातंग समाजाच्या बांधवांनी ६३ दिवसाच्या उपोषणाचा लढा दिला.

लातूर : अहमदपूर तालुक्यातील शेणी हे गावं. या गावच्या दलित वस्तीतील समाजमंदिराच्या जागेवर सवर्णांनी केलेल्या अतिक्रमणाविरुध्द मातंग समाजाच्या बांधवांनी ६३ दिवसाच्या उपोषणाचा लढा दिला. धनदांडग्याच्या बाजूने उभ्या राहीलेल्या ग्रामपंचायतीविरुध्द दोन न्यायालयात निकाल जिंकला. तरीही जागा मिळत नसल्यावर पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसून ८३ व्या दिवशी आपली हक्काची जागा मिळविलीच. आता ज्या माणसाने या लढाईत पुढाकार घेतला त्या कार्यकर्त्याच्या घरावर केलेल्या अतिक्रमणाविरुध्द लढा सुरू केला आहे. या लढ्याच्या उपोषणाला २८९ दिवस पूर्ण होताहेत, हे विशेष. अहमदपूर तालुक्यातील शेणीच्या मातंग कार्यकर्त्याच्या लढ्याची गोष्टच निराळी. वस्तीतील मरिआईच्या मंदिराजवळ एक गायरानाची जागा. १९५४ पासून तिथे मातंग समाज रहायचा. तिथे तत्कालीन खा. जयवंतराव आवळे यांच्या निधीतून समाजमंदिराची मागणी केली. ती मंजूर झाली. पण ज्या जागेवर समाजमंदिर मंजूर झाले त्या जागेवर गावातील एका सवर्ण व्यक्तीने अतिक्रमण केले. ती जागा मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांनी निवेदने दिली. परंतु मिळाली नाहीच उलट सारा गाव अंगावर आला. कार्यकर्त्यांनी लातूरला येत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामकुमार रायवाडीकर यांच्यापुढ्यात गाऱ्हाणे मांडले. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा सल्ला देत स्वत: नियोजन केले. पहिले उपोषण दहाव्या दिवशी बीडीओच्या पत्रावर सुटले. परंतु पुन्हा प्रशासन अतिक्रमण केलेल्यांकडे आठ अ चा उतारा असल्याचे म्हणून थांबले. त्याला धक्का द्यायला पुन्हा उपोषण सुरु झाले. त्याला ४८ दिवस झाल्यावर अतिक्रमण करणारे न्यायालयात गेले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी आंदोलकांच्या बाजूने निर्णय दिला. तोही गाव आणि प्रशासनाने नाकारला. न्यायालयाच्या निकालानंतरही गावाने ग्रामसभेत निकाल काहीही येवो जागा ‘जैसे थे’ ठेवण्याचा ठराव घेतला. मग जिल्हा न्यायालयात अपिल केले गेले. तिथेही आंदोलक जिंकले. परंतु तरीही जागा रिकामी करुन देण्यास प्रशासन धजेना. मग आमरण उपोषण सुरू झाले. गाव, तालुका आणि जिल्ह्याचे अधिकारी दाद लागू देत नाहीत म्हंटल्यावर पार मुख्यमंत्री, राज्यपाल आणि राष्ट्रपती कार्यालयापर्यंत निवेदने देत न्यायालायाचा मान राखत न्यायाची विनंती केली. उपोषणाच्या ६३ व्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी तंबी देताच जागा रिकामी झाली. १ आॅगस्टला अण्णाभाऊ साठे जयंती करुन पंचशील ध्वज लावित आंनंदोत्सव केला. किती लोक दवाखान्यात नेले गेले. ते पुन्हा आंदोलनस्थळी आले. पोलिस आले, गुंड आले पण आंदोलन थांबले नाही. अखेर त्याचा जय झालाच. परंतु कार्यकर्त्यांच्या नशिबाचे भोग पहा, ज्या बळी बेले नामक कार्यकर्त्यांने हे प्रकरण तडीस नेण्यासाठी आटापिटा केला. प्रशासन आणि गावाने त्याच्या घरावर बुलडोझर फिरवून समाजमंदिरावर अतिक्रमण करणाऱ्याला तिथे बसविले. शेणीचे समाजबांधव मागे हटले नाहीत. पुन्हा आंदोलन सुरु केले. समाजमंदिराचे आंदोलन आता बळीच्या घरासाठी सुरू झाले. २६३ दिवस हे आंदोलन चालू आहे. बळी बेलेला गायरानावर वसलेले वडीलोपार्जित स्वत:चे हक्काचे घर पाहीजे आहे. या आंदोलनाच्या यशासाठी कार्यकर्ते आसुसले आहेत. (प्रतिनिधी) ४गेल्या सहा दिवसांपासून उपोषणास बसलेल्या बापूराव बेले, माधवराव बेले व राबनबी शेख यांची प्रकृती खालावली आहे़ शुक्रवारी रात्री नातेवाईकांनीच त्यांना रूग्णालयात दाखल केले़ पोलिस हद्दीच्या वादावरून प्रकृती खालावलेली असतानाही शिवाजीनगर व एमआयडीसी पोलिसांनी दुर्लक्ष केले़