शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024: कोलकाता हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
2
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
3
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
4
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
5
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
6
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
7
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
8
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
9
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
10
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
11
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
12
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
13
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
14
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
15
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
16
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
17
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
18
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
19
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
20
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका

मूग, उडदाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतातुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2018 2:17 PM

मूग, उडीद, बाजरी, मक्याचे पीक हाती लागले त्यालाही हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतातुर आहे.

औरंगाबाद : एकीकडे पावसाने दगा दिल्याने खरिपाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यातून जे मूग, उडीद, बाजरी, मक्याचे पीक हाती लागले त्यालाही हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतातुर आहे. सरकार हमीभावाची केवळ घोषणा करीत आहे. प्रत्यक्षात मात्र, हातात कमीच रक्कम मिळत असल्याने आता हमीभाव प्रत्यक्षात हातात मिळावा याची ‘हमी’ सरकारने घ्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

दोन महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने १४ खरीप पिकांच्या हमीभावात मोठी वाढ केली होती. यात मुगाचा हमीभाव १,४०० रुपये वाढवून ६,९७५ रुपये प्रतिक्विंटल केला आहे. बाजरीत ५२५ रुपये हमीभाव वाढवत १,९५० रुपये, तर मका २७५ रुपयांनी वाढवीत १,७०० रुपये प्रतिक्विंटल जाहीर करण्यात आला. दुसरीकडे पाऊस कमी पडल्याने मूग व उडदाचे उत्पादन ६० ते ७० टक्क्यांनी, तर बाजरीचे उत्पादन ४० टक्क्यांनी घटल्याचा अहवाल कृषी विभागाने  सरकारला पाठविला आहे.

अशा परिस्थितीत खरिपातील धान्यास हमीभावापेक्षा अधिक भाव मिळणे अपेक्षित होते; पण प्रत्यक्षात अडत बाजारात भाव वाढण्याऐवजी कमी भावात मूग, बाजरी, मका विकला जात आहे. जाधववाडी येथील कृ.उ.बा.च्या अडत बाजारात शेतकऱ्यांना गुरुवारी मूग ४,५०० ते ५,५०० रुपये, बाजरी १,७५० ते १,८५० रुपये, तर मका १,००० ते १,०५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. हमीभावापेक्षा मुगात प्रतिक्विंटलमागे १,४७५ ते २,४७५ रुपये कमी भाव मिळत आहे. बाजरीत क्विंटलमागे १०० ते १५० रुपये, तर मक्यामध्ये ७०० रुपये कमी भाव मिळत आहे. नुसते हमी भाव जाहीर करून सरकारने मोकळे होऊ नये, तर प्रत्यक्षात हमी भाव मिळेल याची पर्यायी व्यवस्थाही करावी, अशी मागणी शेतकरी सखाराम वाघमारे, वैभव तांबे, सदानंद वैष्णव यांनी केली. 

शेतकरी, अडत व्यापारी म्हणतात...हमीभावापेक्षा १५० रुपये कमी भाव मिळाला आज ५ गोणी बाजरी विक्रीला आणली. अडतमध्ये १,८०० रुपये क्विंटलने बाजरी विक्री झाली. प्रत्यक्षात हमीभाव १,९५० रुपये एवढा आहे. सरकारने हमीभाव मिळावा यासाठी पर्यायी व्यवस्था करावी. -पाराजी पचलोरे (शेतकरी, कोलठाणवाडी)

हमीभावात दर्जा ठरवावासरकार एफएक्यू दर्जाच्या शेतीमालास हमीभाव जाहीर करीत असते. मात्र, मध्यम व हलक्या प्रतीच्या शेतीमालाचे हमीभाव ठरवून देत नाही. यामुळे खरेदीत अडचणी येत आहेत. सरकारने एका शेतीमालाचे दर्जानुसार तीन हमीभाव जाहीर करावेत. -कैलास निकम, अडत व्यापारी

मध्यप्रदेशच्या धर्तीवर योजना लागू करावीमध्यप्रदेश सरकार हमीभाव जाहीर करते व खुल्या बाजारात हमीभावापेक्षा कमी दरात अडत्यांनी धान्य खरेदी केले, तर भावांतर योजनेंतर्गत येणारी तफावत सरकार थेट संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करते. यामुळे सरकारी यंत्रणेवरचा मोठा खर्च वाचतो, भ्रष्टाचार होत नाही. शेतकऱ्यांना हमीभावही मिळतो, तसेच ज्या धान्य, कडधान्याला हमीभावापेक्षा जास्त भाव मिळाला. त्यांना तफावत देण्याची गरज नाही. याच धर्तीवर महाराष्ट्रातही भावांतर योजना जाहीर करावी. -कन्हैयालाल जैस्वाल, अध्यक्ष, अडत व्यापारी संघटना

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रState Governmentराज्य सरकार