शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

विनामशागतीचे शेती तंत्रज्ञान छत्रपती संभाजीनगरच्या शेतकऱ्यांनी स्वीकारले, काय आहेत फायदे ?

By बापू सोळुंके | Updated: April 4, 2024 19:32 IST

यामुळे पिकाला पोषक असे सेंद्रिय कर्ब आणि जीवाणूंची संख्या वाढण्यासाठी जमिनीची मशागत करू नका, असे सांगणारे एसआरटी तंत्रज्ञान दहा वर्षांपूर्वी कोकणात भातशेतीमध्ये वापरले जाऊ लागले.

छत्रपती संभाजीनगर : कोकणात भातशेतीसाठी वापरलेले जाणारे विनामशागतीचे तंत्रज्ञान सगुणा राइस तंत्रज्ञान (एसआरटी) आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरीही स्वीकारू लागले आहेत. जिल्ह्यातील बाराशे शेतकऱ्यांनी गतवर्षी तब्बल अडीच हजार एकर शेती विनामशागतीची केली.

पारंपरिक पिकांच्या तुलनेत या शेतीतून मिळणारे उत्पादन वाढल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शिवाय नांगरणे, वखरणे, कोळपणे आणि निंदणे इ.वर होणारा खर्चही कमी झाल्याने हे तंत्रज्ञान उपयुक्त असल्याचा दावा कृषी अधिकारी करतात. कोणत्याही पिकाची चांगली वाढ होण्यासाठी जमिनीचा पोत चांगला असावा लागतो. पोत उत्तम राहण्यासाठी जमिनीत सेंद्रिय कर्ब, गांडूळ, जीवाणूंची चांगली वाढ होणे आवश्यक असते. यासाठी जमिनीतच तण, पिकांची मुळे, खुंट राहू देणे, काडी, कचरा, गवत सडू देणे आवश्यक असते. मात्र आपल्याकडे दरवर्षी शेतीची नांगरणे, वखरणी, रोटाव्हेटर करणे इ. मशागतीची कामे करण्यात येतात.

खरीप हंगामापूर्वी शेतकरी शेतात साफसफाई करतात. यामुळे जमिनीमध्ये जीवाणूंची वाढ होत नाही. यामुळे पिकाला पोषक असे सेंद्रिय कर्ब आणि जीवाणूंची संख्या वाढण्यासाठी जमिनीची मशागत करू नका, असे सांगणारे एसआरटी तंत्रज्ञान दहा वर्षांपूर्वी कोकणात भातशेतीमध्ये वापरले जाऊ लागले. गादी वाफा पद्धतीने शेती करावी. गादी वाफ्यात पिकाची लागवड, पेरणी करावी. दरवर्षी पीक बुडापासून कापून घ्यावे, पण पिकाची मुळे, खुंट, खोड जमिनीतच राहू द्यावी, असे हे तंत्रज्ञान सांगते. २०१९ रोजी कन्नड तालुक्यातील टापरगाव येथील मोजक्याच शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून विनामशागतीची शेती सुरू केली. त्यांना या शेतीतून मिळणारे उत्पादन वाढले आणि खर्चही कमी झाला. कन्नडसह फुलंब्री, सिल्लोड, साेयगाव, गंगापूर, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर आणि पैठण तालुक्यातील एकूण बाराशे शेतकऱ्यांनी हे तंत्र स्वीकारले. ही माहिती एसआरटी तंत्रज्ञानाचे मार्गदर्शक तथा निवृत्त कृषी अधिकारी सुरेशसिंग बेडवाल यांनी दिली.

मजुरावरील खर्चही कमीआमची दहा एकर शेती चार वर्षांपासून विनामशागतीची आहे. पारंपरिक शेतीसाठी नांगरणे, वखरणे, लागवडीनंतर कोळपणी आणि निंदण यावर होणारा खर्च या तंत्रज्ञानात वाचतो. तणनाशकाचा वापर करतो. यामुळे मजुरावरील खर्चही कमी झाला. जमिनीत सेंद्रिय कर्ब टिकून राहत असल्याने उत्पादनात दुपटीने वाढ झाली आहे.- प्रभाकर सुसलोदे, शेतकरी, रुईखेडा, ता. कन्नड

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र