शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

विनामशागतीचे शेती तंत्रज्ञान छत्रपती संभाजीनगरच्या शेतकऱ्यांनी स्वीकारले, काय आहेत फायदे ?

By बापू सोळुंके | Updated: April 4, 2024 19:32 IST

यामुळे पिकाला पोषक असे सेंद्रिय कर्ब आणि जीवाणूंची संख्या वाढण्यासाठी जमिनीची मशागत करू नका, असे सांगणारे एसआरटी तंत्रज्ञान दहा वर्षांपूर्वी कोकणात भातशेतीमध्ये वापरले जाऊ लागले.

छत्रपती संभाजीनगर : कोकणात भातशेतीसाठी वापरलेले जाणारे विनामशागतीचे तंत्रज्ञान सगुणा राइस तंत्रज्ञान (एसआरटी) आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरीही स्वीकारू लागले आहेत. जिल्ह्यातील बाराशे शेतकऱ्यांनी गतवर्षी तब्बल अडीच हजार एकर शेती विनामशागतीची केली.

पारंपरिक पिकांच्या तुलनेत या शेतीतून मिळणारे उत्पादन वाढल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शिवाय नांगरणे, वखरणे, कोळपणे आणि निंदणे इ.वर होणारा खर्चही कमी झाल्याने हे तंत्रज्ञान उपयुक्त असल्याचा दावा कृषी अधिकारी करतात. कोणत्याही पिकाची चांगली वाढ होण्यासाठी जमिनीचा पोत चांगला असावा लागतो. पोत उत्तम राहण्यासाठी जमिनीत सेंद्रिय कर्ब, गांडूळ, जीवाणूंची चांगली वाढ होणे आवश्यक असते. यासाठी जमिनीतच तण, पिकांची मुळे, खुंट राहू देणे, काडी, कचरा, गवत सडू देणे आवश्यक असते. मात्र आपल्याकडे दरवर्षी शेतीची नांगरणे, वखरणी, रोटाव्हेटर करणे इ. मशागतीची कामे करण्यात येतात.

खरीप हंगामापूर्वी शेतकरी शेतात साफसफाई करतात. यामुळे जमिनीमध्ये जीवाणूंची वाढ होत नाही. यामुळे पिकाला पोषक असे सेंद्रिय कर्ब आणि जीवाणूंची संख्या वाढण्यासाठी जमिनीची मशागत करू नका, असे सांगणारे एसआरटी तंत्रज्ञान दहा वर्षांपूर्वी कोकणात भातशेतीमध्ये वापरले जाऊ लागले. गादी वाफा पद्धतीने शेती करावी. गादी वाफ्यात पिकाची लागवड, पेरणी करावी. दरवर्षी पीक बुडापासून कापून घ्यावे, पण पिकाची मुळे, खुंट, खोड जमिनीतच राहू द्यावी, असे हे तंत्रज्ञान सांगते. २०१९ रोजी कन्नड तालुक्यातील टापरगाव येथील मोजक्याच शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून विनामशागतीची शेती सुरू केली. त्यांना या शेतीतून मिळणारे उत्पादन वाढले आणि खर्चही कमी झाला. कन्नडसह फुलंब्री, सिल्लोड, साेयगाव, गंगापूर, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर आणि पैठण तालुक्यातील एकूण बाराशे शेतकऱ्यांनी हे तंत्र स्वीकारले. ही माहिती एसआरटी तंत्रज्ञानाचे मार्गदर्शक तथा निवृत्त कृषी अधिकारी सुरेशसिंग बेडवाल यांनी दिली.

मजुरावरील खर्चही कमीआमची दहा एकर शेती चार वर्षांपासून विनामशागतीची आहे. पारंपरिक शेतीसाठी नांगरणे, वखरणे, लागवडीनंतर कोळपणी आणि निंदण यावर होणारा खर्च या तंत्रज्ञानात वाचतो. तणनाशकाचा वापर करतो. यामुळे मजुरावरील खर्चही कमी झाला. जमिनीत सेंद्रिय कर्ब टिकून राहत असल्याने उत्पादनात दुपटीने वाढ झाली आहे.- प्रभाकर सुसलोदे, शेतकरी, रुईखेडा, ता. कन्नड

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र