शहरं
Join us  
Trending Stories
1
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
2
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
3
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
4
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
5
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
6
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
7
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
8
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
9
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
10
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
11
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
12
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
13
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
14
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
15
Hardik-Natasa Divorce : हार्दिक पांड्याबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांवर नताशाने दोन शब्दात दिलं उत्तर, म्हणाली...
16
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
17
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
18
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
19
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
20
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल

शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच; अस्मानी संकट, कर्जबाजारीपणावर उपाय सापडेनात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2019 3:39 PM

कुठे तरी दोन पैसे हाती येण्याची शक्यता असतानाच शेतकऱ्यांची झोळी पावसाने रिकामी केली.

औरंगाबाद : मराठवाड्यात आॅक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने खरीप हंगामाची वाट लागली. कुठे तरी दोन पैसे हाती येण्याची शक्यता असतानाच शेतकऱ्यांची झोळी पावसाने रिकामी केली. अस्मानी संकट, नैराश्य आणि कर्जबाजारीपणामुळे महिनाभरात ५९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ५९ पैकी ४६ प्रकरणे चौकशीअभावी प्रलंबित आहेत. यामध्ये १२ प्रकरणे पात्र तर एका प्रकरणाला सरकारी चौकशी समितीने अपात्र ठरविले.  

आॅक्टोबरअखेरपर्यंत विभागात ७१५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आॅक्टोबरमध्ये झालेल्या परतीच्या पावसामुळे काढणीस आलेली मका, सोयाबीन, डाळी, कापूस पिकांची माती केली. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले. या सरत्या दशकात तीन वर्षे पाऊस बऱ्यापैकी झाला. नापिकी आणि दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत गेला. कोरडा दुष्काळ आणि आता ओला दुष्काळ यामुळे नैराश्य आलेल्या शेतकऱ्यांना कर्ज फेडण्याची विवंचना शेतकऱ्यांसमोर आहे. ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक १४ आत्महत्या परभणी जिल्ह्यात झाल्या असून, औरंगाबाद ७, जालना ७, हिंगोली २, नांदेड ७, बीड १३, लातूर ६ तर उस्मानाबाद जिल्ह्यात ३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 

३१ आॅक्टोबरपर्यंतची आकडेवारी अशी जिल्हा    आत्महत्याऔरंगाबाद    १०७जालना    ८०परभणी    ७२हिंगोली    २८नांदेड    ९३बीड    १५८लातूर    ७८उस्मानाबाद    ९९एकूण    ७१५

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याagricultureशेतीMarathwadaमराठवाडा