शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेशाच्या नुसत्याच फेºया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:46 IST

यंदा महापालिका कार्यक्षेत्रात अकरावीसाठी राबविण्यात आलेली आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया अयशस्वी ठरली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : यंदा महापालिका कार्यक्षेत्रात अकरावीसाठी राबविण्यात आलेली आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया अयशस्वी ठरली आहे. आतापर्यंत प्रवेशाच्या सहा फेºया पूर्ण झाल्या, तरीही तब्बल ६ हजार जागा रिकाम्याच राहिल्या आहेत. आता उद्यापासून दहावी परीक्षेत ‘एटीकेटी’ मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी सातव्या प्रवेश फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.जून महिन्यापासून अकरावीसाठी औरंगाबादेत केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत सुरुवातील प्रवेशाच्या चार फेºया राबविण्यात आल्या. त्यानंतर विशेष फेरी राबविण्यात आली, तरीही विद्यार्थ्यांचा पाहिजे तेवढा प्रतिसाद न मिळाल्यामुळे ‘प्रथम येणारास, प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर आधारित प्रवेश फेरी राबविण्यात आली. या सहाही फेºयांमध्ये २२ हजार जागांपैकी १६ हजार विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतल्याचा दावा शिक्षण उपसंचालक कार्यालयाने केला आहे. दहावी फेरपरीक्षेचा निकाल २९ आॅगस्ट रोजी जाहीर झाला. यामध्ये जिल्ह्यात १ हजार १९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ४ ते ७ सप्टेंबरदरम्यान आॅनलाइन नोंदणीची मुदत होती. उद्या ९ ते ११ सप्टेंबरपर्यंत या विद्यार्थ्यांना अ‍ॅलॉट झालेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेता येईल. तथापि, यंदा आॅनलाइन प्रवेशाचा प्रयोग पार फसला आहे. शहरातील महाविद्यालयांनीही अर्थ लाभाच्या उद्देशाने अगोदर मॅनेजमेंट कोट्यातील पूर्ण जागा भरण्याचा प्रयत्न केला. यामध्ये महाविद्यालयांनी विनाअनुदानित तसेच पसंतीच्या विषयासाठी सेल्फ फायनान्स जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिले. त्यामुळे आजघडीला अनुदानित तुकड्यांवरील मोठ्या प्रमाणात जागांवर प्रवेशच झाले नाहीत. परिणामी, या तुकड्यावर कार्यरत शिक्षक हे अतिरिक्त होण्याच्या भीतीपोटी अस्वस्थ आहेत. यामध्ये शहरातील अनेक नामांकित महाविद्यालयांचा समावेश आहे.दुसरीकडे, पाहिजे तो विषय किंवा हवे त्या महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणे पसंत केले.आॅनलाइन प्रवेशाला विलंब लागणार, या भीतीपोटी ग्रामीण भागातून अथवा दुसºया जिल्ह्यातून अनेक विद्यार्थी शहरात आलेच नाहीत. त्यामुळे आज सप्टेंबर महिन्यातही अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही.