शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी खरी? EXIT POLL अंदाजानुसार राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव
2
इराण-अमेरिका युद्ध टळले? सैनिक कतारमधील अमेरिकन लष्करी तळावर परतले; इराणनेही हवाई क्षेत्र उघडले
3
तपोवनाचा मुद्दा, ठाकरे बंधूंची सभा; नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेनेला किती जागा मिळणार?
4
Maharashtra Municipal Election Exit Polls : जयंत पाटलांच्या सांगलीत, शिंदेच्या सोलापुरात कोण मारणार बाजी ? एक्झिट पोलचे अंदाज वाचा
5
EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?
6
अमेरिका-इराणमध्ये तणाव, इराणने हवाई क्षेत्र केले बंद, एअर इंडिया आणि इंडिगोने ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी केली जारी
7
भारतीय कोस्ट गार्डची कारवाई; भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नौकेसह 9 ताब्यात
8
Municipal Election 2026 Exit Poll Live: मुंबईत ठाकरेंना झटका बसणार, युतीला किती जागा मिळणार?
9
PMC Election Exit Poll 2026: पुण्यात भाजपाच राहणार की, राष्ट्रवादी बसणार सत्तेत, कौल कुणाला?
10
Pune Election: मतदार येरवडा तुरुंगात, पण मतदान केंद्रावर त्याच्या नावावर झालं मतदान
11
मोठा दणका! निवडणूक ड्युटीवर 'दांडी' मारणाऱ्या १५५ कर्मचाऱ्यांवर छत्रपती संभाजीनगरात गुन्हा
12
BMC Election 2026 Exit Poll: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा एक्झिट पोल
13
'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं
14
TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?
15
iPhone: आणखी स्वस्त झाला आयफोन; रिपब्लिक सेलआधीच मोठा धमाका! कुठं मिळतोय इतका स्वस्त?
16
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
17
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
18
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
19
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
20
मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद शहरातील दुर्लक्षित वारसा स्थळांची सर्वांकडूनच उपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 15:09 IST

निजामाचा, मुगलांचा इतिहास सांगणाऱ्या अनेक खाणाखुणा या शहरात अजूनही तग धरून आहेत

ठळक मुद्देजागतिक वारसा सप्ताहाच ेनिमित्त निजाम, मुगलांचा इतिहास सांगणाऱ्या वास्तूच्या भग्न खाणाखुणाही नामशेष होण्याच्या मार्गावर

औरंगाबाद : बीबी- का- मकबरा, पाणचक्की व बावन दरवाजे, फक्त एवढ्यापुरतीच शहरातील वारसा स्थळे मर्यादित नाहीत. निजामाचा, मुगलांचा इतिहास सांगणाऱ्या अनेक खाणाखुणा या शहरात अजूनही तग धरून आहेत; पण या दुर्लक्षित वारसा स्थळांची कायमच उपेक्षा होत आली असून, दि.१९ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या जागतिक वारसा सप्ताहानिमित्त तरी या स्थळांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले जावे, अशी अपेक्षा इतिहासप्रेमींनी व्यक्त केली.

जनसामान्यांमध्ये प्राचीन वारसा स्थळांबद्दल जागृती निर्माण करणे, भावी पिढ्यांमध्ये सांस्कृतिक वारसा स्थळांविषयी आस्था निर्माण करणे, या उद्देशाने भारत सरकारतर्फे दि.१९ ते २५ नोव्हेंबर या काळात जागतिक वारसा सप्ताह साजरा केला जातो. या काळात अनेक संस्था आणि शासनातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र, हे कार्यक्रम केवळ प्रसिद्ध वारसा स्थळांपर्यंतच मर्यादित राहतात.

गोगाबाबा टेकडी परिसरात अशीच एक बुरुजासारखी वाटणारी ऐतिहासिक वास्तू (छत्री) असून, आता ती शेवटच्या घटका मोजत आहे. वर गोल घुमट आणि नक्षीदार खांब, अशा स्वरूपाची ही वास्तू आजही इतिहास अभ्यासकांसाठी अभ्यासाचा विषय आहे. या वास्तूबद्दल कोणतीच ठोस माहिती उपलब्ध नाही; पण जुन्या काळी बाहेरून शहरात येण्यासाठी जे रस्ते असायचे त्या प्रत्येक रस्त्यावर असे बुरूज उभे होते. त्यांना त्या काळातील  चौकशी कक्ष, असेही म्हणता येईल, असे काही अभ्यासकांचे मत आहे.

शहरवासीयांची अनास्था

केंद्रीय पुरातत्व विभाग, औरंगाबादचे उपअधीक्षक शिवकांत वाजपेयी या वारसा स्थळाबद्दल सांगताना म्हणाले की, केंद्रीय पुरातत्व विभागाकडे केवळ मकबरा, रंगीन दरवाजा, मकाई दरवाजा आणि दिल्ली दरवाजा या वास्तू आहेत. औरंगाबाद शहरात सर्वत्र अशा ऐतिहासिक वास्तू विखुरलेल्या असून, काहींचे संवर्धन महानगरपालिकेच्या हद्दीत आहे, तर अनेक वास्तूंची साधी नोंदही कोणाकडे नाही. स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात नव्या वास्तू उभारताना जुन्या वास्तूंचे जतन करणे आवश्यक आहे. अधिकारी येतात आणि जातात. मात्र, या शहरातील नागरिकांना या वास्तंूबद्दल अनास्था असणे हे मोठे दुर्दैव आहे. आपल्या कुटुंबातील ज्येष्ठांप्रमाणे या वास्तूंचे संवर्धन शहरवासीयांनी करावे, असेही त्यांनी सूचित के ले. 

टॅग्स :Archaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणAurangabadऔरंगाबादtourismपर्यटन