शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

औरंगाबाद शहरातील दुर्लक्षित वारसा स्थळांची सर्वांकडूनच उपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 15:09 IST

निजामाचा, मुगलांचा इतिहास सांगणाऱ्या अनेक खाणाखुणा या शहरात अजूनही तग धरून आहेत

ठळक मुद्देजागतिक वारसा सप्ताहाच ेनिमित्त निजाम, मुगलांचा इतिहास सांगणाऱ्या वास्तूच्या भग्न खाणाखुणाही नामशेष होण्याच्या मार्गावर

औरंगाबाद : बीबी- का- मकबरा, पाणचक्की व बावन दरवाजे, फक्त एवढ्यापुरतीच शहरातील वारसा स्थळे मर्यादित नाहीत. निजामाचा, मुगलांचा इतिहास सांगणाऱ्या अनेक खाणाखुणा या शहरात अजूनही तग धरून आहेत; पण या दुर्लक्षित वारसा स्थळांची कायमच उपेक्षा होत आली असून, दि.१९ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या जागतिक वारसा सप्ताहानिमित्त तरी या स्थळांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले जावे, अशी अपेक्षा इतिहासप्रेमींनी व्यक्त केली.

जनसामान्यांमध्ये प्राचीन वारसा स्थळांबद्दल जागृती निर्माण करणे, भावी पिढ्यांमध्ये सांस्कृतिक वारसा स्थळांविषयी आस्था निर्माण करणे, या उद्देशाने भारत सरकारतर्फे दि.१९ ते २५ नोव्हेंबर या काळात जागतिक वारसा सप्ताह साजरा केला जातो. या काळात अनेक संस्था आणि शासनातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र, हे कार्यक्रम केवळ प्रसिद्ध वारसा स्थळांपर्यंतच मर्यादित राहतात.

गोगाबाबा टेकडी परिसरात अशीच एक बुरुजासारखी वाटणारी ऐतिहासिक वास्तू (छत्री) असून, आता ती शेवटच्या घटका मोजत आहे. वर गोल घुमट आणि नक्षीदार खांब, अशा स्वरूपाची ही वास्तू आजही इतिहास अभ्यासकांसाठी अभ्यासाचा विषय आहे. या वास्तूबद्दल कोणतीच ठोस माहिती उपलब्ध नाही; पण जुन्या काळी बाहेरून शहरात येण्यासाठी जे रस्ते असायचे त्या प्रत्येक रस्त्यावर असे बुरूज उभे होते. त्यांना त्या काळातील  चौकशी कक्ष, असेही म्हणता येईल, असे काही अभ्यासकांचे मत आहे.

शहरवासीयांची अनास्था

केंद्रीय पुरातत्व विभाग, औरंगाबादचे उपअधीक्षक शिवकांत वाजपेयी या वारसा स्थळाबद्दल सांगताना म्हणाले की, केंद्रीय पुरातत्व विभागाकडे केवळ मकबरा, रंगीन दरवाजा, मकाई दरवाजा आणि दिल्ली दरवाजा या वास्तू आहेत. औरंगाबाद शहरात सर्वत्र अशा ऐतिहासिक वास्तू विखुरलेल्या असून, काहींचे संवर्धन महानगरपालिकेच्या हद्दीत आहे, तर अनेक वास्तूंची साधी नोंदही कोणाकडे नाही. स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात नव्या वास्तू उभारताना जुन्या वास्तूंचे जतन करणे आवश्यक आहे. अधिकारी येतात आणि जातात. मात्र, या शहरातील नागरिकांना या वास्तंूबद्दल अनास्था असणे हे मोठे दुर्दैव आहे. आपल्या कुटुंबातील ज्येष्ठांप्रमाणे या वास्तूंचे संवर्धन शहरवासीयांनी करावे, असेही त्यांनी सूचित के ले. 

टॅग्स :Archaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणAurangabadऔरंगाबादtourismपर्यटन