शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद शहरातील दुर्लक्षित वारसा स्थळांची सर्वांकडूनच उपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 15:09 IST

निजामाचा, मुगलांचा इतिहास सांगणाऱ्या अनेक खाणाखुणा या शहरात अजूनही तग धरून आहेत

ठळक मुद्देजागतिक वारसा सप्ताहाच ेनिमित्त निजाम, मुगलांचा इतिहास सांगणाऱ्या वास्तूच्या भग्न खाणाखुणाही नामशेष होण्याच्या मार्गावर

औरंगाबाद : बीबी- का- मकबरा, पाणचक्की व बावन दरवाजे, फक्त एवढ्यापुरतीच शहरातील वारसा स्थळे मर्यादित नाहीत. निजामाचा, मुगलांचा इतिहास सांगणाऱ्या अनेक खाणाखुणा या शहरात अजूनही तग धरून आहेत; पण या दुर्लक्षित वारसा स्थळांची कायमच उपेक्षा होत आली असून, दि.१९ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या जागतिक वारसा सप्ताहानिमित्त तरी या स्थळांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले जावे, अशी अपेक्षा इतिहासप्रेमींनी व्यक्त केली.

जनसामान्यांमध्ये प्राचीन वारसा स्थळांबद्दल जागृती निर्माण करणे, भावी पिढ्यांमध्ये सांस्कृतिक वारसा स्थळांविषयी आस्था निर्माण करणे, या उद्देशाने भारत सरकारतर्फे दि.१९ ते २५ नोव्हेंबर या काळात जागतिक वारसा सप्ताह साजरा केला जातो. या काळात अनेक संस्था आणि शासनातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र, हे कार्यक्रम केवळ प्रसिद्ध वारसा स्थळांपर्यंतच मर्यादित राहतात.

गोगाबाबा टेकडी परिसरात अशीच एक बुरुजासारखी वाटणारी ऐतिहासिक वास्तू (छत्री) असून, आता ती शेवटच्या घटका मोजत आहे. वर गोल घुमट आणि नक्षीदार खांब, अशा स्वरूपाची ही वास्तू आजही इतिहास अभ्यासकांसाठी अभ्यासाचा विषय आहे. या वास्तूबद्दल कोणतीच ठोस माहिती उपलब्ध नाही; पण जुन्या काळी बाहेरून शहरात येण्यासाठी जे रस्ते असायचे त्या प्रत्येक रस्त्यावर असे बुरूज उभे होते. त्यांना त्या काळातील  चौकशी कक्ष, असेही म्हणता येईल, असे काही अभ्यासकांचे मत आहे.

शहरवासीयांची अनास्था

केंद्रीय पुरातत्व विभाग, औरंगाबादचे उपअधीक्षक शिवकांत वाजपेयी या वारसा स्थळाबद्दल सांगताना म्हणाले की, केंद्रीय पुरातत्व विभागाकडे केवळ मकबरा, रंगीन दरवाजा, मकाई दरवाजा आणि दिल्ली दरवाजा या वास्तू आहेत. औरंगाबाद शहरात सर्वत्र अशा ऐतिहासिक वास्तू विखुरलेल्या असून, काहींचे संवर्धन महानगरपालिकेच्या हद्दीत आहे, तर अनेक वास्तूंची साधी नोंदही कोणाकडे नाही. स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात नव्या वास्तू उभारताना जुन्या वास्तूंचे जतन करणे आवश्यक आहे. अधिकारी येतात आणि जातात. मात्र, या शहरातील नागरिकांना या वास्तंूबद्दल अनास्था असणे हे मोठे दुर्दैव आहे. आपल्या कुटुंबातील ज्येष्ठांप्रमाणे या वास्तूंचे संवर्धन शहरवासीयांनी करावे, असेही त्यांनी सूचित के ले. 

टॅग्स :Archaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणAurangabadऔरंगाबादtourismपर्यटन