शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

‘मुल्क का बच्चा बच्चा जाग चुका है’ धरणे आंदोलनात गगनभेदी घोषणांनी दिल्लीगेट पुन्हा दणाणला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 5:03 PM

जुलमी राजवटीने ‘मुल्क का बच्चा बच्चा जाग चुका है’ आणखी अन्याय सहन करणार नाही, असा निर्वाणीचा इशाराही महिलांनी दिला.

ठळक मुद्देसीएए, एनपीआर, एनआरसी विरोधात आंदोलन मुस्लिम नुमार्इंदा कौन्सिलतर्फे धरणे आंदोलन

औरंगाबाद : संविधान नष्ट करण्याचा डाव केंद्र शासनाने आखला आहे. संविधान नसेल तर देश राहणार नाही, हुकूमशाही सुरू होईल. देश वाचविण्यासाठी अल्पसंख्याक समाज आज रस्त्यावर उतरला आहे. जोपर्यंत केंद्र शासन जुलमी कायदे मागे घेणार नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार आज व्यक्त करण्यात आला. जुलमी राजवटीने ‘मुल्क का बच्चा बच्चा जाग चुका है’ आणखी अन्याय सहन करणार नाही, असा निर्वाणीचा इशाराही महिलांनी दिला.

सीएए, एनपीआर, एनआरसी विरोधात आज महिलांतर्फे दिल्लीगेट येथे मुस्लिम नुमार्इंदा कौन्सिलतर्फे धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. शहराच्या इतिहासात प्रथमच मुस्लिम महिला एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरल्या. यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. व्यासपीठावर पुण्याहून आलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सुषमा अंधारे, जयश्री शिर्के, इशरत हाश्मी, शबाना आयमी, खैमुन्निसा बेगम, वसुधा कल्याणकर, प्रा. मोनिसा बुशरा यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी मार्गदर्शन करताना सुक्षमा अंधारे यांनी नमूद केले की, संविधानात इंडिया असे देशाला संबोधित केले आहे. मुस्लिम बांधवांनी यापुढे हिंदुस्तान असा शब्दप्रयोग अजिबात करू नये. संविधानाने एका धर्मनिरपेक्ष देशाची स्थापना केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा देशाला हिंदुराष्टÑ बनविण्याचे स्वप्न पाहत आहेत. तडीपार, गोध्रा प्रकरणात ज्यांच्यावर आरोप झाले त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये. त्यांच्याकडून सुरू असलेला अन्याय, अत्याचार सहन करू नका. बहुमताच्या बळावर ते काहीही करू इच्छित आहेत; पण असे काहीही होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.शबाना आयमी यांनी नमूद केले की, अल्पसंख्याक समाजावर जेवढा अन्याय कराल तेवढ्याच ताकदीने हा समाज उभा राहील. फिरौन हा राजाही नेस्तनाबूद झाला. नवीन राष्टÑ घडविण्याची वेळ आल्याचेही त्यांनी सांगितले. खैमुन्निसा बेगम यांनी सविस्तरपणे मार्गदर्शन करताना सांगितले की, मुस्लिम बांधव, महिला देशाला वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरल्या आहेत. शाहिनबाग, जेएनयूच्या आंदोलनाला सलाम केला पाहिजे. देशाला गुलामीकडे नेणाऱ्यांचे मनसुबे कधीच यशस्वी होणार नाहीत. या देशातील नागरिकांना आपले नागरिकत्व सिद्ध करण्यास केंद्र शासन सांगत आहे. हा देशातील १३० कोटी जनतेचा अपमान आहे. जोपर्यंत केंद्र शासन जुलमी कायदे मागे घेणार नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे. आपले अपयश झाकण्यासाठी केंद्र शासन वादग्रस्त निर्णय घेत आहे.

हम भी देखेंगे...वसुधा कल्याणकर यांनी फैज अहेमद फैज यांची लोकप्रिय कविता सादर केली. या कवितेच्या प्रत्येक ओळीवर उपस्थित हजारो महिलांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला. ‘हम भी देखेंगे’ही कविता त्यांनी सादर केली.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकAurangabadऔरंगाबादagitationआंदोलन