शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

औरंगाबाद शहरात समलिंगी मित्रमंडळाची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 11:33 PM

शहरात समलिंगी मित्रमंडळाची स्थापना करण्यात आली असून, या उपक्र माचे पालकत्व लोकनीती मंचने स्वीकारले आहे, अशी माहिती मंचचे श्रीकांत उमरीकर यांनी कळविली.

औरंगाबाद : शहरात समलिंगी मित्रमंडळाची स्थापना करण्यात आली असून, या उपक्र माचे पालकत्व लोकनीती मंचने स्वीकारले आहे, अशी माहिती मंचचे श्रीकांत उमरीकर यांनी कळविली.समलिंगी संबंधांबाबत कलम ३७७ मधील फौजदारी गुन्ह्याचे कलम काढण्याचा ऐतिहासिक निर्णय संसदेने घेतला. त्याला एक वर्ष पूर्ण होत आहे, तसेच देशातील पहिला समलिंगी गौरव मोर्चा कोलकत्यात निघाला, त्या घटनेला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. या दोन बाबींचे औचित्य साधून शहरातील २५ समलिंगी एकत्र आले आहेत. त्यांनी औरंगाबाद समलिंगी मित्रमंडळ (एल.जी.बी.टी.फे्रंडस् क्लब, औरंगाबाद) ची स्थापना केली आहे. समलिंगींच्या समस्या जाणून घेणे, त्यांना मानसिक आधार देणे, त्यांना समाजात मिसळण्यासाठी सहकार्य करण्याच्या उद्देशाने हे मंडळ स्थापन करण्यात आले आहे. शहरात ५०० च्या आसपास समलिंगींचा आकडा असल्याचे कळविण्यात आले आहे. समलिंगींनी या मंडळात सहभागी होण्यासाठी फेसबुक, ई-मेल आयडी देण्यात आला आहे. समलिंगींना समाजात प्रकट होणे अवघड जाते. यासाठी समलिंगींनी उमरीकर यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादGay Marriageसमलिंगी विवाह