शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजकांमध्ये ‘कही खुशी, कही गम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : अर्थसंकल्पाचे अवलोकन केल्यानंतर उद्योजकांपैकी काहींच्या मते आजचा अर्थसंकल्प संतुलित आहे, तर काहींच्या मते या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

औरंगाबाद : अर्थसंकल्पाचे अवलोकन केल्यानंतर उद्योजकांपैकी काहींच्या मते आजचा अर्थसंकल्प संतुलित आहे, तर काहींच्या मते या अर्थसंकल्पात अनेक बाबी स्पष्ट केलेल्या नाहीत. दहापैकी दहा गुण देणारा हा अर्थसंकल्प नाही. तथापि, या अर्थसंकल्पाबद्दल उद्योजकांचा सूर ‘कही खुशी, कही गम’ असाच दिसून आला.

‘सीएमआयए’ कॉन्फरन्स हॉलमध्ये सोमवारी उद्योजकांच्या ऑनलाईन बजेट अवलोकन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘सीएमआयए’चे अध्यक्ष कमलेश धूत, वरिष्ठ उपाध्यक्ष शिवप्रसाद जाजू, मानद सचिव सतीश लोणीकर, माजी अध्यक्ष गिरीधर संगानेरिया, उद्योजक रिषी बागला, ‘सीआयआय’चे अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, ‘मासिया’चे अध्यक्ष अभय हंचनाळ व अन्य उद्योजक उपस्थित होते. यावेळी उद्योजकांपैकी मुकुंद कुलकर्णी, कमलेश धूत, अभय हंचनाळ, शिवप्रसाद जाजू, सतीश लोणीकर यांनी चर्चेत भाग घेतला. यापैकी काहींनी अतिशय सकारात्मक अर्थसंकल्प असल्याची भावना व्यक्त केली. भारतातील उद्योगांपैकी २० टक्के उद्योग हे महाराष्ट्रात आहेत. या उद्योगांना जेव्हा फायदा देण्याचा निर्णय घेतला जातो, तेव्हा त्याचा वाटा आपोआप महाराष्ट्रालासुद्धा मिळतो. मात्र, असे असताना देशातील २७ शहरांपैकी महाराष्ट्रातील नाशिकचा मेट्रोसाठी समावेश करण्यात आला आहे, ही आनंदाची बाब असली, तरी तुलनेने औरंगाबादचा त्यात समावेश नाही, ही दु:खद बाब आहे. नाशिक आणि औरंगाबादची तुलना केली, तर औरंगाबादचे विकासाच्या दृष्टीने असलेले सामर्थ्य मोठे आहे.

अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे ‘एमएसएमई’ला चालना मिळाली आहे. या अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे ‘एमएसएमई’ क्षेत्र आणि पायाभूत सुविधांची रचना बरीच वाढेल. स्टार्टअपचे सर्व फायदे एक वर्षासाठी वाढवलेले आहेत. आजवर आयकरासंदर्भातील सहा वर्षे जुन्या त्रुटींची चौकशी आयकर विभाग करत होता. आता ही मर्यादा तीन वर्षांपर्यंत कमी करण्यात आली आहे. कोविड टॅक्स लावण्याची भीती होती. पण, सरकारने सरकारी मालमत्ता आणि कंपन्यांच्या विक्रीतून भांडवल उभारणीला प्राधान्य दिल्याचे दिसते. ही बाब स्वागतार्ह आहे, असा सूर उद्योजकांमधून दिसून आला.

कॅप्शन-

‘सीएमआयए’कडून आयोजित ‘लाईव्ह बजेट’ सत्रात मुकुंद कुलकर्णी, रिषी बागला, कमलेश धूत, सतीश लोणीकर, अभय हंचनाळ आदी उद्योजक सहभागी झाले हाेते.