शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
3
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
4
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
5
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
6
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
7
सिंधुदुर्गात राणेंचं पाऊल पुढे, तर या दोन मतदरासंघांचा कल राऊतांकडे; तळकोकणात कोण जिंकणार?
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
9
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
10
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
12
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
13
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
14
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
15
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
16
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
17
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
18
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
19
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
20
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड

‘समृद्धी’च्या कामामुळे फळबागा धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 10:24 PM

महामार्गाच्या कामामुळे धूळ उडत असल्याने परिसरातील फळबागा धोक्यात आल्या आहेत.

शेंद्रा : औरंगाबाद तालुक्यातून जात असलेला नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम युद्धपातळीवर चालू असून, या महामार्गाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात ट्रकने मुरुम आणण्यात येत आहे. महामार्गाच्या कामामुळे धूळ उडत असल्याने परिसरातील फळबागा धोक्यात आल्या आहेत.

औरंगाबाद तालुक्यातील बेंदेवाडी येथील डाळींब उत्पादक शेतकरी गितेश बाबूलाल शिहिरे व सतीश बाबूलाल शिहिरे यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. गितेश शिहिरे व सतीश शिहिरे यांची बेंदेवाडी शिवारातील गट नंबर ७५ मध्ये १८०० डाळिंब पिकांची लागवड केलेली आहे.सदरील फळबाग आजरोजी फुलधारणेत आहे. समृद्धी महामार्गाचे काम तालुक्यात युद्धपातळीवर सुरू असून, यासाठी मुरुमाची वाहतूक ट्रकने करण्यात येत आहे. यामुळे मोठमोठ्या मशिनरी या रस्त्यावरुन जात असल्याने प्रचंड धूळ उडत आहे.

या धुळीमुळे डाळिंब बागा धोक्यात आल्या असून, धुळीने डाळिंब फळाला डाग पडत आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी माहिती दिली आहे. परंतु अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षकांना निवेदन दिल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

गितेश शिहिरे म्हणाले की, यावर्षी दुष्काळी स्थितीमुळे फळबाग नियोजनासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून आम्ही यावर्षी पाच लाख ५५ हजार रुपयांचे कर्ज घेतले आहे. परंतु धुळीमुळे डाळिंब पिक धोक्यात आल्यामुळे कर्ज कसे भरावे असा प्रश्न आम्हाला भेडसावत आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादroad transportरस्ते वाहतूक