शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रा.पं.च्या दुर्लक्षामुळे नळ योजना रखडली

By admin | Updated: September 30, 2014 01:27 IST

पिंपरखेड : वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथे २००७ साली जलस्वराज्य योजनेअंतर्गत नळ योजना मंजूर झाली होती. मात्र सात वर्षाचा कालावधी उलटूनही केवळ

पिंपरखेड : वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथे २००७ साली जलस्वराज्य योजनेअंतर्गत नळ योजना मंजूर झाली होती. मात्र सात वर्षाचा कालावधी उलटूनही केवळ ग्रा.पं.च्या उदासिनतेमुळे आणि सरपंचांच्या दुर्लक्षामुळे ही योजना अद्यापही रखडलेलीच आहे. ग्रामस्थांनीही या योजनेबाबत साधी विचारपूसही केलेली नाही. या नळ योजनेत पाणीपुरवठा समितीने लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप पिंपरखेड ग्रामस्थांनी केला आहे.२००७ साली ३६ लाख रुपये खर्चाची पिंपरखेडला नळ योजना मंजूर झाली. या योजनेअंतर्गत माजलगावच्या सिंदफणा धरणावरून गावाला पाणी पुरवठा करण्याचे नियोजन होते. त्या प्रमाणे माजलगाव धरणातून पाईपलाईन करून गावामध्ये पाणीही आणले. विहिरीचे कामही पूर्ण झाले. मात्र ग्रा.पं.च्या दुर्लक्षामुळे अद्यापही गावात टाकीचे बांधकाम झालेले नाही. लाखो रुपयांची जलस्वराज्य योजना स्वत:च्या खिशात घालण्याचे काम येथील पाणीपुरवठा समिती करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून केला जात आहे.सरपंच अशोक निपटे यांना विचारले असता आचारसंहिता संपताच काम पूर्ण करू असे म्हणत हात झटकले. वास्तविक पाहता तत्कालिन सरपंचाने ही नळ योजना पूर्ण केली नाही याची साधी चौकशी करण्याची तसदीही सरपंच निपटे यांनी घेतली नाही.त्यामुळे येथील पाणीपुरवठा विभागाशी सरपंचासह गावातील काही लोकांचा हस्तक्षेप असल्याचा आरोप होत आहे. ग्रामस्थही या नळ योजनेबाबत उदासिन असल्याचे दिसून येत आहेत. या नळ योजनेबाबत केवळ पंचायत समितीला तक्रार देण्यात आली होती. मात्र यावर अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही. पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांचाही यामध्ये हस्तक्षेप आहे की काय? असा सवाल ग्रामस्थांमधून केला जात आहे. याबाबत पाणीपुरवठा विभागाचे सचिव भागवत निपटे म्हणाले, या योजनेचे दोन हप्ते अद्याप बाकी आहेत. ते पैसे आल्यास राहिलेले काम पूर्ण करण्यात येईल, असे सांगितले. या पाणीपुरवठा विभागाला मागील पाच वर्षापासून अद्यापर्यंत या योजनेचे पैसे मिळालेच नाहीत का? याबाबत संशय व्यक्त होत आहे. माजलगाव धरणावर पाणीपुरवठ्यासाठी खोदण्यात आलेल्या विहिरीचे काम पूर्ण झाले असून त्यामध्ये मोटारही बसविण्यात आली आहे. पाईपलाईनद्वारे गावापर्यंत पाणीही आलेले आहे. गावात पाणी येऊनही ग्रा.पं.च्या उदासिनतेमुळे टाकीचे बांधकाम रखडलेलेच आहे. तसेच नळ कनेक्शनही जोडलेले नाही. त्यामुळे ग्रामस्थांना कोसो मैल दूर भटकंती करावी लागत आहे. गटविकास अधिकारी बी.डी. राऊत म्हणाले, हे काम खूप वर्षांपूर्वीचे आहे. त्याबद्दल मला काही सांगता येणार नाही. अधिकाऱ्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावरही संशय व्यक्त केला जात आहे. नळ योजना सुरू करून पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. (वार्ताहर)