शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

ऑनलाईन प्रणालीमुळे रेशनचे १९ हजार टन धान्य वाचल्याचा दावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 6:30 PM

मार्च ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत १९ हजार ३८० मेट्रिक टन धान्याची बचत झाल्याचा दावा जिल्हा पुरवठा विभागाने केला.

ठळक मुद्देजिल्ह्यात ७ लाख ७९ हजार शिधापत्रिकाधारकत्यांना १ हजार ८०१ रेशन दुकानांतून दरमहा धान्याचे वितरण होते.

औरंगाबाद : मार्च ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत १९ हजार ३८० मेट्रिक टन धान्याची बचत झाल्याचा दावा जिल्हा पुरवठा विभागाने बुधवारी पत्रकार परिषदेत केला. सोबतच आॅनलाईन प्रणालीमुळे काळ्या-बाजारात धान्य जात नसल्याची हमी पुरवठा विभागाने दिली.

जिल्ह्यातील सर्वच रेशन दुकानांवर मार्च २०१८ पासून ई-पॉस बसविण्यात आले असून, रेशन दुकानातील धान्य वाटपात पारदर्शकता असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. भारत कदम यांनी ठणकावून सांगितले.ई-पॉसद्वारे धान्याचे वाटप करण्याचा शासन आदेश असून, जिल्ह्यात मार्च २०१८ पासून त्याची अंमलबजावणी सुरू आहे. जिल्ह्यातील १ हजार ८०१ रेशन दुकानांवर ई-पॉस बसविण्यात आले आहेत. त्या आधारेच धान्य वितरण करण्याचे आदेश पुरवठा विभागाने दुकानादारांना दिले आहेत.

जिल्ह्याला मार्च ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत १ लाख ३७ हजार ८३५ मेट्रिक टन गहू आणि तांदळाचे नियतन मंजूर होते. तहसीलदारांच्या मागणीनुसार यापैकी एक लाख १८ हजार ४५३ मेट्रिक टन धान्याचे वितरण जिल्ह्यातील रेशन दुकानादारांना करण्यात आले. ई-पॉसआधारे दरमहा धान्य वाटप झाल्याने तब्बल १३ हजार ३८६ मेट्रिक टन गहू, तर ५ हजार ९९४ मेट्रिक टन तांदळाची बचत झाल्याचा दावा पुरवठा विभाग करीत आहे. शिधापत्रिका असताना धान्य न घेणाऱ्या शहरातील ३०, ग्रामीण भागातील ४० हजार नागरिकांना पुरवठा विभागाकडून नोटीस बजाविण्यात आल्याचे डॉ. कदम यांनी सांगितले.

जिल्ह्यात ७ लाख ७९ हजार शिधापत्रिकाधारकजिल्ह्यात एकूण ७ लाख ७९ हजार ११८ कौटुंबिक शिधापत्रिकाधारक आहेत. त्यांना १ हजार ८०१ रेशन दुकानांतून दरमहा धान्याचे वितरण होते. त्यात अंत्योदय योजनेचे ७० हजार ४७३ शिधापत्रिका आहेत. त्यापैकी ६० हजार ४९१ पत्रिका आधार कार्डशी संलग्न आहेत. यासह प्राधान्य कुटुंब योजनेत २ लाख २ हजार ८१९ पैकी एक लाख ८१ हजार ५६, तर ए.पी.एल. शेतकरी योजनेत ४ लाख १८ हजार ८२५ पैकी ३ लाख २३ हजार २८५ शिधापत्रिकांचे आधार सीडिंग झाल्याने योग्य लाभार्थ्यांपर्यंत धान्य जात असल्याचे पुरवठा विभागाचे मत आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादonlineऑनलाइन