शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

बससेवा नसल्याने शाळेसाठी पायपीट

By admin | Updated: August 15, 2014 00:04 IST

भांडेगाव : हिंगोली - जामठी हा १५ कि. मी. चा रस्ता बऱ्याच वर्षापुर्वी झाला आहे; परंतु शासनाने राबविलेल्या ‘गाव तेथे एसटी’ या योजनेचा या गावांशी काहीही संबंध नसल्यासारखी स्थिती आहे.

भांडेगाव : हिंगोली - जामठी हा १५ कि. मी. चा रस्ता बऱ्याच वर्षापुर्वी झाला आहे; परंतु शासनाने राबविलेल्या ‘गाव तेथे एसटी’ या योजनेचा या गावांशी काहीही संबंध नसल्यासारखी स्थिती आहे. कारण या गावाला कोणतीच बस जात नसल्यामुळे प्रवाशांची हेळसांड होत आहे.जामठी खु. - हिंगोली हा १५ कि. मी. असणारा रस्ता दळण-वळणाच्या दृष्टीने विकासात मागे राहिला आहे. भांडेगाव येथे उच्च माध्यमिक विद्यालय आहे. या विद्यालयात खांबाळा, सावा, पारोळा, जामठी, पांगरी, चोरजवळा या गावचे शेकडो विद्यार्थी दररोज सायकलने किंवा पायी ये-जा करतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा वेळ वाया जातो आणि शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होतो. या गावाला जाण्यासाठी खासगी वाहनाशिवाय दुसरा कोणत्याही प्रकारची सोय नाही, व्यवस्थित रस्ताही नाही, बस तर नाहीच. स्वातंत्र्य मिळून कित्येक वर्षे झाले तरीही या भागातील लोकप्रतिनिधींनी बस चालू करण्यासाठी कोणत्याही हालचाली केलेल्या दिसत नाहीत. भांडेगाव येथे रस्ता नसल्या कारणाने बस चालू होत नाही, असे सांगण्यात आले; परंतु आता हा रस्ता दुरूस्त करून सुद्धा बस चालू झालेली नाही. हिंगोली जिल्ह्यामध्ये नावाजलेले भांडेगाव लोकसंख्येच्या दृष्टीनेही मोठे आहे. येथील काही मंडळी राजकारणामध्ये चांगले सक्रीय झाली आहे. बलाढ्य शेतकरी असलेल्या भांडेगाव परिसरातील जामठी, साटंबा, भांडेगाव, नवलगव्हाण, सावा, पारोळा या गावांना बस चालू करण्यासाठी कोणत्याही प्रकारची गरजच नसल्यासारखे लोकप्रतिनिधींना वाटत आहे. त्यामुळे या परिसरातील विद्यार्थ्यांना सकाळी सायकलने किंवा पायी सात ते आठ कि. मी. अंतर पार करून शाळा गाठावी लागते. शासनाने कित्येक गावांना मानव विकास मिशनच्या बसची सुविधा देण्यात आली. जेणे करून विद्यार्थिनींना शाळेत जाण्याचा त्रास होवू नये; परंतु भांडेगाव येथे शाळेसाठी बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या १ हजार पेक्षा जास्त आहे. या विद्यार्थिनींना सकाळी सायकल किंवा पायपीट करून शाळा गाठावी लागते; परंतु कोणत्याही लोकप्रतिनिधीला या शाळेतील विद्यार्थ्यांच्या समस्येची जाणीव नाही. या गावांचा रहदारी या रस्त्यावर अवलंबून आहे. या गावांना जाण्यासाठी बस नसल्यामुळे प्रवाशांना खाजगी वाहनांचा आश्रय घेवून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. वेळप्रसंगी अपघातात जीवही गमवावा लागला. तरी सुद्धा खाजगी प्रवासाशिवाय पर्याय नसल्याने खाजगी वाहनांवरच अवलंबून रहावे लागत आहे. (वार्ताहर)