शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
2
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
3
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
4
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
5
पाकिस्तान युद्धात सैनिक लढला होता, नंतर पेन्शनशिवाय काढून टाकले; पत्नीला ५७ वर्षांनंतर मिळाला न्याय
6
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
7
Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु!
8
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
9
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
10
एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...
11
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
12
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
13
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
14
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
15
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
16
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
17
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
18
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
19
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
20
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले

पावसामुळे दुबार पेरणीचे संकट टळले

By admin | Updated: July 6, 2016 23:55 IST

बीड : यंदाच्या हंगामात प्रथमच मंगळावारी सर्वदूर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रखडलेल्या पेरणी कामांना वेग आला आहे तर काही ठिकाणी पिकांच्या मशागतीची कामे सुरू आहेत.

 

बीड : यंदाच्या हंगामात प्रथमच मंगळावारी सर्वदूर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रखडलेल्या पेरणी कामांना वेग आला आहे तर काही ठिकाणी पिकांच्या मशागतीची कामे सुरू आहेत. तब्बल तीन आठवड्यानंतर झालेल्या पावसामुळे दुबार पेरणीचे संकट टळले आहे. खरीपाचा पेरा १५ जुलै पर्यंत केला जातो. पावसाने ओढ दिल्याने जून अखेपर्यंत खरीपाच्या क्षेत्रापैकी ७५ टक्केच पेरण्या झाल्या होत्या. पेरणीपासून पाऊस गायब झाल्याने पिके सुकू लागली होती, तर इतर तालुक्यांत पेरण्या लांबणीवर पडल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला होता. पेरणी करूनही पिकांची वाढ खुंटली होती. उशिरा का होईने, मंगळवारी जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली होती. केवळ एका दिवसात २१ मि.मी. पाऊस झाल्याने खरीपातील पिकांना जीवदान मिळाले आहे. कृषी विभागाच्या नियोजनानुसार अद्यापपर्यंत जिल्ह्यात पेरण्या झाल्या आहेत. जुलैअखेरपर्यंत पेरण्या पूर्ण होणार असल्याचा अंदाज कृषी विकास अधिकारी डी. बी. बिटके यांनी व्यक्त केला आहे. हंगामाच्या सुरूवातीपासून पाठ फिरवलेल्या अंबाजोगाई तालुक्यात मंगळवारी सर्वाधिक ३३.६ मि.मी. पाऊस झाला. या पावसामुळे पिकांच्या मशागतीबरोबर रखडलेल्या कामांना वेग मिळाला आहे. बुधवारपासून शेतकऱ्यांनी डुब्याच्या सहायाने मशागती कामाला सुरूवात केल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)