शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ व चारा टंचाईने बळीराजा हवालदिल...भराड़ी बाजारात झाली कवडी मोल भावात जनावरांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 15:05 IST

भीषण दुष्काळ, पाणी व चारा टंचाईने बळीराजा हवालदिल झाला आहे.

- प्रमोद शेजुळ 

भराडी (औरंगाबाद ) : - सिल्लोड तालुक्यात भीषण दुष्काळ, पाणी व चारा टंचाईने बळीराजा हवालदिल झाला आहे. शनिवारी भराड़ीत भरणाऱ्या जनावरांच्या आठवड़ी बाजारात विक्री साठी तब्बल 1 हजाराच्या वर जनावरे विक्रीसाठी आली होती. जनावरे जास्त व ती घेणारे व्यापारी कमी आल्याने कवडी मोल भावात जनावरांची विक्री झाली.

सत्तर ते 80 हजाराची बैल जोड़ी हताश झालेल्या शेतक ऱ्यानी कसाई झालेल्या व्यापाऱ्याना केवळ 40 ते 50 हजारात विकल्या आणि शेतकरी  ढसा ढसा रडू लागले. न विकावे तर त्यां जनावरांचा उदरनिर्वाह कसा करावा.. विकावेतर भाव नाही अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडले आहे.मुलां सारखे जीव लावलेल्या जनावराना शेतकरी बाजार दाखवित असल्याचे विदारक चित्र सिल्लोड तालुक्यातिल भराड़ी येथील आठवड़ी बाजारात बाघायला मिळाले.

सिल्लोड तालुक्यात गेल्या चार वर्षांपासून सतत दुष्काळ आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पशुधन विक्रीस काढले आहेत. बाजारात पशुधन विक्रीचे प्रमाण वाढल्याने भाव दुपटीने घसरले आहे.मागील महिन्यात जनावरे बाजारात येण्याचे प्रमाण कमी होते मात्र आता प्रमाण वाढले आहे.

काही शेतकरी चारा शोधण्यासाठी धावपळ करीत आहे. मात्र चाऱ्याचे भाव आकाशाला भिडले आहे.500 ते 700 रूपयाला मिळणारे कडब्याचे गुड़ आता 2 ते 3 हजारात मिळत आहे. शिवाय कुट्टी करने वाहतूक खर्च हे सर्व सामान्य शेतकऱ्याला परवडनारे नाही.पाणी नसल्याने मकाची वाढ झाली नाही. यामुळे चारा कमी निघाला आहे. परजिल्ह्यात चारा मागणी वाढल्याने भाव वाढले आहे.परजिल्ह्यात जाणारा चारा रोखला गेला तर किमान तालुक्यात शेतकऱ्यांना चारा मिळेल. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

भराड़ी परिसरात मजुरांना काम नाही.रोजगार हमीची कामे अजुन सुरु झाली नाही कामाच्या शोधात मंजूर परजिल्ह्यात जात आहे. खरीप तर गेला... रब्बीही नाही. तालुक्यातील अनेक गावांत पाणी टंचाईने उग्ररूप धारण केले आहे.

सिल्लोड तालुक्यात दुष्काळ जाहीर असला तरी प्रशासनाकडून कुठल्याही उपाययोजना अद्यापही सुरू झाल्या नसल्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्याकडुन नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान आठवडी बाजारात गाय, बैल, म्हैस विक्रीची इच्छा नसतानाही नाईलाजाने विक्री करावी लागत आहे. 

मुलासारखे जपलेली बैलजोडी...दुष्काळी परिस्थिती भीषण चारा टंचाई जनावरांच्या उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झाल्याने बैलजोडी विक्रीची इच्छा नसतानाही मुलासारखे जपलेली बैलजोडी कवडीमोल भावाने विक्री करावी लागली.- नाना जिजा शेजुळ.शेतकरी रा. उपळी. ता. सिल्लोड. 

व्यापारी झाले कसाई....माझ्याकडे चारा नाही..आगामी 6 महीने जनावरांचे पोट कसे भरावे यांची चिंता सत्तर हजार रुपयांच्या बैलजोडीची व्यापा ऱ्या नी केवळ चाळीस हजार रुपयांत बोली लावली आहे.जनावरे विकने नाइलाज झाला आहे. ज्यास्त जनावरे बाजारात आल्याने व्यापारी कसाई झाले आहे.. त्यानी कमी भावात जनावरे मागितली.. ना इलाजाने ती विकावी लागली.- सोमनाथ रामभाऊ गुंजाळ. रा मांडगाव. ता. सिल्लोड

टॅग्स :droughtदुष्काळFarmerशेतकरीagricultureशेती