शहरं
Join us  
Trending Stories
1
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
2
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
3
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
4
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
5
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
6
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
7
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
8
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
9
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
10
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
11
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
12
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
13
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
14
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
15
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
16
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
17
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
18
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
19
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
20
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 

दुष्काळ व चारा टंचाईने बळीराजा हवालदिल...भराड़ी बाजारात झाली कवडी मोल भावात जनावरांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 15:05 IST

भीषण दुष्काळ, पाणी व चारा टंचाईने बळीराजा हवालदिल झाला आहे.

- प्रमोद शेजुळ 

भराडी (औरंगाबाद ) : - सिल्लोड तालुक्यात भीषण दुष्काळ, पाणी व चारा टंचाईने बळीराजा हवालदिल झाला आहे. शनिवारी भराड़ीत भरणाऱ्या जनावरांच्या आठवड़ी बाजारात विक्री साठी तब्बल 1 हजाराच्या वर जनावरे विक्रीसाठी आली होती. जनावरे जास्त व ती घेणारे व्यापारी कमी आल्याने कवडी मोल भावात जनावरांची विक्री झाली.

सत्तर ते 80 हजाराची बैल जोड़ी हताश झालेल्या शेतक ऱ्यानी कसाई झालेल्या व्यापाऱ्याना केवळ 40 ते 50 हजारात विकल्या आणि शेतकरी  ढसा ढसा रडू लागले. न विकावे तर त्यां जनावरांचा उदरनिर्वाह कसा करावा.. विकावेतर भाव नाही अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडले आहे.मुलां सारखे जीव लावलेल्या जनावराना शेतकरी बाजार दाखवित असल्याचे विदारक चित्र सिल्लोड तालुक्यातिल भराड़ी येथील आठवड़ी बाजारात बाघायला मिळाले.

सिल्लोड तालुक्यात गेल्या चार वर्षांपासून सतत दुष्काळ आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पशुधन विक्रीस काढले आहेत. बाजारात पशुधन विक्रीचे प्रमाण वाढल्याने भाव दुपटीने घसरले आहे.मागील महिन्यात जनावरे बाजारात येण्याचे प्रमाण कमी होते मात्र आता प्रमाण वाढले आहे.

काही शेतकरी चारा शोधण्यासाठी धावपळ करीत आहे. मात्र चाऱ्याचे भाव आकाशाला भिडले आहे.500 ते 700 रूपयाला मिळणारे कडब्याचे गुड़ आता 2 ते 3 हजारात मिळत आहे. शिवाय कुट्टी करने वाहतूक खर्च हे सर्व सामान्य शेतकऱ्याला परवडनारे नाही.पाणी नसल्याने मकाची वाढ झाली नाही. यामुळे चारा कमी निघाला आहे. परजिल्ह्यात चारा मागणी वाढल्याने भाव वाढले आहे.परजिल्ह्यात जाणारा चारा रोखला गेला तर किमान तालुक्यात शेतकऱ्यांना चारा मिळेल. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

भराड़ी परिसरात मजुरांना काम नाही.रोजगार हमीची कामे अजुन सुरु झाली नाही कामाच्या शोधात मंजूर परजिल्ह्यात जात आहे. खरीप तर गेला... रब्बीही नाही. तालुक्यातील अनेक गावांत पाणी टंचाईने उग्ररूप धारण केले आहे.

सिल्लोड तालुक्यात दुष्काळ जाहीर असला तरी प्रशासनाकडून कुठल्याही उपाययोजना अद्यापही सुरू झाल्या नसल्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्याकडुन नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान आठवडी बाजारात गाय, बैल, म्हैस विक्रीची इच्छा नसतानाही नाईलाजाने विक्री करावी लागत आहे. 

मुलासारखे जपलेली बैलजोडी...दुष्काळी परिस्थिती भीषण चारा टंचाई जनावरांच्या उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झाल्याने बैलजोडी विक्रीची इच्छा नसतानाही मुलासारखे जपलेली बैलजोडी कवडीमोल भावाने विक्री करावी लागली.- नाना जिजा शेजुळ.शेतकरी रा. उपळी. ता. सिल्लोड. 

व्यापारी झाले कसाई....माझ्याकडे चारा नाही..आगामी 6 महीने जनावरांचे पोट कसे भरावे यांची चिंता सत्तर हजार रुपयांच्या बैलजोडीची व्यापा ऱ्या नी केवळ चाळीस हजार रुपयांत बोली लावली आहे.जनावरे विकने नाइलाज झाला आहे. ज्यास्त जनावरे बाजारात आल्याने व्यापारी कसाई झाले आहे.. त्यानी कमी भावात जनावरे मागितली.. ना इलाजाने ती विकावी लागली.- सोमनाथ रामभाऊ गुंजाळ. रा मांडगाव. ता. सिल्लोड

टॅग्स :droughtदुष्काळFarmerशेतकरीagricultureशेती