शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

धुवाधार पावसाने शहरवासीयांची दैना

By admin | Updated: August 3, 2016 00:18 IST

औरंगाबाद : शहरात मंगळवारी धुवाधार पाऊस झाला. कधी संततधार तर कधी मुसळधार स्वरूपात दिवसभर पाऊस बरसत राहिला. त्यामुळे नाल्यांना पूर आला.

औरंगाबाद : शहरात मंगळवारी धुवाधार पाऊस झाला. कधी संततधार तर कधी मुसळधार स्वरूपात दिवसभर पाऊस बरसत राहिला. त्यामुळे नाल्यांना पूर आला. अनेक घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरले. शहरातील सखल भागातील रस्त्यांनाही नद्यांचे स्वरूप आले होते. या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले.शहरात मागील दोन दिवस सायंकाळच्या वेळी रिमझिम पाऊस झाला. सोमवारी रात्रीही पावसाची रिमझिम सुरू होती. मंगळवारी सकाळी काही वेळासाठी हा पाऊस उघडला. परंतु सकाळी १० वाजेच्या सुमारास पुन्हा पावसाला सुरुवात झाली. दिवसभर हा पाऊस सुरूच होता. संततधार स्वरूपात बरसणाऱ्या पावसाचा जोर अधूनमधून वाढत होता. दुपारी आणि सायंकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. त्यामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. १३ वी योजना जयभवानीनगरमधील जागृती हनुमान मंदिराजवळील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. जयभवानीनगरातील शिवाजी चौकातील तापडिया अपार्टमेंटच्या तळघरातही दुपारी पाणी शिरल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. पावसामुळे सातारा परिसरातही हाहाकार उडाला. येथील रेणुका माता मंदिराजवळील विद्यानगरातही असंख्य घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. याचप्रमाणे न्यू भाग्योदयनगर, छत्रपतीनगर, अलोकनगर आदी भागात पावसामुळे दैना उडाली. बन्सीलालनगरातील तंदूर हॉटेलजवळील एका दुकानात पाणी शिरले. हडकोतही अनेक भागांना पावसाचा फटका सोसावा लागला. जटवाडा रोडवरील सईदा कॉलनीत घरांमध्ये पाणी शिरले. या ठिकाणी रस्त्यांनाही तळ्याचे स्वरूप आले होते. रेल्वेस्टेशन, जटवाडा रोड, हरिओमनगर, सातारा परिसर, देवळाई, जयभवानीनगर, बन्सीलालनगर, उत्तमनगर, बालाजीनगर, संजयनगर, कैलासनगर, त्रिमूर्ती चौक, मुकुंदवाडी भागातील संतोषी माता कॉलनी आदी ठिकाणी पाणी साचले होते. या भागातील अनेक रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते. दरम्यान या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. पावसामुळे शहरातील वाहतूक मंदावली होती. बहुतेक लोकांनी घराबाहेर पडणे टाळल्यामुळे बाजारपेठांमध्येही शुकशुकाट होता. दुपारच्या वेळी शाळा, महाविद्यालयातून परतणारी मुले, त्यांना आणण्यासाठी गेलेले पालक तसेच इतर कामांच्या ठिकाणी परतणाऱ्या नागरिकांची गैरसोय झाली. औरंगाबाद : मागील दोन दिवसांपासून शहरात पाऊस सुरू असून, मंगळवारी शहरातील अनेक सखल भागात अनेक घरांसह दुकानांमध्ये पाणी शिरले. अग्निशमन दलाकडे दिवसभरात ३७ पेक्षा अधिक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. पाणी काढण्याच्या तक्रारींमुळे अग्निशमन दलाची बरीच दमछाक होत होती.पावसाळ्यात पाणी साचून राहू नये, पाण्याला नैसर्गिक प्रवाह मिळावा यासाठी मनपाने कोणतीच तयारी केली नव्हती. जिथे लहान-मोठे नाले आहेत, त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. शहरातील नाल्यांची अवस्था दिवसेंदिवस नालीसारखी होत आहे. सोमवारी रात्री सुरू झालेला पाऊस मंगळवारी सुरूच होता. दुपारी पावसाने चांगलाच जोर धरला होता. अवघ्या दीड ते दोन तासांत शहरातील अनेक सखल भागात राहणाऱ्या नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याच्या तक्रारी प्राप्त होऊ लागल्या. जयभवानीनगर परिसरातील तापडिया अपार्टमेंट येथे अनेक घरांमध्ये पाणी साचले होते. त्याचप्रमाणे बन्सीलालनगर भागातील दुकानांमध्येही चांगलेच पाणी शिरले होते. सिडकोतील तेराव्या योजनेत जागृत हनुमान मंदिराजवळील काही घरांमध्ये पाणी साचले होते. बीड बायपासवरील रेणुकामाता मंदिर परिसर, विद्यानगर येथेही अनेक घरांमध्ये पाणी शिरले.नियंत्रण कक्षात तक्रार नाहीपावसाळा सुरू होताच महापालिकेने नियंत्रण कक्ष सुरू केले. या कक्षात तीन शिफ्टमध्ये वेगवेगळे कर्मचारी नेमण्यात आले आहेत. पावसाळा सुरू झाल्यापासून नियंत्रण कक्षात एकही तक्रार प्राप्त झाली नाही. मनपाने नियंत्रण कक्षासंबधी नागरिकांमध्ये अधिक जनजागृतीच केलेली नाही. या कक्षात लवकरच एक टोल फ्री क्रमांकही बसविण्यात येणार आहे. औषधी भवनची तक्रार नाहीदरवर्षी शहरात थोडासाही पाऊस झाल्यास गोमटेश मार्केट परिसरातील औषधी भवनच्या नाल्याजवळ राहणाऱ्या नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरते. यंदा मनपाने नाल्यातून पाणी कसे वाहून जाईल या दृष्टीने बरेच प्रयत्न केले. मंगळवारी नागरिकांनी मनपाकडे कोणतीही तक्रार केली नाही.