शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

कुलगुरुंनी केला संकल्प; संशोधन केंद्राच्या प्रमाणपत्राशिवाय पीएचडी ‘व्हायवा’ नकोच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2021 12:29 IST

Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university : मागील आठवड्यात कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी विद्यापीठाचा मुख्य परिसर व उपपरिसरातील विभागप्रमुखांची सलग तीन दिवस मॅरेथॉन आढावा बैठक घेतली.

ठळक मुद्देदेर आए... आता दर्जेदार संशोधनासाठी आग्रह

- विजय सरवदे

औरंगाबाद : पीएच.डी.साठी (PhD Scholar ) होत असलेल्या संशोधनाचा फारसा उपयोग होत नाही. सादर होणारे बहुतांशी शोधप्रबंध कॉपी पेस्ट असतात, हे आरोप टाळण्यासाठी व समाजोपयोगी संशोधनासाठी यापुढे महाविद्यालये तसेच विद्यापीठातील संशोधन केंद्रांचे (डीआरसी) प्रमाणपत्र असल्याशिवाय संशोधक विद्यार्थ्यांना ‘व्हायवा’साठी पात्र समजले जाणार नाही, अशी भूमिका आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतली आहे. ( The Dr. BAMU Vice-Chancellor made a resolution; Don't submit a PhD without a research center certificate) 

मागील आठवड्यात कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी विद्यापीठाचा मुख्य परिसर व उपपरिसरातील विभागप्रमुखांची सलग तीन दिवस मॅरेथॉन आढावा बैठक घेतली. तेव्हा कुलगुरूंनी पीएच.डी.चा दर्जा सुधारण्याच्या मुद्द्यावर जोर दिला. ‘यूजीसी’च्या मार्गदर्शक सूचनांनुसार महाविद्यालये व विद्यापीठ विभागांतील संशोधन केंद्रांतील विभागीय संशोधन समितीने (डिपार्टमेंटल रिसर्च कमिटी) प्रमाणपत्र दिल्यानंतरच संबंधित विद्यार्थ्यांच्या पीएच.डी. व्हायवाची प्रक्रिया संशोधन व अधिमान्यता समितीने (आरआरसी) पार पाडली पाहिजे; परंतु आपल्याकडे संशोधन केंद्रे आहेत. मात्र, आतापर्यंत तिथे ‘डीआरसी’ स्थापन झालेल्या नव्हत्या. त्यामुळे शोधप्रबंधाचे काम पूर्ण झाल्यानंतर तो थेट विद्यापीठात सादर केला जायचा. 

सर्वात जुनी क्रांतीचौक पोलीस कॉलनी पाडणार; उभी राहणार ७८० घरांची मल्टिस्टोरेज अपार्टमेंट

विद्यापीठातील ‘आरआरसी’मार्फत बहिस्थ परीक्षकांची नावे कुलगुरू यांच्याकडे सादर केली जायची व त्यातून परीक्षकांची नावे अंतिम केली जात असत. त्यामुळे अनेकदा बहिस्थ परीक्षांकडून (रेफरी) ‘हा विषयच संशोधनाचा होऊ शकत नाही’, ‘कॉपी पेस्ट संशोधन’, ‘अपूर्ण किंवा पुरेसे संदर्भ नसलेले संशोधन’, अशा प्रकारे शंका उपस्थित केल्या जात होत्या. त्यामुळे विद्यापीठाची होणारी बदनामी टाळण्यासाठी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी सर्व संशोधन केंद्राच्या ठिकाणी आता विभागीय संशोधन समित्या (डीआरसी) स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे दर सहा महिन्याला या ‘डीआरसी’समोर सादरीकरण होईल. संशोधन पूर्ण झाल्यानंतर ‘डीआरसी’ प्रमाणत्र देईल. त्यानंतर विद्यापीठातील ‘आरआरसी’ने व्हायवाची पुढील प्रक्रिया पूर्ण करायची आहे.

गांभीर्याने संशोधन नाहीअलीकडे पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर पीएच.डी. करण्याचे मोठे फॅड आले आहे. काहीजण प्राध्यापकाची नोकरी मिळविणे, वेतनवाढ मिळविणे, प्राचार्य किंवा विभागप्रमुख म्हणून बढती मिळण्यासाठी किंवा नावापुढे ‘डॉक्टर’ बिरुद मिरविण्यासाठी पीएच.डी. करत आहेत. आपल्या संशोधनाचा समाजासाठी, उद्योगासाठी उपयोग झाला पाहिजे, यासाठी फारसे कोणी गांभीर्याने लक्ष देत नाही, असे ज्येष्ठ प्राध्यापकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थीEducationशिक्षण