शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

नवीन पाणीपुरवठा योजनेचा डीपीआर मनपातच पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 23:26 IST

शहराची तहान भागविण्यासाठी युद्धपातळीवर नवीन पाणीपुरवठा योजना सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. १,६७३ कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना मनपाने तयार केली असून, या योजनेचे सादरीकरण २१ जून रोजी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्यासमोर झाले. त्यांनी योजनेचा डीपीआर तीन दिवसांमध्ये महाराष्टÑ जीवन प्राधिकरणकडे तांत्रिक मंजुरीसाठी पाठवावा, असा आदेश दिला होता. आजपर्यंत हा डीपीआर मनपातच पडून असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शहराच्या पाणी प्रश्नात महापालिका प्रशासन किती गंभीर आहे, याचे हे उत्तम उदाहरण होय.

ठळक मुद्देप्रशासनाला गांभीर्यच नाही : २१ जूनला शासनाकडे योजनेचे सादरीकरण

औरंगाबाद : शहराची तहान भागविण्यासाठी युद्धपातळीवर नवीन पाणीपुरवठा योजना सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. १,६७३ कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना मनपाने तयार केली असून, या योजनेचे सादरीकरण २१ जून रोजी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्यासमोर झाले. त्यांनी योजनेचा डीपीआर तीन दिवसांमध्ये महाराष्टÑ जीवन प्राधिकरणकडे तांत्रिक मंजुरीसाठी पाठवावा, असा आदेश दिला होता. आजपर्यंत हा डीपीआर मनपातच पडून असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शहराच्या पाणी प्रश्नात महापालिका प्रशासन किती गंभीर आहे, याचे हे उत्तम उदाहरण होय.नवीन पाणीपुरवठा योजनेत जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत २५ मि.मी. व्यासाची नवीन जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. ४० कि.मी. जलवाहिनी टाकण्यात येईल. योजनेसाठी लागणारा संपूर्ण खर्च राज्य शासन देण्यास तयार आहे. मनपाने २५ जूनपर्यंत योजनेचा डीपीआर महाराष्टÑ जीवन प्राधिकरणकडे तांत्रिक मंजुरीसाठी पाठविणे अपेक्षित होते. ६ जुलैपर्यंत योजनेचा डीपीआर अधिकाऱ्यांच्या टेबलवरच पडून असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ज्यादिवशी योजनेचा डीपीआर महाराष्टÑ जीवन प्राधिकरणला सादर होईल, तेथून दहा दिवसांमध्ये तांत्रिक मंजुरी घ्यावी. त्यानंतर लगेच डीपीआर शासनाकडे सादर करावा. शासनाची मंजुरी मिळताच जुलै अखेरपर्यंत निविदाही काढावी, असे शासनाने नमूद केले. महापालिकेची कासवगती लक्षात घेता योजनेचे भूमिपूजन लवकरात लवकर होणे अशक्य आहे. मागील आठवड्यात आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी योजनेचे सादरीकरण पदाधिकाऱ्यांसमोर केले. यावेळीही त्यांनी १५ जुलैपर्यंत डीपीआरला तांत्रिक मंजुरी घेऊन शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे नमूद केले होते.३०० कोटी रुपये मनपाकडे पडूनमहापालिकेने तयार केलेल्या योजनेसाठी १,६७३ कोटी रुपये लागणार आहेत. समांतर जलवाहिनीसाठी दिलेले योजनेचे मनपाकडे व्याजासह ३०० कोटी रुपये पडून आहेत. नवीन योजनेसाठी मनपाला फक्त १,३७३ कोटी रुपये लागणार आहेत. शासन योजनेसाठी कितीही खर्च आला तरी देण्यास तयार आहे. शहराची तहान भागविण्यासाठी योजना अमलात आणा, एवढेच शासनाचे म्हणणे आहे.नवीन योजनेचे स्वरूप२०५० पर्यंत लोकसंख्या लक्षात घेऊन योजनेचे डिझाईन तयार करण्यात आले आहे. २०२० मध्ये नवीन योजना सुरू झाली तरी २०२३ पर्यंत काम पूर्ण होईल. २०५२ पर्यंत योजना सुरळीत राहील. शहरात २,१०० कि.मी.च्या अंतर्गत जलवाहिन्या टाकणे, नक्षत्रवाडी येथे नवीन एमबीआर बनविणे, जलशुद्धीकरण केंद्र उभारणे, योजनेच्या पहिल्या टप्प्यात शहराला ४५१ एमएलडी पाणी मिळेल. त्यानंतर ६०४ एमएलडी पाणी मिळेल. नवीन पाणीपुरवठा योजनेत सातारा- देवळाईसह महापालिका हद्दीतील सर्व भागांचा समावेश करण्यात आला आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी