शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ८०० वनराई बंधारे तयार

By admin | Updated: October 1, 2014 00:33 IST

जालना : जिल्ह्यात आजपर्यंत साधारणत: ८०० वनराई बंधारे विविध शाळा, ग्रामपंचायती, अंगणवाडीच्या माध्यमातून मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका,

जालना : जिल्ह्यात आजपर्यंत साधारणत: ८०० वनराई बंधारे विविध शाळा, ग्रामपंचायती, अंगणवाडीच्या माध्यमातून मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, ग्रामविकास अधिकारी आशा, महिला बचत गट रोजगार सेवक, ग्रामस्थ व विद्यार्थी यांच्या श्रमदानातून तयार केली आहे. या बंधाऱ्यामुळे निसर्गाचा समतोल राहण्यास व पाणी टंचाईवर मात करण्यास मोठी मदत होणार असल्याचे मत जि. प. च्या मुख्यकार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी व्यक्त केले. काम गुणवत्तापूर्ण होऊन प्रभावी पाणीसाठे निर्माण होण्यासाठी तथा साखळी पद्धतीने वनराई बंधारे घेऊन नाल्यावर ठिकठिकाणी पाणीसाठे निर्माण करून जलसंवर्धन करण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शनासाठी पंचायत समिती स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या संकल्पनेतून शनिवारी पंचायत समिती जालना येथे कार्यशाळा घेण्यात आली.या कार्यशाळेस चांगला प्रतिसाद मिळाला. या प्रशिक्षणात अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी विद्यार्थी, महिला व ग्रामस्थांकडून या मोहिमेसाठी मिळणाऱ्या प्रतिसादाबाबत व त्यांच्या सहभागाबाबत अभिनंदन करून ग्रामीण भागातील विद्यार्थी, महिला व ग्रामस्थामधील ही उर्जा वनराई बंधारे आणि वृक्ष लागवडीसारखी मोहीम यशस्वी ठरत आहे. यातून निसर्गाचा समतोल साध्य करून पाणीटंचाईवर प्रभावीपणे मात करता येईल.या प्रशिक्षणात कृषी अधिकारी आनंद गंजेवार यांनी वनराई बंधारे घेण्यासाठी जागा निवडीपासून ते बंधारा अस्थापित करण्यापर्यंतचे तांत्रिक मार्गदर्शन केले. प्रत्येक गावात पाच बंधारे तांत्रिकदृष्ट्या गुणवत्तापूर्ण तयार करणे. त्यामुळे चांगला पाणीसाठा निर्माण होऊन जलसंवर्धनास मदत होईल, असे सांगितले.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक कोल्हे यांनी निसर्गाचा समतोल राखण्याची जबाबदारी सर्वांची आहे, असे सांगितले. (प्रतिनिधी)