शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
4
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
5
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
6
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
7
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
8
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
9
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
10
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
11
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
12
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
13
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
14
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
15
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
16
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
17
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
18
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
19
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
20
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत बदल्यांची चर्चा सुरू

By admin | Updated: May 7, 2014 00:37 IST

औरंगाबाद : मे महिना उजाडला, की जिल्हा परिषदेत बदल्यांचा बाजार गरम होतो. यंदा दि. १६ मेपर्यंत आचारसंहिता असून बदल्यांची चर्चा सुरू झाली आहे.

औरंगाबाद : मे महिना उजाडला, की जिल्हा परिषदेत बदल्यांचा बाजार गरम होतो. यंदा दि. १६ मेपर्यंत आचारसंहिता असून बदल्यांची चर्चा सुरू झाली आहे. तालुक्यांतर्गत प्रशासकीय बदल्यांतून शिक्षकांना वगळावे, अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघाने ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे. जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर १२ हजाराहून अधिक कर्मचारी आहेत. त्यामुळे बदल्यांची सर्वाधिक चर्चा व गडबड गोंधळही येथे होतो. विशेषत: शिक्षकांच्या बदल्या अधिक प्रमाणात गाजतात. यावर्षीही शिक्षक संघटनांनी बदल्यांची चर्चा घडवून आणणे सुरू केले आहे. प्राथमिक शिक्षक संघाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, संघाचे नेते संभाजी थोरात, राज्याध्यक्ष राजाराम वरूटे, एस. टी. पाटील, बाळकृष्ण तांबारे यांनी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांची रविवारी भेट घेतली. शिक्षकांच्या तालुक्यांतर्गत प्रशासकीय बदल्या करू नयेत, यासाठी आग्रह धरला. संघाच्या या मागणीला ग्रामविकासमंत्र्यांनी तत्त्वत: मान्यता दिल्याचा दावाही या प्रसिद्धीपत्रकात करण्यात आला आहे. याशिवाय विनाअट तालुक्याबाहेर आपसात बदली करावी, जेणे करून मागच्या वर्षी प्रशासकीय बदल्यांत गैरसोय झालेल्या शिक्षकांना पुन्हा त्यांच्या तालुक्यात येणे सोपे होईल, विनंती बदलीसाठी ३ वर्षांची अट असावी, महिला शिक्षकांना बदल्यांमध्ये सवलत द्यावी आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या. संघाचे औरंगाबाद तालुकाध्यक्ष रमेश जाधव, प्रवीण पांडे, राजेश पवार आदींनी हे पत्रक प्रसिद्घीस दिले आहे. (लोकमत ब्युरो)