शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

लोकशाहीची प्रक्रिया राबविणे कठीण; पण सर्वोत्तम : डेव्हिड हायमर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 20:06 IST

अमेरिकेच्या हवाई विद्यापीठातील शास्त्रज्ञ डेव्हिड हायमर यांचे प्रतिपादन

औरंगाबाद : जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतासारख्या विविधता असलेल्या देशात लोकशाहीची प्रक्रिया राबविणे कठीण काम आहे; पण हीच लोकशाही जनतेच्या विकासासाठी, स्वातंत्र्य, हक्कासाठी सर्वोत्तम असल्याचे मत अमेरिकेतील हवाई विद्यापीठातील मोल्युक्युलर बायॉलॉजीचे शास्त्रज्ञ प्रोफेसर डेव्हिड हायमर यांनी व्यक्त केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पॉल हार्बट सेंटर फॉर डीएनए बारकोडिंग संशोधन केंद्रात संशोधकांना ‘बायोडायर्व्हसिटी स्टडीज’ या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी डेव्हिड हायमर हे दहा दिवसांपासून विद्यापीठात वास्तव्याला आहेत. त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशात लोकशाहीसारखी किचकट, पण सर्वोत्तम प्रक्रिया राबविणे कठीण असते. पाच वर्षांनंतर प्रत्येक नागरिकाला स्वत:च्या मतानुसार सत्ताधारी निवडावा लागतो. यात वेळ, पैसा वाया जातो. मात्र, नागरिकांचे हक्क, स्वातंत्र्य अबाधित राहते. जर सत्ताधाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यास पुन्हा बदलण्याची संधी या लोकशाहीतील मतदानाद्वारे नागरिकांना मिळते. व्हिएतनाम देशात जेव्हा वास्तव्याला होतो, तेव्हा त्याठिकाणी लोकशाही नव्हती. नागरिकांना कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य नव्हते. साध्या जीवनावश्यक वस्तू बाळगणेही सरकारच्या मर्जीवर अवलंबून होते. त्यामुळे लोकशाही ही महत्त्वाची असते. 

सोशल मीडियाचा वापर नाहीसोशल मीडियाचा वापर किती केला जातो? या प्रश्नावर त्यांनी सांगितले, फेसबुक माहीत आहे; मात्र त्याचा वापर करीत नाही. भारतात येताना मुलीने व्हॉट्सअ‍ॅपसारखे अ‍ॅप संवाद साधण्यासाठी उपयुक्त असल्याचे सांगितले. तोपर्यंत व्हॉटस्अ‍ॅपविषयी माहिती नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मेलशिवाय इतर कोणत्याही बाबीसाठी सोशल मीडियाचा वापर केला जात नसल्याचेही डेव्हिड हायमर यांनी सांगितले.

हवाई बेट आणि मराठवाड्याच्या समस्या सारख्याचअमेरिकेतील हवाई बेट आणि मराठवाड्यातील पर्यावरण, पाणी, शेतीच्या समस्या जवळपास सारख्याच आहेत. या समस्या सोडविण्यासाठी तंत्रज्ञानाशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नाही. तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच शेती, पर्यावरणाच्या समस्या सोडविता येऊ शकतात. अमेरिकेत विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान, संशोधनाची गोडी लागावी यासाठी माध्यमिक शिक्षण घेतानाच अधिक प्रयत्न केले जातात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

औरंगाबादेत वाहन चालविणे कठीणऔरंगाबाद शहरात वाहतुकीचे नियम कोणीही पाळत नसल्याचे दिसून आले. यामुळे वाहन चालविण्याचा प्रयत्नच केला नाही. विद्यापीठातील डीएनए बारकोडिंगचे संचालक डॉ. गुलाब खेडकर यांनाच वाहन चालविण्यास सांगतो, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :democracyलोकशाहीProfessorप्राध्यापकDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद