शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
5
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
6
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
7
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
8
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
9
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
10
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
11
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
12
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
13
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
14
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
15
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
16
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
17
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
18
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
19
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
20
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाहीची प्रक्रिया राबविणे कठीण; पण सर्वोत्तम : डेव्हिड हायमर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 20:06 IST

अमेरिकेच्या हवाई विद्यापीठातील शास्त्रज्ञ डेव्हिड हायमर यांचे प्रतिपादन

औरंगाबाद : जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतासारख्या विविधता असलेल्या देशात लोकशाहीची प्रक्रिया राबविणे कठीण काम आहे; पण हीच लोकशाही जनतेच्या विकासासाठी, स्वातंत्र्य, हक्कासाठी सर्वोत्तम असल्याचे मत अमेरिकेतील हवाई विद्यापीठातील मोल्युक्युलर बायॉलॉजीचे शास्त्रज्ञ प्रोफेसर डेव्हिड हायमर यांनी व्यक्त केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पॉल हार्बट सेंटर फॉर डीएनए बारकोडिंग संशोधन केंद्रात संशोधकांना ‘बायोडायर्व्हसिटी स्टडीज’ या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी डेव्हिड हायमर हे दहा दिवसांपासून विद्यापीठात वास्तव्याला आहेत. त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशात लोकशाहीसारखी किचकट, पण सर्वोत्तम प्रक्रिया राबविणे कठीण असते. पाच वर्षांनंतर प्रत्येक नागरिकाला स्वत:च्या मतानुसार सत्ताधारी निवडावा लागतो. यात वेळ, पैसा वाया जातो. मात्र, नागरिकांचे हक्क, स्वातंत्र्य अबाधित राहते. जर सत्ताधाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यास पुन्हा बदलण्याची संधी या लोकशाहीतील मतदानाद्वारे नागरिकांना मिळते. व्हिएतनाम देशात जेव्हा वास्तव्याला होतो, तेव्हा त्याठिकाणी लोकशाही नव्हती. नागरिकांना कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य नव्हते. साध्या जीवनावश्यक वस्तू बाळगणेही सरकारच्या मर्जीवर अवलंबून होते. त्यामुळे लोकशाही ही महत्त्वाची असते. 

सोशल मीडियाचा वापर नाहीसोशल मीडियाचा वापर किती केला जातो? या प्रश्नावर त्यांनी सांगितले, फेसबुक माहीत आहे; मात्र त्याचा वापर करीत नाही. भारतात येताना मुलीने व्हॉट्सअ‍ॅपसारखे अ‍ॅप संवाद साधण्यासाठी उपयुक्त असल्याचे सांगितले. तोपर्यंत व्हॉटस्अ‍ॅपविषयी माहिती नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मेलशिवाय इतर कोणत्याही बाबीसाठी सोशल मीडियाचा वापर केला जात नसल्याचेही डेव्हिड हायमर यांनी सांगितले.

हवाई बेट आणि मराठवाड्याच्या समस्या सारख्याचअमेरिकेतील हवाई बेट आणि मराठवाड्यातील पर्यावरण, पाणी, शेतीच्या समस्या जवळपास सारख्याच आहेत. या समस्या सोडविण्यासाठी तंत्रज्ञानाशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नाही. तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच शेती, पर्यावरणाच्या समस्या सोडविता येऊ शकतात. अमेरिकेत विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान, संशोधनाची गोडी लागावी यासाठी माध्यमिक शिक्षण घेतानाच अधिक प्रयत्न केले जातात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

औरंगाबादेत वाहन चालविणे कठीणऔरंगाबाद शहरात वाहतुकीचे नियम कोणीही पाळत नसल्याचे दिसून आले. यामुळे वाहन चालविण्याचा प्रयत्नच केला नाही. विद्यापीठातील डीएनए बारकोडिंगचे संचालक डॉ. गुलाब खेडकर यांनाच वाहन चालविण्यास सांगतो, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :democracyलोकशाहीProfessorप्राध्यापकDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद