शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

उदासिनतेमुळे आरटीओ कार्यालयाची दुरवस्था

By admin | Updated: March 16, 2015 00:52 IST

अंबाजोगाई : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बंदच्या शिफारशीमुळे अंबाजोगाईकरांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. अधिकाऱ्यांच्या उदासीन भूमिकेमुळे कार्यालय सावरू शकले नाही

अंबाजोगाई : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बंदच्या शिफारशीमुळे अंबाजोगाईकरांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. अधिकाऱ्यांच्या उदासीन भूमिकेमुळे कार्यालय सावरू शकले नाही, असा आरोप होऊ लागला आहे. आजतागायत एकही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अंबाजोगाईत राहिले नाहीत. लातूरमध्ये राहूनच कार्यालयीन कामकाज हाकण्यात त्यांनी धन्यता मानली. नोव्हेंबर २००४ मध्ये अंबाजोगाईत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कार्यान्वित झाले. एम. एच. ४४ हा क्रमांक या कार्यालयाला प्राप्त झाला. शंभर किलोमीटरचा पल्ला गाठून कामे करण्याची मोठी नामुष्की या परिसरातील वाहनधारकांना करावी लागायची. तो प्रश्न या कार्यालयामुळे मार्गी लागला. अंबाजोगाई, परळी, केज, माजलगाव, धारूर, वडवणी, अशा सहा तालुक्यांचा समावेश या कार्यालयाकडे झाला. बहुतांश अधिकाऱ्यांनी लातूरहूनच कार्यालयाचा कारभार हाकला. दोन लिपिक व दलालांच्या हाती सोपविला होता. अनेकदा तर कागदपत्रांचे गठ्ठे जमा करून कर्मचारी व दलाल लातूराहून सह्या घेऊन यायचे. दहा वर्षात प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने कारवाईसाठी कसलेही पथक स्थापन झाले नाही. अथवा कोणत्या वाहनावर कारवाईही झाली नाही. महसूल जमा करणे व गाडयांची पासिंग व लायसन्सचे वितरण एवढेच असल्याचे अंबाजोगाईकरांनी पाहिले. कार्यालयाला स्वत:ची इमारतही मिळाली नाही. दरम्यान या कार्यालयातून महिन्याकाठी ८०० ते ९०० वाहनांच्या नोंदी होत आहेत. असे असतानाही कार्यालय गुंडाळण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे अंबाजोगाईकरांची गैरसोय होणार आहे. शेजारच्या तालुक्यांनाही झळ बसेल. (वार्ताहर) महसूल कमी येणे, गुंडगिरी, दादागिरी, पासिंगसाठी येणाऱ्या वाहनांची संख्या कमी असणे, वाहनांचे अधिकृत विके्रते नाहीत, कार्यालय सुस्थितीत आणण्यासाठी १५ कोटींचा भुर्दंड अशी विविध कारणे दाखवून उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बंद करण्याचा घाट अधिकाऱ्यांच्या हेकेखोरपणामुळे सुरू आहे. ४हा डाव हाणून पाडून संघर्षातून मिळालेले हे कार्यालय सुरू राहिल. यासाठी पुन्हा संघर्ष करू अशी प्रतिक्रिया डॉ. द्वारकादास लोहिया यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केली. ४जिल्हा निर्मितीसाठी असलेली आवश्यक कार्यालये अंबाजोगाईमध्ये आहेत. त्यात आरटीओचाही समावेश आहे. त्यामुळे हे कार्यालय कदापी बंद करू दिले जाणार नाही.