शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयाचे विद्रुपीकरण

By admin | Updated: December 18, 2014 00:41 IST

औरंगाबाद : देशभरात सर्वत्र स्वच्छता मोहीम राबविली जात असताना जिल्हाधिकारी कार्यालयात मात्र पोस्टर्स आणि बॅनर्सच्या माध्यमातून विद्रुपीकरण सुरू आहे.

औरंगाबाद : देशभरात सर्वत्र स्वच्छता मोहीम राबविली जात असताना जिल्हाधिकारी कार्यालयात मात्र पोस्टर्स आणि बॅनर्सच्या माध्यमातून विद्रुपीकरण सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे कार्यालयाच्या भिंतीवर ठिकठिकाणी सर्रासपणे पोस्टर्स, बॅनर्स लावले जात आहेत. अगदी हॉटेलची जाहिरात करणारे फलकही येथील भिंतीवर झळकत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर १५ आॅगस्टपासून देशभरात स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयही यामध्ये मागे नाही. परिसरातील कचरा आणि घाण उचलून अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत आपला सहभाग नोंदविला; पण दुसरीकडे कार्यालयाच्या इमारती मात्र पोस्टर्स आणि बॅनर्सनी अस्वच्छ झाल्या आहेत. जिल्ह्याचे प्रमुख सत्ताकेंद्र असलेल्या या कार्यालयाच्या भिंतींवर राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि चित्रपटांचे पोस्टर्स चिकटवण्यात आलेले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार, सेतू सुविधा केंद्र, सातबारा वाटपाच्या खिडक्या आणि परिसरात बंद अवस्थेत उभ्या असलेल्या गाड्यांवरही असे पोस्टर्स चिकटविलेले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाप्रमाणेच या परिसरात असलेल्या इतर कार्यालयांचीही अवस्था अशीच आहे. जलसंधारण महामंडळाचे प्रवेशद्वार, इमारतीचे पिलर्स, तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय येथेही सर्रासपणे पोस्टर्स आणि बॅनर्स चिकटविण्यात आले आहेत. पोस्टरबाजांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील जनरेटही सोडलेले नाही.