शहरं
Join us  
Trending Stories
1
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
2
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
3
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
4
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
5
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
6
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
7
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
8
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
9
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
10
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
11
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
12
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
13
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
14
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
15
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
16
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
17
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
18
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
19
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
20
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

By admin | Updated: August 22, 2014 00:18 IST

औरंगाबाद : भाजपापाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही दुष्काळाचा मुद्दा उचलून धरला आहे.

औरंगाबाद : भाजपापाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही दुष्काळाचा मुद्दा उचलून धरला आहे. मराठवाड्यातील शेतकरी दुष्काळाने होरपळून निघत आहेत. त्यामुळे सरकारने मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा तसेच शेतकऱ्यांकडील संपूर्ण कर्ज आणि वीज बिल माफ करावे, अशी मागणी मनसेच्या वतीने आज पत्रकार परिषदेत करण्यात आली. शासनाने तातडीने हा निर्णय न घेतल्यास तालुका, जिल्हा आणि विभागीय स्तरावर आंदोलन केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. मनसेचे नेते सुभाष पाटील, जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, डॉ. सुनील शिंदे, बाबासाहेब डांगे, शहराध्यक्ष सुमित खांबेकर, नगरसेवक राज वानखेडे आदींनी आज दुष्काळाच्या प्रश्नावर पक्षाची भूमिका मांडली. सुभाष पाटील म्हणाले की, मराठवाड्याला गोदावरी आणि कृष्णा या दोन्ही खोऱ्यांतील पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे दरवर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. शहराध्यक्ष सुमित खांबेकर म्हणाले की, सर्व तहसील कार्यालयांमध्ये पक्षाने निवेदने दिली आहेत. तरीही शासनाकडून ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे आता मनसेने या विषयावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेच्या शिष्टमंडळाने प्रभारी जिल्हाधिकारी किसनराव लवांडे यांना निवेदन सादर केले. शेतकऱ्यांचे शेतीविषयीचे सर्व कर्ज माफ करावे, शेतकऱ्यांचे वीज बिल शंभर टक्के माफ करावे, वरच्या धरणातून जायकवाडीत तातडीने पाणी सोडावे, पावसाअभावी वाया गेलेल्या पेरणीच्या खर्चाची भरपाई देण्यात यावी इ. मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.