शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

‘रेणा’ बॅरेजेसच्या पाण्यात घट

By admin | Updated: January 9, 2017 23:30 IST

रेणापूर : जानेवारी उजाडताच पाणी पातळी झपाट्याने घटत चालली आहे़

रेणापूर : शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावे म्हणून रेणा नदीवर बांधण्यात आलेल्या बॅरेजेसमध्ये यंदा मुबलक पाणीसाठा झाला़ मात्र जानेवारी उजाडताच पाणी पातळी झपाट्याने घटत चालली आहे़ परिणामी जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरच भेडसावणार आहे, अशी परिस्थिती सध्या तरी दिसून येत आहे़ रेणापूर तालुक्यातील रेणा नदी व जवळच्या मांजरा नदीवर बॅरेजेस बांधण्यात आले़ तसेच या नदीचे मोठ्या प्रमाणात खोलीकरणही करण्यात आले़ रबीमध्ये हरभरा, ज्वारी, गहू आदी पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात केली़ पिके जोमात आली असली, तरी पुढे पिकांना पाणी मिळेल की नाही, याची शाश्वती नसल्याने शेतकरीही हवालदिल झाले आहेत़ जानेवारीच्या सुरुवातीलाच या बॅरेजेसमधील पाणी पातळी ५० टक्केपेक्षा जास्त प्रमाणात घटली आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले जाते की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे़ रेणा नदीवर रेणापूर, घनसरगाव, जवळगा या ठिकाणी बॅरेजेस बांधण्यात आले़ परंतु या बॅरेजच्या पाण्यात मोठी घट झाली आहे़ शेतीसाठी पाण्याची सुविधा उपलब्ध होईल, अशी शेतकऱ्यांची आशा दुरावण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ बॅरेजेसमधून रेणापूर शहराला पाणीपुरवठा केला जातो़