शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

विद्यार्थीसंख्येत झाली घट; शाळेने ३२ शिक्षक व कर्मचाऱ्यांना कामावरून काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 7:13 PM

संतप्त शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी स्वामी विवेकानंद अकादमीच्या व्यवस्थापनाला विचारला जाब

ठळक मुद्देया शाळेतील २१ शिक्षक व ११ कर्मचारी मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळेतील  कायम विनाअनुदानित तत्त्वावर आहेत. न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचा इशारा ३२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिला आहे. 

औरंगाबाद : विद्यार्थीसंख्येतील घट व परिणामी संचमान्यतेसाठी कार्यभार, पद उपलब्ध नसल्याने चिकलठाणा एमआयडीसीतील स्वामी विवेकानंद अकॅडमीच्या व्यवस्थापनाने तीन महिन्यांचे मूळ वेतन देत ३२ जणांची सेवा समाप्त केली. त्यामुळे या शाळेत चार तास गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलिसांना पाचारण करून प्रकरण हाताळण्यात आले. 

या शाळेतील २१ शिक्षक व ११ कर्मचारी मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळेतील  कायम विनाअनुदानित तत्त्वावर आहेत. तीन वर्षांपासून पटसंख्येत घट झाल्याने उपरोक्त पदांना मान्यता नाही.  त्यामुळे त्यांना  कमी केल्याची मुख्याध्यापकांच्या हस्ताक्षरांतील पत्रे शाळा व्यवस्थापनाने सोमवारी कर्मचाऱ्यांच्या घरी स्पीड पोस्टाने पाठवून दिल्याने मंगळवारी शाळेसमोर गोंधळ झाला.

दाद मागणारव्यवस्थापन स्वत:च मराठी माध्यमाला प्रवेश देत नाही. आम्हाला  हेतुपुरस्सर काढण्यात आले आहे. आमचा हक्क मागण्यासाठी आम्ही शिक्षण विभाग, तसेच न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचा इशारा ३२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिला आहे. 

हा निर्णय व्यवस्थापनाचा अकॅडमीच्या व्यवस्थापकीय मंडळाने हा निर्णय घेतलेला असून, त्यांनी नोटीसमध्ये सेवासमाप्तीचे कारणही दिलेले आहे. त्यानुसार ही कारवाई करण्यात आलेली आहे. यात  स्थानिक मंडळाचा यात काय हेतू असू शकतो. - सत्यनारायण जैस्वाल, (व्यवस्थापक, स्वामी विवेकानंद अकॅ डमी)  

अद्याप कोणीही तक्रार घेऊन आले नाही विवेकानंद अकॅडमीत घडलेल्या या प्रकरणाबाबत माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांनी सांगितले की, अद्याप शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाबाबत आमच्याकडे मंगळवारपर्यंत तरी तक्रार केली नाही. मात्र, अनेक दिवसांपासून शाळेत वाद सुरू आहे. ही संस्था उच्च न्यायालयाच्या आदेशाचेही पालन करीत नाही. १९९४ पासून ही शाळा सुरू आहे. शाळा अनुदानावर आल्यानंतरदेखील या संस्थेने ते नाकारले. प्रशासन म्हणून आम्ही त्या शाळेतील कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करू. - डॉ. बी.बी. चव्हाण (माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी)

टॅग्स :Teacherशिक्षकSchoolशाळाStudentविद्यार्थीAurangabadऔरंगाबाद