शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
3
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
5
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
6
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
7
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
8
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
9
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
10
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
11
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
12
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
13
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
14
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
15
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
16
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
17
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
18
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
19
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
20
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे

Coronavirus Unlock : दिलासादायक ! तब्बल तीन महिन्यांनंतर औरंगाबादमधून विमानाचे 'उड्डाण'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 3:41 PM

या विमानसेवेमुळे शहराला मोठा दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देउद्योग, व्यापाराला दिलासा दिल्लीहून आले ५१ प्रवासीऔरंगाबादहून दिल्लीला २९ प्रवासी रवाना

औरंगाबाद : औरंगाबादकरांची विमानसेवा पुन्हा सुरु होण्याची प्रतीक्षा अखेर संपली आहे. तब्बल ३ महिन्यानंतर शुक्रवारी इंडिगोच्या दिल्ली - औरंगाबाद विमानाने दुपारी २.२० वाजता ५१ प्रवासी शहरात दाखल झाले. तर २९ प्रवासी औरंगाबादहून दिल्लीला रवाना झाले. या विमानसेवेमुळे शहराला मोठा दिलासा मिळाला आहे.

तब्बल ३-महिन्यांनंतर विमानतळ प्रवाशांच्या गर्दीने गजबजले. विमानतळावर दाखल प्रत्येक प्रवाशाच्या शरीराच्या तापमानाची विमानतळावर तपासणी करण्यात आली. तसेच त्यांना सायनिटायजर, फेश शिल्ड देण्यात आली. दुपारी ३.१० वाजता या विमानाने दिल्लीसाठी टेकऑफ घेतले. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने गेल्या ३ महिन्यांपासून विमानसेवा बंद होती. औरंगाबादहून जुलैपासून विमामांचे उड्डाण सुरू करण्याचे नियोजन इंडिगोने केले होते. मुंबई, दिल्ली, हैदराबाद आणि बंगळुरूसाठी या कंपनीकडून जुलैपासून बुकिंगदेखील सुरू करण्यात आली. 

जुलै ऐवजी जूनपासून औरंगाबादहून विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी उद्योजक सुनीत कोठारी यांनी इंडिगोकडे केली होती. उद्योग, व्यापारासाठी विमानसेवा लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी उद्योजकांनी केली. अखेर इंडिगोने दिल्ली- औरंगाबाद - दिल्ली या हवाई मार्गावर शुक्रवारपासून उड्डाण सुरू केले. हे विमान दिल्लीहून रोज दुपारी १२.२५ वाजता उड्डाण घेईल आणि दुपारी २.२० वाजता औरंगाबादेत दाखल होईल. त्यानंतर हे विमान दुपारी ३.१० वाजता औरंगाबादहून उड्डाण घेईल आणि सायंकाळी ५.०५ वाजता दिल्लीत दाखल होईल.

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकcorona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादdelhiदिल्ली