शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

१३ हजार घरकुले पूर्ण

By admin | Updated: September 5, 2014 00:08 IST

नांदेड : बीएसयुपी योजनेतंर्गत शहरात १३ हजार घरकुले पूर्ण झाली असून मार्च २०१५ पर्यंत ६ हजार ६३९ घरकुलांची कामे पूर्ण करण्याचे आव्हान मनपासमोर आहे़

नांदेड : बीएसयुपी योजनेतंर्गत शहरात १३ हजार घरकुले पूर्ण झाली असून मार्च २०१५ पर्यंत ६ हजार ६३९ घरकुलांची कामे पूर्ण करण्याचे आव्हान मनपासमोर आहे़झोपडपट्टी मुक्त शहराच्या निर्मितीसाठी गोरगरिबांना राहण्यासाठी पक्के घरे देण्याचा महत्वकांक्षी प्रकल्प शहरातील १६८ भागात राबविण्यात येत आहे़ मागील तीन वर्षापासून ही योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी जिव्हाळ्याची बनली आहे़ अनेक अडथळ्यांची मालिका पूर्ण करीत ही योजना उद्दिष्ट पूर्ण करण्याकडे वाटचाल करीत आहे़ शहरात एकूण २७ हजार ९८५ घरकुले बांधण्याचे उद्दिष्ट आहे़ त्यापैकी सध्या १३ हजार घरकुले बांधून पूर्ण झाले आहेत़ तर १६ हजार २१० घरकुलांना मार्कआऊट दिले आहे़ २ हजार ५० लाभार्थी स्वत: बांधकाम करत असून त्यापैकी १ हजार १५० घरे पूर्ण झाले आहेत़ एनटीसी मिल एरियात ५ हजार १३२ घरकुलांचा प्रश्न अद्याप सुटला नाही़ योजनेचा कालावधी संपल्याने हा प्रकल्प रद्द करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले़ मार्च २०१५ पर्यंत २२ हजार ८४९ घरकुले पूर्ण करण्याचा संकल्प मनपाचा आहे़ त्यामुळे राज्यात सर्वाधिक घरकुले बांधण्याचा विक्रम नांदेड महापालिका करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे़ सागंवी भागातील गौतमनगरात २ एकर जागेस शासनाने नुकतीच मंजुरी दिली असून त्याठिकाणी सहाशे घरकुले बांधण्यात येणार आहेत़ रेल्वे स्टेशन परिसर, कॅनॉलरोड व गौतमनगरातील पुनर्वसित लाभार्थ्यांना याठिकाणी घरकुले देण्यात येणार आहेत़ गौतमनगरात १२ बहुमजली इमारतीत २१६ फ्लॅटचे काम पूर्ण झाले असून त्याठिकाणी लाभार्थी राहत आहेत़ ब्रह्मपुरी येथील कामे ठप्पबीएसयुपी योजनेतंर्गत घरकुलांचे कामे जलदगतीने सुरू असतानाच ब्रह्मपुरी येथील घरकुलांचे कामे मात्र रेंगाळली आहेत़ तत्कालीन आयुक्त जी़ श्रीकांत यांच्या बदलीनंतर याभागातील कामांची गती मंदावली आहे़ त्यामुळे लाभार्थी अडचणीत सापडले आहेत़ (प्रतिनिधी)लालवाडीत १२ घरकुलांचे वाटपरेल्वे विभागाकडून विकास कामे करताना लालवाडी भागातील रेल्वेलाईन लगत राहणाऱ्या गोरगरीब नागरिकांची घरे काढण्यात आली होती़ त्यामुळे येथील नागरिकांच्या घरांचा प्रश्न समोर होता़ तेव्हा उघड्यावर पडलेल्या या कुटुंबांना महापालिकेने आधार दिला़ बीएसयुपी योजनेतंर्गत लालवाडी येथील १२ कुटुंबांना गुरूवारी घरे वाटप करण्यात आली़ यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दाटला़ महापौर अब्दुल सत्तार यांच्या हस्ते घरकुलांचे वाटप करण्यात आले़ यावेळी नगरसेविका अंजली गायकवाड, बाळासाहेब देशमुख, येवनकर, सरजितसिंघ गील, बीएसयुपी विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांची उपस्थिती होती़