शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कमी दरानेच नुकसानभरपाई; रद्द केलेला GR पुन्हा लागू होणार का?

By विकास राऊत | Updated: September 9, 2025 15:05 IST

माझ्या काळात ४५ कोटींची नुकसानभरपाई दिली होती: उपमुख्यमंत्री शिंदे

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मी मुख्यमंत्री असताना ४५ हजार कोटींची भरपाई दिली होती, असे सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२४ चा जीआर रद्द केला, तो पुन्हा लागू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलणार काय, या प्रश्नाचे उत्तर देणे खुबीने टाळले. यामुळे यंदा शेतकऱ्यांना जुन्या अर्थात कमी दराने नुकसानभरपाई मिळणार हे स्पष्ट झाले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी छत्रपती संभाजीनगरात आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांना जानेवारी २०२४ चा नुकसानभरपाईचा जीआर गैरलागू केल्याप्रकरणी ‘लोकमत’ प्रतिनिधीने विचारले असता, सरकार शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, असे मोघम उत्तर त्यांनी दिले.

मराठवाड्याची सद्य:स्थिती

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात सुमारे १५ लाख ७८ हजार ३३ शेतकऱ्यांनी केलेल्या पेरण्या हातून गेल्या आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात मदतीचे निकष बदलून दुप्पट दराने नुकसानभरपाईचा निर्णय झाला होता. तो निर्णय जून २०२५ मध्ये विद्यमान सरकारने बदलला. मार्च २०२३ च्या निर्णयाप्रमाणे नुकसानभरपाईचे दर लागू केल्यामुळे यावर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अत्यल्प नुकसानभरपाई मिळणार आहे. पेरणीसह बियाणे, खतांच्या किमतीमध्ये वाढ झालेली असताना जुन्या दरामुळे मिळणारी भरपाई तुटपुंजी असेल.

किती असेल फरक?२०२३ च्या निर्णयाप्रमाणे नुकसानभरपाई दिल्यास ती साधारणत: ११०० कोटी रुपयांची मिळेल. तर २०२४ च्या जीआरप्रमाणे भरपाई मिळाली तर ती १७०० कोटींपर्यंत आकडा जातो. सुमारे ६०० कोटींचा फरक या दोन जीआरमध्ये आहे.

मराठवाड्यात यंदा झालेले पिकांचे नुकसान असे......जिरायत....१२ लाख ३६ हजार ३०१ हेक्टर.......बागायत...३ हजार ८९ हेक्टरफळपीक...६ हजार ८७८ हेक्टरएकूण.....१२ लाख ४६ हजार २४९ हेक्टर

नुकसानीचा प्रकार ...........१ जाने. २०२४ चा निर्णय...................यंदाची नुकसानभरपाई या दरानेजिरायत......................१३६०० रु. प्रति हेक्टर, ३ हेक्टरपर्यंत............८५०० रु. प्रति हेक्टर २ हेक्टर मर्यादेत.बागायत......................२७ हजार रु. प्रति हेक्टर, ३ हेक्टर मर्यादेत.........१७ हजार रु. प्रति हेक्टर २ हेक्टर मर्यादेत.बहुवार्षिक पिके................३६ हजार रु.प्रति हेक्टर ३ हेक्टर मर्यादेत.....२२५०० रु. प्रति हेक्टर २ हेक्टर मर्यादेत.

किती गावांतील किती शेतकऱ्यांचे नुकसान..?जिल्हा.......................गावे................शेतकरी............किती पंचनामेछत्रपती संभाजीनगर.......५५................४०६६..................६१ टक्केजालना.....................१८४................२७६५९...............०० टक्केपरभणी....................३१९................१४३१३५.................८२ टक्केहिंगोली......................७०३.............१७२५७७.................७८ टक्केनांदेड.........................१३२६.........६५५४१५...................७० टक्केबीड..........................२०६...............४२८९५.................७० टक्केलातूर......................७८२................३६४५५१................०.५९ टक्केधाराशिव...................३६४.................१६७७३५...............४३ टक्केएकूण......................३९२९...............१५७८०३३...............४५ टक्के

टॅग्स :Rainपाऊसchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर