शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
2
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
3
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
4
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
5
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
6
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
7
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
8
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
9
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
10
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
11
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
12
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झालीय? घाबरू नका, 'या' सोप्या ट्रिकने तुमचे पैसे परत मिळणार!
13
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
14
कुत्र्यापासून वाघांना धोका; कान्हा व्याघ्र प्रकल्पात ‘T-141’ वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा मृत्यू
15
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
16
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
17
फुल क्रीम की टोंड मिल्क? तुमच्या आरोग्यासाठी कोणतं दूध चांगलं? खरेदी करण्यापूर्वी 'हे' फरक नक्की जाणून घ्या
18
Ahilyangar: "घर बांधण्यासाठी माहेरहून ४ लाख रुपये आण" सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल
19
वॉशिंग मशीन वापरताना 'ही' चूक टाळा; कपडे होतील लवकर खराब, खिशालाही लागेल कात्री
20
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांनी दिला धक्का जाता जाता

By admin | Updated: September 4, 2014 00:56 IST

आयुक्तांनी दिल्लीतील संस्थेला कंत्राट देऊन सेना नेत्यांना जाता-जाताही ठेंगा दाखविला आहे.

औरंगाबाद : महापालिकेच्या भूमिगत गटार योजनेमध्ये मर्जीतल्या कंत्राटदाराला कंत्राट मिळवून देण्यात अपयश आल्यानंतर शिवसेना नेत्यांनी एलईडी पथदिव्यांचे कंत्राट पुण्यातील संस्थेला मिळावे, यासाठी आयुक्त डॉ.हर्षदीप कांबळे यांच्यावर दबाव टाकला होता. मात्र, आयुक्तांनी दिल्लीतील संस्थेला कंत्राट देऊन सेना नेत्यांना जाता-जाताही ठेंगा दाखविला आहे. स्थायी समितीच्या आजच्या बैठकीत ११२ कोटी रुपयांचे पथदिवे बसविण्याचे कंत्राट इलेक्ट्रॉन लायटिंग सिस्टीम्स प्रा.लि., आणि पॅरागॉन केबल इंडिया (जॉइंट व्हेंचर) या संस्थेला देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
खा.चंद्रकांत खैरे गटाला आ. संजय शिरसाट गटाने पथदिव्यांच्या कंत्राटात जोरदार शॉक दिल्याची चर्चा आहे. समांतर जलवाहिनीचे कंत्राट खाजगी संस्थेला दिल्यानंतर शहर उजळवण्यासाठीही बीओटीवर कंत्राट देण्यात आले आहे. सभापती विजय वाघचौरे व सदस्यांचे मत ऐकून प्रस्तावाला मंजुरी दिली. १९ महिन्यांच्या काळात आयुक्तांनी दोन वेळेस स्थायी समितीच्या बैठकीला हजेरी लावली.
अशी आहे निविदा
४० हजार एलईडी पथदिवे लावण्यासाठी ८६ कोटी ९३ लाख १७ हजार ४०० रुपये, इन्फास्ट्रक्चर विकसित करण्यासाठी २५ कोटी २८ लाख ५० हजार ६८० रुपये. दोन्ही मिळून ११२ कोटी २१ लाख ६८ हजार रुपये. बीओटी कालावधी ९६ महिन्यांचा असेल. ३ महिन्यांचा प्रिपेटरी कालावधी आहे. २ कोटी ७२ लाख रुपये दरमहा कं त्राटदाराला मनपा देईल.
मनपाच्या फायद्याचा दावा
पथदिवे बसविण्यासाठी पालिकेला २६१ कोटी १२ लाख रुपये लागले असते. १० वर्षांत ४४ कोटी ५७ लाख रुपयांचे वीजबिल द्यावे लागले असते. देखभाल दुरुस्तीसाठी ९ कोटी १२ लाख असे ३१४ कोटी ८१ लाख ९२ हजार पालिकेला लागले असते.
सदस्य तुपे, काशीनाथ कोकाटे म्हणाले, मनपाने सध्या उभारून ठेवलेल्या खांबांचे व इतर साहित्याचे काय होणार आहे. यावर शहर अभियंता पानझडे म्हणाले, पथदिवे काढून गोदामात जमा करून त्याचा लिलाव होईल.
कंत्राटदार काय करणार
पथदिव्यांचे कंत्राट घेतलेली कंपनी वीज बचत करणार आहे. पथदिव्यांचे वीजबिल ३८ लाखांच्या वर गेल्यास कंत्राटदार स्वत: रक्कम भरेल. दरमहा २ कोटी ७२ लाख रुपये कंत्राटदाराला पालिका अदा करील. जुनी यंत्रणा अपडेट करील.
सध्या १ कोटी रुपये वीजबिल मनपा भरते. रोज पथदिवे सुरू व बंद करण्याची जबाबदारी कंत्राटदाराकडे असेल. पथदिव्यांच्या खांबांवरील जाहिरातांचे उत्पन्न कंत्राटदाराला मिळेल.
शहरातील मुख्य रस्त्यावरील खांब बदलणे, स्वीच बॉक्स, केबल टाकण्याचे काम १ वर्षात कंत्राटदार करील. त्यानंतर वॉर्डातील इन्फ्रा बदलण्याचे काम सुरू होईल. असे शहर अभियंता पानझडे यांनी सांगितले.
जातानाही दिला दणका
मावळते आयुक्त डॉ.कांबळे आणि खा. खैरे यांचे १९ महिन्यांत कधीही जमले नाही. जातीवादाचे, समांतर जलवाहिनी योजनेच्या विरोधात असल्याचे खापर आयुक्तांवर वारंवार फोडण्यात आले. भूमिगत गटार योजनेत एल अ‍ॅण्ड टी या संस्थेच्या बाजूने सत्ताधारी होते; मात्र आयुक्तांनी खिल्लारी इन्फ्रा या संस्थेला कंत्राट दिले.
पथदिव्यांच्या कंत्राटातही पुण्याच्या एका संस्थेसाठी सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न केले; मात्र ती संस्था शर्यतीत पुढे आलीच नाही. आयुक्तांनी जाता-जाता सत्ताधाऱ्यांना दणका दिल्याचे स्पष्ट झाले. पथदिव्यांचे कंत्राट घेतलेली कंपनी दिल्लीची असून सेना नेत्यांची त्या संस्थेने दिल्लीत साधी भेटही घेतली नाही. त्याचीही खंत सत्ताधाऱ्यांच्या एका गटात आहे.