शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

थंडीचे रेकॉर्ड ब्रेक; तापमान ८ अंश

By admin | Updated: December 27, 2015 00:26 IST

औरंगाबाद : उत्तर भारताच्या थंडीचा प्रकोप मराठवाड्यावरही होत असून, मागील आठ दिवसांपासून किमान तापमानात कमालीची घसरण सुरू आहे.

औरंगाबाद : उत्तर भारताच्या थंडीचा प्रकोप मराठवाड्यावरही होत असून, मागील आठ दिवसांपासून किमान तापमानात कमालीची घसरण सुरू आहे. शनिवारी रात्री औरंगाबादचे तापमान ८ अंश सेल्सिअसपर्यंत उतरले. या तापमानाने मागील नऊ वर्षांचे रेकॉर्ड मोडले. २००५ मध्ये २६ डिसेंबर रोजी औरंगाबादचे किमान तापमान ७ अंश सेल्सिअस होते. थंडी हळूहळू वाढू लागल्याने नागरिकांना अक्षरश: हुडहुडी भरत आहे.दिवाळीनंतर थंडी वाढते असे नेहमी बुजुर्ग मंडळी सांगत असतात. मात्र, मागील काही वर्षांपासून निसर्गाचे चक्रही बिघडत चालले आहे. यंदा थंडीचे उशिराने आगमन झाले. डिसेंबरअखेर थंडीचा प्रकोप असह्य होऊ लागला आहे. औरंगाबादचे किमान तापमान चार दिवसांपूर्वी १३ अंश सेल्सियसपर्यंत होते. शुक्रवारी तापमान थेट ९ अंशांवर आले, शनिवारी तर थंडीने कहरच केला. तापमान थेट ८ अंशांवर उतरले. तापमानातील ही घसरण आणखी वाढू शकते असा अंदाज हवामान विभागाचा आहे. नीचांकी तापमानामुळे शहरवासीयांना हुडहुडी भरली असून, दिवसभर गारठ्याचे वातावरण जाणवू लागले आहे. तापमानाचा पारा खाली उतरला तसे या वातावरणामुळे अनेक जण आजारी पडत आहेत. सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी आदी आजारांमुळे नागरिक त्रस्त आहेत. या संसर्गजन्य आजाराच्या उपचारासाठी दवाखान्यांत गर्दी वाढली आहे. विशेषत: लहान मुले आणि ज्येष्ठ मंडळींमध्ये आजाराचे प्रमाण वाढले आहे. पहाटे, सकाळी आणि रात्रीच्या वेळी कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. या काळात ऊबदार आणि गरम कपडे घालूनच बाहेर पडणे नागरिक पसंत करीत आहेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक जण शेकोटीचाही आधार घेत आहेत. थंडीमुळे सायंकाळनंतर शहरातील वाहतूक आणि बाजारपेठेतील वर्दळीवरही परिणाम दिसून येत आहे. हिवाळ्यातील वातावरण आरोग्यदायी मानले जात असल्याने या काळात सकाळी उठून जॉगिंग, योगा, व्यायाम करण्यास प्राधान्य दिले जाते. एरवी कधीही व्यायाम न करणारेदेखील थंडीच्या काळात शुद्ध हवा घेण्यासाठी घराबाहेर पडत असतात. कडाक्याची थंडी पडल्याने जॉगिंग, योगा, व्यायाम यामध्येही नागरिकांचा खंड पडत आहे.२६ डिसेंबर रोजीचे रेकॉर्डवर्षेकमाल किमान तापमान२००५२६०७ अंश२००६२८१२२००७३२१६२००८३०११२००९२७०९२०१०२८११२०११३०११२०१२२८०९२०१३२७१४२०१४२६१३२०१५२६०८नीचांकी तापमानामुळे शहरवासीयांना हुडहुडी भरली असून, दिवसभर गारठ्याचे वातावरण जाणवू लागले आहे. तापमानाचा पारा खाली उतरला तसे या वातावरणामुळे अनेक जण आजारी पडत आहेत. सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी आदी आजारांमुळे नागरिक त्रस्त आहेत. या संसर्गजन्य आजाराच्या उपचारासाठी दवाखान्यांत गर्दी वाढली आहे. विशेषत: लहान मुले आणि ज्येष्ठ मंडळींमध्ये आजाराचे प्रमाण वाढले आहे. पहाटे, सकाळी आणि रात्रीच्या वेळी कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. या काळात ऊबदार आणि गरम कपडे घालूनच बाहेर पडणे नागरिक पसंत करीत आहेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक जण शेकोटीचाही आधार घेत आहेत. थंडीमुळे सायंकाळनंतर शहरातील वाहतूक आणि बाजारपेठेतील वर्दळीवरही परिणाम दिसून येत आहे. हिवाळ्यातील वातावरण आरोग्यदायी मानले जात असल्याने या काळात सकाळी उठून जॉगिंग, योगा, व्यायाम करण्यास प्राधान्य दिले जाते.