शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
2
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
3
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
4
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
5
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
6
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
7
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
8
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
9
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
10
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
11
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
12
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
13
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
14
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
15
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
17
अनिल अंबानींच्या एडीए समूहावर छापा; 'सर्च वॉरंट'च्या आधारे कारवाईचा बडगा
18
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
19
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
20
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा तलाठ्यास घेराव

By admin | Updated: June 27, 2014 00:16 IST

हिंगोली : गारपिटीत नुकसान होवूनही अनुदानाच्या यादीत नावे नसल्याने संतप्त झालेल्या भिरडा येथील ५० उत्पादकांनी गुरूवारी तलाठी धाबे यांना घेराव घातला.

हिंगोली : गारपिटीत नुकसान होवूनही अनुदानाच्या यादीत नावे नसल्याने संतप्त झालेल्या भिरडा येथील ५० उत्पादकांनी गुरूवारी तलाठी धाबे यांना घेराव घातला. त्यावेळी नव्याने नावे समाविष्ट करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी हा घेराव मागे घेतला. गुरूवारी रात्री उशिरापर्यंत वंचित उत्पादकांची यादी बनविण्याचे काम सुरू होते.
फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीत भिरडा येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यावेळी झालेल्या सर्व्हेक्षणातील अनुदानाची गुरूवारी यादी पाहिल्यानंतर वंचित उत्पादकांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून आली. प्रचंड नुकसान होवूनही अनुदानाच्या यादीत नावे नसल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सकाळी ८ वाजता हिंगोली तहसील कार्यालय गाठले. शेतकऱ्यांनी तलाठ्यास बोलावून विचारपूस केल्यानंतर धाबे कार्यायातून निघून गेले. दरम्यान तलाठी धाबे दिवसभर तहसीलला परतले नाहीत. सायंकाळी पाच वाजेपर्यंत वाट पाहिल्यानंतर काही उत्पादकांनी घरी जावून धाबे यांना बोलावून घेतले. तलाठी कार्यालयात येताच जवळपास ५० उत्पादकांनी धाबे यांना घेराव घातला.
नावे समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी शेतकरी प्रल्हाद थोरात, पांडुरंग थोरात, प्रकाश पठाडे, सोनाजी गायकवाड, शिवाजी थोरात, माणिक शिंदे, मनोहर पठाडे, राजू पठाडे, रामजी पठाडे यांच्यासह अनेक शेतकरी आक्रमक झाले. ही माहिती मिळताच जि. प. चे उपाध्यक्ष उद्धवराव गायकवाड, हिंगोली पं. स. चे उपसभापती विनोद नाईक हे तहसील कार्यालयात दाखल झाले. त्यांच्यासमवेत तलाठी धाबे यांनी नव्याने यादी तयार करून वंचितांची नावे समाविष्ट करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. (प्रतिनिधी)