शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
5
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
6
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
7
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
8
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
9
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
10
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
11
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
12
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
13
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
14
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
15
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
16
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
17
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
18
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
19
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
20
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरण, दिवसभर हवेत गारवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:09 IST

केळगाव : सिल्लोड तालुक्यातील केळगाव, आधरवाडी, कोल्हाळा, तांडा, पिंपळगाव घाट परिसरात दोन- तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकरी ...

केळगाव : सिल्लोड तालुक्यातील केळगाव, आधरवाडी, कोल्हाळा, तांडा, पिंपळगाव घाट परिसरात दोन- तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. खरीप हंगाम तर गेला आता रबीवरही आलेले संकटही तोंडचा घास हिसकावून घेतो की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ढगाळ वातावरणात सुटलेला गारवा हा रबी पिकांसाठी धोकादायक ठरत आहे. कारण अचानक सुरू होत असलेला रिमझिम पाऊस तर काही वेळा झालेला अवकाळी पाऊस पिकांच्या मुळावर येऊन बसला आहे. पिकावर विविध रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने रबी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी, मका, कांदे या पिकांवर मोठ्या प्रमाणावर मवा, तुडतुडा व तसेच मर रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे.

सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले

ढगाळ वातावरणात दिवसभर गारवा निर्माण झाल्याने सर्वत्र हुडहुडीचे वातावरण आहे. त्यामुळे केळगाव परिसरातील विविध गावांत सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले आहेत.

फोटो

: सिल्लोड तालुक्यातील केळगाव परिसरातील ज्वारी पीक बहरले असून दोन तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने हे पीक धोक्यात आले आहे.