शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

सरासरी पर्जन्यमान इतिहासजमा; जलयुक्त, जलपुनर्भरण झालेल्याच वर्षी पाणीपातळीत वाढ

By संदीप शिंदे | Updated: March 28, 2024 16:55 IST

उदगिरात ३५ टक्क्यांनी पर्जन्यमान घटले, जलपुनर्भरणाकडे नागरिकांचे होतेय दुर्लक्ष...

उदगीर : तालुक्यात गेल्या ३५ वर्षांत केवळ पाच-सहा वेळा जलयुक्त व जलपुनर्भरणाची कामे झाली. तेव्हाच पाणी पातळीत वाढ होऊन तालुका टँकरमुक्त झालेला होता. पाण्याची ओरडही कमी झाली होती. मात्र, पर्यावरणाच्या विनाशामुळे उदगीरचे सरासरी पर्जन्यमान इतिहासजमा होण्याची चिन्हे दिसत आहेत. मागच्या ५८ वर्षांच्या पर्जन्यमानाचा आढावा घेतला असता उदगीर तालुक्यात तब्बल ४३ वर्षे सरासरी इतका पाऊस झालेला नाही.

उदगीर तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ८५० ते ९०० मि.मी. एवढे आहे. १९६५ पासून केवळ १३ वर्षेच एक हजार मि.मी.च्या वर पाऊस होऊन तालुक्याने पावसाची सरासरी ओलांडली होती. १९७१ साली ३८९ मि.मी. व १९७२ साली केवळ १७९ मि.मी. एवढाच पाऊस झाला होता. ही दोन्ही वर्षे दुष्काळी वर्षे म्हणून प्रसिद्ध होती. १९८६, १९९२, १९९४ सालीही या तालुक्यात ५०० मि.मी.पेक्षा कमी पाऊस झाला होता. या कालावधीत पर्यावरणाचा विनाश कमी असल्यामुळे लोकांना पिण्याचे पाणी मिळत होते. अन्नधान्याचा तुटवडा व रोजगारासाठी भटकंती करण्याची वेळ आली होती. आजघडीला ही परिस्थिती बदलली आहे. अन्नधान्याचा मुबलक साठा असला तरी एक दोन वर्षे झाली की, पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावीच लागते. २००४ साली तालुक्यात ७२४ मि.मी. एवढा पाऊस झाला होता. त्यावर्षी महसूल, ग्रामविकास, कृषी अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन तालुक्यात जलपुनर्भरणाचे काम मोठ्या प्रमाणात केले होते. टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असलेली गावे अधिकाऱ्यांनी दत्तक घेऊन त्या गावात जलपुनर्भरणाचे प्रयोग यशस्वी केले होते. त्यामुळे ही गावे टँकरमुक्त झाली होती. मात्र, आता पुन्हा पहिल्यासारखी टंचाईची स्थिती निर्माण होण्याच्या मार्गावर आहे.

जलपुनर्भरणाकडे नागरिकांचे होतेय दुर्लक्ष...शासनाच्या वतीने चार-पाच वर्षांपूर्वी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. शिवाय उदगीर येथील पाणीदार चळवळीच्या वतीने तलावातील गाळ काढण्याची मोहीम हाती घेतली होती. त्यामुळे संपूर्ण उदगीर तालुक्यातील पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होऊन पिण्याच्या पाण्यासाठीची भटकंती दूर झाली होती. गेल्या दोन वर्षांपासून जलयुक्त व जलपुनर्भरणाकडे शासनासह सर्वच लोकांनी पाठ फिरवली असल्यामुळे यावर्षी पर्जन्यमान कमी होऊन पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील सर्वच तलावातील पाण्याच्या पातळ्या शेवटच्या घटका मोजत आहेत.

वृक्षारोपण, संवर्धनाचे काम कागदावरच...गेल्या अनेक वर्षांपासून वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचा कार्यक्रम कागदावरच सुरू आहे. प्लास्टिक पिशव्या, वाळूचा उपसा, पोखरले जाणारे डोंगर व प्रचंड प्रमाणात होत असलेली वृक्षतोड यामुळे पावसाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. जलयुक्त शिवार अभियान राबविण्याची घोषणा केली आहे. हे अभियान राबविण्यासाठी निकष घालून दिले आहेत. हे निकष वगळून सरसकट गावांतून हे अभियान राबविण्यासाठी सक्ती करावी अशी पाणीदार चळवळीत काम करणाऱ्या लोकांची मागणी आहे. पुढच्या काळात जलपुनर्भरणाच्या दृष्टीने प्रयत्न न झाल्यास व पर्यावरणाचा विनाश चालूच राहिल्यास तालुक्याचे सरासरी पर्जन्यमानही इतिहासजमा होण्याची चिन्हे आहेत.

टॅग्स :laturलातूरWaterपाणीRainपाऊस