शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

सरासरी पर्जन्यमान इतिहासजमा; जलयुक्त, जलपुनर्भरण झालेल्याच वर्षी पाणीपातळीत वाढ

By संदीप शिंदे | Updated: March 28, 2024 16:55 IST

उदगिरात ३५ टक्क्यांनी पर्जन्यमान घटले, जलपुनर्भरणाकडे नागरिकांचे होतेय दुर्लक्ष...

उदगीर : तालुक्यात गेल्या ३५ वर्षांत केवळ पाच-सहा वेळा जलयुक्त व जलपुनर्भरणाची कामे झाली. तेव्हाच पाणी पातळीत वाढ होऊन तालुका टँकरमुक्त झालेला होता. पाण्याची ओरडही कमी झाली होती. मात्र, पर्यावरणाच्या विनाशामुळे उदगीरचे सरासरी पर्जन्यमान इतिहासजमा होण्याची चिन्हे दिसत आहेत. मागच्या ५८ वर्षांच्या पर्जन्यमानाचा आढावा घेतला असता उदगीर तालुक्यात तब्बल ४३ वर्षे सरासरी इतका पाऊस झालेला नाही.

उदगीर तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ८५० ते ९०० मि.मी. एवढे आहे. १९६५ पासून केवळ १३ वर्षेच एक हजार मि.मी.च्या वर पाऊस होऊन तालुक्याने पावसाची सरासरी ओलांडली होती. १९७१ साली ३८९ मि.मी. व १९७२ साली केवळ १७९ मि.मी. एवढाच पाऊस झाला होता. ही दोन्ही वर्षे दुष्काळी वर्षे म्हणून प्रसिद्ध होती. १९८६, १९९२, १९९४ सालीही या तालुक्यात ५०० मि.मी.पेक्षा कमी पाऊस झाला होता. या कालावधीत पर्यावरणाचा विनाश कमी असल्यामुळे लोकांना पिण्याचे पाणी मिळत होते. अन्नधान्याचा तुटवडा व रोजगारासाठी भटकंती करण्याची वेळ आली होती. आजघडीला ही परिस्थिती बदलली आहे. अन्नधान्याचा मुबलक साठा असला तरी एक दोन वर्षे झाली की, पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावीच लागते. २००४ साली तालुक्यात ७२४ मि.मी. एवढा पाऊस झाला होता. त्यावर्षी महसूल, ग्रामविकास, कृषी अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन तालुक्यात जलपुनर्भरणाचे काम मोठ्या प्रमाणात केले होते. टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असलेली गावे अधिकाऱ्यांनी दत्तक घेऊन त्या गावात जलपुनर्भरणाचे प्रयोग यशस्वी केले होते. त्यामुळे ही गावे टँकरमुक्त झाली होती. मात्र, आता पुन्हा पहिल्यासारखी टंचाईची स्थिती निर्माण होण्याच्या मार्गावर आहे.

जलपुनर्भरणाकडे नागरिकांचे होतेय दुर्लक्ष...शासनाच्या वतीने चार-पाच वर्षांपूर्वी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. शिवाय उदगीर येथील पाणीदार चळवळीच्या वतीने तलावातील गाळ काढण्याची मोहीम हाती घेतली होती. त्यामुळे संपूर्ण उदगीर तालुक्यातील पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होऊन पिण्याच्या पाण्यासाठीची भटकंती दूर झाली होती. गेल्या दोन वर्षांपासून जलयुक्त व जलपुनर्भरणाकडे शासनासह सर्वच लोकांनी पाठ फिरवली असल्यामुळे यावर्षी पर्जन्यमान कमी होऊन पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील सर्वच तलावातील पाण्याच्या पातळ्या शेवटच्या घटका मोजत आहेत.

वृक्षारोपण, संवर्धनाचे काम कागदावरच...गेल्या अनेक वर्षांपासून वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचा कार्यक्रम कागदावरच सुरू आहे. प्लास्टिक पिशव्या, वाळूचा उपसा, पोखरले जाणारे डोंगर व प्रचंड प्रमाणात होत असलेली वृक्षतोड यामुळे पावसाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. जलयुक्त शिवार अभियान राबविण्याची घोषणा केली आहे. हे अभियान राबविण्यासाठी निकष घालून दिले आहेत. हे निकष वगळून सरसकट गावांतून हे अभियान राबविण्यासाठी सक्ती करावी अशी पाणीदार चळवळीत काम करणाऱ्या लोकांची मागणी आहे. पुढच्या काळात जलपुनर्भरणाच्या दृष्टीने प्रयत्न न झाल्यास व पर्यावरणाचा विनाश चालूच राहिल्यास तालुक्याचे सरासरी पर्जन्यमानही इतिहासजमा होण्याची चिन्हे आहेत.

टॅग्स :laturलातूरWaterपाणीRainपाऊस