शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सरासरी पर्जन्यमान इतिहासजमा; जलयुक्त, जलपुनर्भरण झालेल्याच वर्षी पाणीपातळीत वाढ

By संदीप शिंदे | Updated: March 28, 2024 16:55 IST

उदगिरात ३५ टक्क्यांनी पर्जन्यमान घटले, जलपुनर्भरणाकडे नागरिकांचे होतेय दुर्लक्ष...

उदगीर : तालुक्यात गेल्या ३५ वर्षांत केवळ पाच-सहा वेळा जलयुक्त व जलपुनर्भरणाची कामे झाली. तेव्हाच पाणी पातळीत वाढ होऊन तालुका टँकरमुक्त झालेला होता. पाण्याची ओरडही कमी झाली होती. मात्र, पर्यावरणाच्या विनाशामुळे उदगीरचे सरासरी पर्जन्यमान इतिहासजमा होण्याची चिन्हे दिसत आहेत. मागच्या ५८ वर्षांच्या पर्जन्यमानाचा आढावा घेतला असता उदगीर तालुक्यात तब्बल ४३ वर्षे सरासरी इतका पाऊस झालेला नाही.

उदगीर तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ८५० ते ९०० मि.मी. एवढे आहे. १९६५ पासून केवळ १३ वर्षेच एक हजार मि.मी.च्या वर पाऊस होऊन तालुक्याने पावसाची सरासरी ओलांडली होती. १९७१ साली ३८९ मि.मी. व १९७२ साली केवळ १७९ मि.मी. एवढाच पाऊस झाला होता. ही दोन्ही वर्षे दुष्काळी वर्षे म्हणून प्रसिद्ध होती. १९८६, १९९२, १९९४ सालीही या तालुक्यात ५०० मि.मी.पेक्षा कमी पाऊस झाला होता. या कालावधीत पर्यावरणाचा विनाश कमी असल्यामुळे लोकांना पिण्याचे पाणी मिळत होते. अन्नधान्याचा तुटवडा व रोजगारासाठी भटकंती करण्याची वेळ आली होती. आजघडीला ही परिस्थिती बदलली आहे. अन्नधान्याचा मुबलक साठा असला तरी एक दोन वर्षे झाली की, पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावीच लागते. २००४ साली तालुक्यात ७२४ मि.मी. एवढा पाऊस झाला होता. त्यावर्षी महसूल, ग्रामविकास, कृषी अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन तालुक्यात जलपुनर्भरणाचे काम मोठ्या प्रमाणात केले होते. टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असलेली गावे अधिकाऱ्यांनी दत्तक घेऊन त्या गावात जलपुनर्भरणाचे प्रयोग यशस्वी केले होते. त्यामुळे ही गावे टँकरमुक्त झाली होती. मात्र, आता पुन्हा पहिल्यासारखी टंचाईची स्थिती निर्माण होण्याच्या मार्गावर आहे.

जलपुनर्भरणाकडे नागरिकांचे होतेय दुर्लक्ष...शासनाच्या वतीने चार-पाच वर्षांपूर्वी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. शिवाय उदगीर येथील पाणीदार चळवळीच्या वतीने तलावातील गाळ काढण्याची मोहीम हाती घेतली होती. त्यामुळे संपूर्ण उदगीर तालुक्यातील पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होऊन पिण्याच्या पाण्यासाठीची भटकंती दूर झाली होती. गेल्या दोन वर्षांपासून जलयुक्त व जलपुनर्भरणाकडे शासनासह सर्वच लोकांनी पाठ फिरवली असल्यामुळे यावर्षी पर्जन्यमान कमी होऊन पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील सर्वच तलावातील पाण्याच्या पातळ्या शेवटच्या घटका मोजत आहेत.

वृक्षारोपण, संवर्धनाचे काम कागदावरच...गेल्या अनेक वर्षांपासून वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचा कार्यक्रम कागदावरच सुरू आहे. प्लास्टिक पिशव्या, वाळूचा उपसा, पोखरले जाणारे डोंगर व प्रचंड प्रमाणात होत असलेली वृक्षतोड यामुळे पावसाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. जलयुक्त शिवार अभियान राबविण्याची घोषणा केली आहे. हे अभियान राबविण्यासाठी निकष घालून दिले आहेत. हे निकष वगळून सरसकट गावांतून हे अभियान राबविण्यासाठी सक्ती करावी अशी पाणीदार चळवळीत काम करणाऱ्या लोकांची मागणी आहे. पुढच्या काळात जलपुनर्भरणाच्या दृष्टीने प्रयत्न न झाल्यास व पर्यावरणाचा विनाश चालूच राहिल्यास तालुक्याचे सरासरी पर्जन्यमानही इतिहासजमा होण्याची चिन्हे आहेत.

टॅग्स :laturलातूरWaterपाणीRainपाऊस