शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

निष्काळजीपणा ! सलीम अली सरोवरात हजारो मासे मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 19:37 IST

शहरातील वन्यजीवप्रेमींनी ऐतिहासिक सलीम अली सरोवरातील जैवविविधता धोक्यात आल्याचे सांगून खंडपीठात धाव घेतली आहे.

ठळक मुद्देसरोवरामध्ये दूषित पाण्याचे प्रमाण वाढल्याचा परिणाम मृत माशांमुळे तलावात दुर्गंधी पसरली आहे.

औरंगाबाद : ऐतिहासिक सलीम अली सरोवरातील हजारो मासे अचानक मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांनी यासंदर्भात महापालिकेकडे तक्रारही केली आहे.

शहराच्या मध्यभागी असलेल्या ऐतिहासिक सलीम अली सरोवराला अगोदरच अतिक्रमणांनी चारही बाजूने वेढले आहे. मागील अनेक वर्षांपासून सरोवराचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचा  प्रयत्न होत आहे. महापालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे सरोवराची दिवसेंदिवस वाताहत होत चालली आहे. सरोवराच्या बाजूलाच महापालिकेने एसटीपी प्लांट सुरू केला आहे. दूषित पाण्यावर प्रक्रिया करून पाणी सरोवरात सोडण्यात येते. या परिसरात राहणाऱ्या असंख्य नागरिकांनी आपल्या घरातील ड्रेनेजचे पाणी सरोवरात सोडले आहे. मागील काही वर्षांपासून सरोवरातील दूषित पाण्याचा मुद्दा ऐरणीवर आलेला असतानाही महापालिका ठोस भूमिका घ्यायला तयार नाही.

शहरातील वन्यजीवप्रेमींनी ऐतिहासिक सलीम अली सरोवरातील जैवविविधता धोक्यात आल्याचे सांगून खंडपीठात धाव घेतली आहे. अलीकडेच खंडपीठाने सरोवराची पाहणी करण्यासाठी एक स्वतंत्र पथकसुद्धा नेमले होते. त्यानंतर महापालिकेने सरोवरासाठी कोणताही अ‍ॅक्शन प्लॅन हाती घेतला नाही. यंदा पावसाळा सुरू झाल्यापासून सरोवरातील पाण्याची पातळी बरीच वाढली आहे. दोन दिवसांपासून सरोवरातील लहान-मोठे मासे अचानक हजारोंच्या संख्येने मरत आहेत. मरण पावलेले मासे पाण्यावर तरंगत असल्याने आसपासच्या नागरिकांना ते दिसत आहेत. यासंदर्भात परिसरातील नागरिकांनी महापालिका अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली आहे. महापालिकेची संपूर्ण यंत्रणा कोरोनाच्या कामात लावण्यात आली आहे. त्यामुळे सरोवराची अवस्था पाहण्यासाठी अधिकारी फिरकलेसुद्धा नाहीत. मृत माशांमुळे तलावात दुर्गंधी पसरली आहे.

दूषित पाणी कारणीभूतसरोवरात दूषित पाणी येत असल्यामुळे माशांना आॅक्सिजन घेण्यासाठी त्रास होत असेल, म्हणून ते मरण पावत असल्याचे नागरिकांनी सांगितले. यापूर्वी अनेकदा असा प्रकार घडला आहे. पूर्वी महापालिका मासेमारी करण्यासाठी व्यावसायिक मंडळींना ठेका देत असे. काही वर्षांपासून ही परंपरा बंद करण्यात आली आहे. 

मासे मरण्याची तीन प्रमुख कारणे01. सरोवरामध्ये मोठ्या प्रमाणात शेवाळाचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे ऑक्सिजन न मिळाल्याने मासे मरू शकतात.02. मागील चार महिन्यांपासून नागरिक निर्जंतुकीकरण करणाऱ्या औषधांचा वापर मोठ्या प्रमाणात करीत आहेत. त्यांच्या ड्रेनेजच्या पाण्यामुळे मासे मरण पावत असतील.03. सरोवरातील माशाचा मृत्यू एखाद्या आजारामुळे झाला असेल तर त्याची बाधा इतरांनाही होऊ शकते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ