शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
2
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
3
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
4
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
6
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
7
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
8
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
9
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
10
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
11
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
12
National Jamboree: ६१ वर्षांनंतर लखनौत ऐतिहासिक 'राष्ट्रीय जंबोरी'; ३२,००० हून अधिक स्काउट्स होणार सहभागी
13
घरबसल्या पैसे दुप्पट कसे होतील? तेजस्वी प्रकाशने सांगितला फॉर्म्युला, मुलींना दिला आर्थिक सल्ला
14
Mumbai: मुंबई महापालिकेच्या ३०० कोटींच्या उद्यान देखभालीच्या निविदा प्रक्रियेत संशयाच्या भोवरा
15
बिहार निवडणूक; 'या' मतदारसंघात भाजप उमेदवाराचा अवघ्या 30 मतांनी पराभव
16
IPL 2026 : रवींद्र जडेजाच्या पगारात ४ कोटींची कपात होण्यामागचं कारण काय? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
17
Tata Sierra आता नव्या रुपता! मिळणार ट्रिपल स्क्रीन सेटअप अन् अ‍ॅडव्हॉन्स फीचर्स, किती असेल किंमत? जाणून घ्या सविस्तर
18
BMC Election: सर्वपक्षीय १२८ माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेला पालिकेत हव्या १२५ जागा!
19
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: कसे कराल व्रत? शिवशंकर देतील शुभाशिर्वाद, कल्याण-मंगलच होणार!
20
Cyber Security: सर्वांचा डेटा आता होणार सुरक्षित, पुढील १८ महिन्यांत नियम आणखी कडक होणार!
Daily Top 2Weekly Top 5

निष्काळजीपणा ! सलीम अली सरोवरात हजारो मासे मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 19:37 IST

शहरातील वन्यजीवप्रेमींनी ऐतिहासिक सलीम अली सरोवरातील जैवविविधता धोक्यात आल्याचे सांगून खंडपीठात धाव घेतली आहे.

ठळक मुद्देसरोवरामध्ये दूषित पाण्याचे प्रमाण वाढल्याचा परिणाम मृत माशांमुळे तलावात दुर्गंधी पसरली आहे.

औरंगाबाद : ऐतिहासिक सलीम अली सरोवरातील हजारो मासे अचानक मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांनी यासंदर्भात महापालिकेकडे तक्रारही केली आहे.

शहराच्या मध्यभागी असलेल्या ऐतिहासिक सलीम अली सरोवराला अगोदरच अतिक्रमणांनी चारही बाजूने वेढले आहे. मागील अनेक वर्षांपासून सरोवराचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचा  प्रयत्न होत आहे. महापालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे सरोवराची दिवसेंदिवस वाताहत होत चालली आहे. सरोवराच्या बाजूलाच महापालिकेने एसटीपी प्लांट सुरू केला आहे. दूषित पाण्यावर प्रक्रिया करून पाणी सरोवरात सोडण्यात येते. या परिसरात राहणाऱ्या असंख्य नागरिकांनी आपल्या घरातील ड्रेनेजचे पाणी सरोवरात सोडले आहे. मागील काही वर्षांपासून सरोवरातील दूषित पाण्याचा मुद्दा ऐरणीवर आलेला असतानाही महापालिका ठोस भूमिका घ्यायला तयार नाही.

शहरातील वन्यजीवप्रेमींनी ऐतिहासिक सलीम अली सरोवरातील जैवविविधता धोक्यात आल्याचे सांगून खंडपीठात धाव घेतली आहे. अलीकडेच खंडपीठाने सरोवराची पाहणी करण्यासाठी एक स्वतंत्र पथकसुद्धा नेमले होते. त्यानंतर महापालिकेने सरोवरासाठी कोणताही अ‍ॅक्शन प्लॅन हाती घेतला नाही. यंदा पावसाळा सुरू झाल्यापासून सरोवरातील पाण्याची पातळी बरीच वाढली आहे. दोन दिवसांपासून सरोवरातील लहान-मोठे मासे अचानक हजारोंच्या संख्येने मरत आहेत. मरण पावलेले मासे पाण्यावर तरंगत असल्याने आसपासच्या नागरिकांना ते दिसत आहेत. यासंदर्भात परिसरातील नागरिकांनी महापालिका अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली आहे. महापालिकेची संपूर्ण यंत्रणा कोरोनाच्या कामात लावण्यात आली आहे. त्यामुळे सरोवराची अवस्था पाहण्यासाठी अधिकारी फिरकलेसुद्धा नाहीत. मृत माशांमुळे तलावात दुर्गंधी पसरली आहे.

दूषित पाणी कारणीभूतसरोवरात दूषित पाणी येत असल्यामुळे माशांना आॅक्सिजन घेण्यासाठी त्रास होत असेल, म्हणून ते मरण पावत असल्याचे नागरिकांनी सांगितले. यापूर्वी अनेकदा असा प्रकार घडला आहे. पूर्वी महापालिका मासेमारी करण्यासाठी व्यावसायिक मंडळींना ठेका देत असे. काही वर्षांपासून ही परंपरा बंद करण्यात आली आहे. 

मासे मरण्याची तीन प्रमुख कारणे01. सरोवरामध्ये मोठ्या प्रमाणात शेवाळाचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे ऑक्सिजन न मिळाल्याने मासे मरू शकतात.02. मागील चार महिन्यांपासून नागरिक निर्जंतुकीकरण करणाऱ्या औषधांचा वापर मोठ्या प्रमाणात करीत आहेत. त्यांच्या ड्रेनेजच्या पाण्यामुळे मासे मरण पावत असतील.03. सरोवरातील माशाचा मृत्यू एखाद्या आजारामुळे झाला असेल तर त्याची बाधा इतरांनाही होऊ शकते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ