शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

फळबागा जळाल्या

By admin | Updated: July 8, 2014 00:33 IST

परभणी : दोन ते तीन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे फळबागांना फटका बसत आहे. जून महिना उलटला तरी पाऊस न पडल्याने विहीर व हातपंप कोरडेठाक पडल्याने जिल्ह्यातील फळबागा जळू लागल्या आहेत.

परभणी : दोन ते तीन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे फळबागांना फटका बसत आहे. जून महिना उलटला तरी पाऊस न पडल्याने विहीर व हातपंप कोरडेठाक पडल्याने जिल्ह्यातील फळबागा जळू लागल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.
फेब्रुवारी व मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील बोटावर मोजणाऱ्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते, अशा प्रतिकूल परिस्थिीतही शेतकऱ्यांनी फळबागा जगविल्या होत्या. परंतु जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपला तरीही पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे मोसंबी, डाळिंब, केळी, पेरू आदी फळबागा पाण्याविना जळू लागल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे, अशा शेतकऱ्यांना आता शासनस्तरावरून आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे. मात्र येथील जिल्हा प्रशासनाला याचे देणेघेणे नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी देशोधडीला लागला आहे. मागील आठवड्यात मानवत तालुक्यातील एका शेतकऱ्याने कर्ज बाजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतरही जिल्हा प्रशासन म्हणावे तसे जागे झाले नाही. (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले
जिल्ह्यात बोटावर मोजण्याऐवढ्याच फळबागा उरल्या आहेत. त्याही निसर्गाच्या लहरीपणामुळे नेस्तनाबूत होत आहेत. शेतकऱ्यांनी हा फळबागा लहान मुलांसारख्या जगविल्या परंतु निसर्गासमोर शेतकरीही हतबल झाला आहे. जिल्ह्यातील फळबागा पाण्याविना जळून गेल्या आहेत. त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे.
मोसंबी व डाळींब बागायदार शेतकरी डोक्यावर पाणी आणून बाग जगवित आहेत. तसेच काही शेतकरी टँकरद्वारे बागांना पाणी देत आहेत.
प्रशासनाच्या वतीने फळबागा जगविण्यासाठी कुठलीही उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे लाखोंच्या फळबागा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.