शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

शहर पाणीपुरवठा योजनेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दिले ६८२ कोटींचे अंदाजपत्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 7:30 PM

औरंगाबाद महापालिकेने २०११ मध्ये तयार केलेल्या समांतर जलवाहिनी योजनेचे काम बंद पाडले आहे.

ठळक मुद्देमराठवाडा विकास मंडळाची बुधवारी राज्यपालांकडे बैठक लातूरसाठी ५८२ कोटींची जलवाहिनी 

औरंगाबाद : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने (एमजीपी) औरंगाबाद शहर पाणीपुरवठा योजनेसाठी ६८२ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. ते अंदाजपत्रक सोमवारी मराठवाडा विकास मंडळ अध्यक्ष आणि सदस्यांकडे सुपूर्द करण्यात आले. सोबतच लातूर शहर पाणीपुरवठ्यासाठी ५८२ कोटी रुपयांतून जलवाहिनीचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. हे दोन्ही अंदाजपत्रक घेऊन बुधवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे मराठवाडा विकास मंडळाची बैठक होईल, अशी माहिती अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी दिली. 

औरंगाबाद महापालिकेने २०११ मध्ये तयार केलेल्या समांतर जलवाहिनी योजनेचे काम बंद पाडले आहे. त्यामुळे जीवन प्राधिकरणाकडून अंदाजपत्रक तयार करून त्याआधारे योजना बनविण्यात यावी, असे मत मराठवाडा विकास मंडळाचे झाले. त्यानंतर प्राधिकरणाकडे अंदाजपत्रकासाठी विकास मंडळाने प्रस्ताव पाठविला. त्यानुसार ६८२ कोटी रुपयांतून जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत जलवाहिनी टाकण्याचे अंदाजपत्रक एमजीपीने तयार केले आहे. दररोज पाणी देण्यासाठी तसेच पुढील २० वर्षांच्या नियोजनासाठी ती योजना असेल. एमजीपीने अंदाजपत्रक तयार केले आहे. 

योजनेचा डीपीआर करण्यासाठी वेगळ्या निधीची तरतूद करावी लागेल. लातूरसाठी उजनीतून पाणी देण्याची योजना राबविली, तर त्यासाठी ५८२ कोटी रुपये लागतील. मुख्यमंत्री आणि राज्यपालांची बुधवारी भेट घेऊन अर्थसंकल्पात दोन्ही योजनांसाठी तरतूद करण्याची मागणी असेल, असे डॉ. कराड यांनी स्पष्ट केले.

समांतरचे पॅकअपसमांतर जलवाहिनीचे पॅकअप झाले आहे. २०११ पासून योजनेसाठी केंद्र व राज्य शासनाने दिलेला निधी बँकेत पडून आहे. व्याजासह ती रक्कम ३५० कोटींच्या आसपास गेली आहे. राज्य शासनाने शहर पाणीपुरवठ्यासाठी एमजीपीच्या अंदाजपत्रकाचा विचार केला, तर मराठवाडा विकास मंडळाला नोडल एजन्सी नेमून एमजीपीमार्फत औरंगाबाद आणि लातूरसाठी पाणीपुरवठा योजना राबविण्याचा निर्णय होऊ शकतो. मनपाला दिलेले अनुदान राज्य शासन सदरील योजनेमध्ये वळवू शकते. यासाठी केंद्र शासनासोबत राज्य शासनाने पत्रव्यवहार करून संमती घेतल्यास औरंगाबाद शहराचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न मिटणे शक्य होणार आहे. 

टॅग्स :WaterपाणीParallel Waterline Aurangabadसमांतर जलवाहिनी औरंगाबादMarathwadaमराठवाडाAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका