शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
2
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
3
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
4
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
5
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
6
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
7
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
8
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
9
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
10
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
11
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
12
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
13
इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
14
Lionel Messi: सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
15
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
16
"आम्ही थांबणार नाही..", दुसऱ्या बाळाच्या जन्माआधीच भारती सिंग करतेय तिसऱ्या बाळाचं प्लानिंग? पती हर्ष म्हणाला...
17
Stock Market Holidays: पुढच्या वर्षी १५ दिवस बंद राहणार शेअर बाजार, पाहा NSE मध्ये सुट्ट्या कधी, पाहा लिस्ट
18
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी उपस्थित केलं भाजपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, म्हणाले, येथे सर्व निर्णय... 
19
जिथं वक्फचा वाद उफाळला, तिथे भाजपाला मिळाला 'ऐतिहासिक' विजय; केरळमध्ये हैराण करणारा निकाल
20
Gold-Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; १८ कॅरेट सोनंही १ लाखांच्या पार, मुंबई ते दिल्ली नवे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

देशातील महिला अत्याचारांची क्रूरता चिंताजनक : वृंदा करात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 12:21 IST

देवगिरी महाविद्यालयात फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमालेत प्रतिपादन

ठळक मुद्देसंस्कृतीच्या नावावर महिलांसाठी बनविलेले कारागृह तोडले पाहिजेत. मुळात आपली धार्मिक आणि सांस्कृतिक संरचना बदलली पाहिजे. संस्कृतीमध्ये सांगितल्याप्रमाणे पुरुष वागतात.

औरंगाबाद : देशभर महिलांवरील अत्याचाराच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याकडेच सतत लक्ष वेधले जाते. मात्र, त्या अत्याचारातील क्रूरता भयंकर आहे. महिलांनी सांस्कृतिक लक्ष्मणरेषा ओलांडल्याच्या आविर्भावातून होणारे अत्याचार गंभीर आहेत. महिला सक्षमीकरणाच्या कितीही गप्पा मारल्या तरी ही सांस्कृतिकतेची मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचे सक्षमीकरण होणार नाही, असे विचार भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या माजी खासदार वृंदा करात यांनी मांडले.

देवगिरी महाविद्यालयात फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमालेत वृंदा करात यांनी ‘भारतीय महिला सबलीकरण’ या विषयावर दुसरे पुष्प गुंफले. अध्यक्षस्थानी अ‍ॅड. सुखदेव शेळके होते. व्यासपीठावर ज्येष्ठ नेते डॉ. भालचंद्र कांगो, संस्थेचे सचिव आ. सतीश चव्हाण, प्राचार्य डॉ. शिवाजीराव थोरे आणि उपप्राचार्या डॉ. सी.एस. पाटील उपस्थित होते. 

वृंदा करात म्हणाल्या, महिलांना बिगरपगारी कामे करावी लागतात, ही कामे घरातील असतील किंवा बाहेरची. त्याचा पगार मिळत नाही. त्याचवेळी महिलांना घरातील संपत्तीमध्येही वाटा दिला जात नाही. महिला घराबाहेर पडली, तर तिच्याविषयी समाजात चर्चा केली जाते. स्त्री-पुरुष समानता ही महिलांना त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला मिळेल तेव्हा येईल. त्यास समाजाची स्वीकृती मिळाली पाहिजे. समाज तंत्रज्ञानानुसार सर्व पातळ्यावर आधुनिक होत असताना जातिप्रथा, धर्म आणि महिलांविषयीचे विचार बलण्यास तयार नाही. हा विचार बदल करण्यासह त्यास समाजाची स्वीकृती मिळाली पाहिजे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनातील आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण केवळ ३ टक्के आहे. महिला अत्याचारावर फाशी हा उपाय नाही. मुळात आपली धार्मिक आणि सांस्कृतिक संरचना बदलली पाहिजे. संस्कृतीमध्ये सांगितल्याप्रमाणे पुरुष वागतात. त्यातूनच हे अत्याचार होत आहेत. त्यामुळे धर्म-जातीच्या नावासह संस्कृतीच्या नावावर महिलांसाठी बनविलेले कारागृह तोडले पाहिजेत. त्याशिवाय महिला सक्षम होणार नाहीत. आता मुळावरच घाव घालण्याची गरज निर्माण झालेली आहे, असेही त्यांनी सांगितले. सुरुवातीला प्रास्ताविक प्राचार्य डॉ. शिवाजीराव थोरे यांनी केले. परिचय डॉ. भालचंद्र कांगो यांनी करून दिला. सूत्रसंचालन करून डॉ. सी.एस. पाटील यांनी आभार मानले.

नारीवाद गाली हो गई हैसामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक ढाचा सोडून महिलांचे सक्षमीकरण होऊ शकत नाही. रूढी-परंपरांनी त्यात अडथळे निर्माण केले आहेत. याविरोधात बोलणाऱ्या महिलांना टार्गेट केले आहे. ‘नारीवादी (स्त्रीवादी) गाली हो गाई है’ अशी खंतही वृंदा करात यांनी व्यक्त केली. भारतीय इतिहासात कोठेही महिला सक्षमीकरण चळवळीने पुरुषांना टार्गेट केलेले नाही. पुरुषांच्या विरोधात ही चळवळ कधीही नव्हती आणि नसेल, असेही त्यांनी सांगितले.

महिलांचे नेतृत्व जनता स्वीकारते; पण...महिलांचे नेतृत्व जनतेने कधीही नाकारलेले नाही. इंदिरा गांधी, मायावती, सोनिया गांधी आदींचे नेतृत्व जनतेने स्वीकारले. मात्र, राजकीय पक्षांनाच महिला चालत नाहीत. लोकसभेच्या ५४४ जागांपैकी केवळ २३ जागांवर महिला खासदार आहेत. त्यामुळे महिलांना लोकसभा निवडणुकीत आरक्षण दिले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. संसदेत महिलांच्या प्रश्नांसंबंधी काही चर्चा असेल, तर पुरुष खासदार वेगळ्या पद्धतीची गॉसिपिंग करतात, असा अनुभवही त्यांनी सांगितला.

मानधन नाकारलेदेवगिरी महाविद्यालयाच्या प्रशासनातर्फे व्याख्यान झाल्यानंतर वृंदा करात यांना मानधनाचे पाकीट देण्यात आले. तेव्हा मार्गदर्शन केल्यानंतर पाकीट घेण्याची आमच्या पक्षाची प्रथा, परंपरा नाही, असे स्पष्ट करीत त्यांनी मानधन नाकारले.

टॅग्स :WomenमहिलाSexual abuseलैंगिक शोषणIndiaभारतAurangabadऔरंगाबादDevgiri College Aurangabadदेवगिरी महाविद्यालय औरंगाबाद