शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

देशातील महिला अत्याचारांची क्रूरता चिंताजनक : वृंदा करात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 12:21 IST

देवगिरी महाविद्यालयात फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमालेत प्रतिपादन

ठळक मुद्देसंस्कृतीच्या नावावर महिलांसाठी बनविलेले कारागृह तोडले पाहिजेत. मुळात आपली धार्मिक आणि सांस्कृतिक संरचना बदलली पाहिजे. संस्कृतीमध्ये सांगितल्याप्रमाणे पुरुष वागतात.

औरंगाबाद : देशभर महिलांवरील अत्याचाराच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याकडेच सतत लक्ष वेधले जाते. मात्र, त्या अत्याचारातील क्रूरता भयंकर आहे. महिलांनी सांस्कृतिक लक्ष्मणरेषा ओलांडल्याच्या आविर्भावातून होणारे अत्याचार गंभीर आहेत. महिला सक्षमीकरणाच्या कितीही गप्पा मारल्या तरी ही सांस्कृतिकतेची मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचे सक्षमीकरण होणार नाही, असे विचार भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या माजी खासदार वृंदा करात यांनी मांडले.

देवगिरी महाविद्यालयात फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमालेत वृंदा करात यांनी ‘भारतीय महिला सबलीकरण’ या विषयावर दुसरे पुष्प गुंफले. अध्यक्षस्थानी अ‍ॅड. सुखदेव शेळके होते. व्यासपीठावर ज्येष्ठ नेते डॉ. भालचंद्र कांगो, संस्थेचे सचिव आ. सतीश चव्हाण, प्राचार्य डॉ. शिवाजीराव थोरे आणि उपप्राचार्या डॉ. सी.एस. पाटील उपस्थित होते. 

वृंदा करात म्हणाल्या, महिलांना बिगरपगारी कामे करावी लागतात, ही कामे घरातील असतील किंवा बाहेरची. त्याचा पगार मिळत नाही. त्याचवेळी महिलांना घरातील संपत्तीमध्येही वाटा दिला जात नाही. महिला घराबाहेर पडली, तर तिच्याविषयी समाजात चर्चा केली जाते. स्त्री-पुरुष समानता ही महिलांना त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला मिळेल तेव्हा येईल. त्यास समाजाची स्वीकृती मिळाली पाहिजे. समाज तंत्रज्ञानानुसार सर्व पातळ्यावर आधुनिक होत असताना जातिप्रथा, धर्म आणि महिलांविषयीचे विचार बलण्यास तयार नाही. हा विचार बदल करण्यासह त्यास समाजाची स्वीकृती मिळाली पाहिजे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनातील आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण केवळ ३ टक्के आहे. महिला अत्याचारावर फाशी हा उपाय नाही. मुळात आपली धार्मिक आणि सांस्कृतिक संरचना बदलली पाहिजे. संस्कृतीमध्ये सांगितल्याप्रमाणे पुरुष वागतात. त्यातूनच हे अत्याचार होत आहेत. त्यामुळे धर्म-जातीच्या नावासह संस्कृतीच्या नावावर महिलांसाठी बनविलेले कारागृह तोडले पाहिजेत. त्याशिवाय महिला सक्षम होणार नाहीत. आता मुळावरच घाव घालण्याची गरज निर्माण झालेली आहे, असेही त्यांनी सांगितले. सुरुवातीला प्रास्ताविक प्राचार्य डॉ. शिवाजीराव थोरे यांनी केले. परिचय डॉ. भालचंद्र कांगो यांनी करून दिला. सूत्रसंचालन करून डॉ. सी.एस. पाटील यांनी आभार मानले.

नारीवाद गाली हो गई हैसामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक ढाचा सोडून महिलांचे सक्षमीकरण होऊ शकत नाही. रूढी-परंपरांनी त्यात अडथळे निर्माण केले आहेत. याविरोधात बोलणाऱ्या महिलांना टार्गेट केले आहे. ‘नारीवादी (स्त्रीवादी) गाली हो गाई है’ अशी खंतही वृंदा करात यांनी व्यक्त केली. भारतीय इतिहासात कोठेही महिला सक्षमीकरण चळवळीने पुरुषांना टार्गेट केलेले नाही. पुरुषांच्या विरोधात ही चळवळ कधीही नव्हती आणि नसेल, असेही त्यांनी सांगितले.

महिलांचे नेतृत्व जनता स्वीकारते; पण...महिलांचे नेतृत्व जनतेने कधीही नाकारलेले नाही. इंदिरा गांधी, मायावती, सोनिया गांधी आदींचे नेतृत्व जनतेने स्वीकारले. मात्र, राजकीय पक्षांनाच महिला चालत नाहीत. लोकसभेच्या ५४४ जागांपैकी केवळ २३ जागांवर महिला खासदार आहेत. त्यामुळे महिलांना लोकसभा निवडणुकीत आरक्षण दिले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. संसदेत महिलांच्या प्रश्नांसंबंधी काही चर्चा असेल, तर पुरुष खासदार वेगळ्या पद्धतीची गॉसिपिंग करतात, असा अनुभवही त्यांनी सांगितला.

मानधन नाकारलेदेवगिरी महाविद्यालयाच्या प्रशासनातर्फे व्याख्यान झाल्यानंतर वृंदा करात यांना मानधनाचे पाकीट देण्यात आले. तेव्हा मार्गदर्शन केल्यानंतर पाकीट घेण्याची आमच्या पक्षाची प्रथा, परंपरा नाही, असे स्पष्ट करीत त्यांनी मानधन नाकारले.

टॅग्स :WomenमहिलाSexual abuseलैंगिक शोषणIndiaभारतAurangabadऔरंगाबादDevgiri College Aurangabadदेवगिरी महाविद्यालय औरंगाबाद