शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

समांतरविरोधात भाजप पेटले!

By admin | Updated: March 27, 2015 00:44 IST

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचे कंत्राट घेतलेल्या सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने पाणीपट्टीच्या मागणीसाठी भाजप नगरसेवकांना फोन केल्यामुळे त्यांनी कंपनीच्या कार्यालयातच ठिय्या दिला.

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचे कंत्राट घेतलेल्या सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने पाणीपट्टीच्या मागणीसाठी भाजप नगरसेवकांना फोन केल्यामुळे त्यांनी कंपनीच्या कार्यालयातच ठिय्या दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनीदेखील आंदोलनास साथ दिली. कंपनीने तीन तास चाललेल्या आंदोलनाची दखल घेतली नाही. त्यामुळे नगरसेवकांनी कंपनी बेकायदेशीररीत्या पाणीपट्टी वसुली करीत असल्याची तक्रार पोलिसांत दिली. काल २५ रोजी विधानसभेत आ. अतुल सावे यांनी समांतर जलवाहिनीच्या चौकशीची मागणी केली. त्याचे पडसाद आज कंपनीवर करण्यात आलेल्या आंदोलनाच्या रुपाने उमटले. कंपनीच्या कार्यालयाकडून पाणीपट्टी भरलेली असताना नगरसेवकांना फोन जाताच त्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली. शिवसेना आणि भाजपमध्ये मागील काही महिन्यांपासून समांतर जलवाहिनीवरून राजकारण सुरू आहे. मनपा निवडणुकीत समांतरचा मुद्दा सत्तांतर करण्यास कारणीभूत ठरू शकतो. त्या पार्श्वभूमीवरच भाजपने योजनेच्या कामावर आणि पाणीपुरवठ्याच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येते. पालकमंत्री रामदास कदम यांनी ८ ते २६ जानेवारीदरम्यान समांतर जलवाहिनीच्या कामावरून तीन बैठका घेतल्या. पाणीपट्टी वसुलीचे काम कंपनीकडून काढून घ्यावे. ते मनपाच्या कर्मचाऱ्यांकडूनच करावे, असे आदेशही त्यांनी आयुक्त व महापौरांना दिले. महापौरांनी फेबु्रवारीमध्ये झालेल्या सभेतही कंपनीला पाणीपट्टी वसुली थांबविण्याचे आदेश दिले. तरीही कंपनी वसुली करीत असल्यामुळे नगरसेवक प्रमोद राठोड, प्रशांत देसरडा, काशीनाथ कोकाटे, संजय चौधरी, बालाजी मुंडे यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. मनपाच्या अभियंत्यांनीदेखील आचारसंहितेमुळे नगरसेवकांना दाद दिली नाही. सहा वाजेपर्यंत नगरसेवक कंपनीच्या एन-१ येथील कार्यालयात ठाण मांडून होते. व्यवसाय प्रमुख अर्णव घोष किंवा इतर अधिकारी कंपनीकडे आला नाही. कार्यकारी अभियंता कोल्हे यांनीही नगरसेवकांचे फोन घेतले नाहीत. कंपनीचे अधिकारी गुप्ता यांना विचारणा करण्यात आली की, कोणत्या कायद्यानुसार ही वसुली सुरू आहे? त्यांना काहीही उत्तर देता आले नाही.