शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

आहारात मीठ अन् मिठात आयोडीनचे प्रमाण जपावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 11:31 PM

दररोजच्या आहारात मिठाचे योग्य प्रमाण जपण्याची गरज आहे. कारण मिठातूनच शरीराला विशेषत: थायरॉईड ग्रंथीला आयोडीन मिळते. या ग्रंथीला पुरेसे आयोडीन मिळाले नाही, तर गलगंड, थकवा, उदासीनता, विसरभोळेपणा, केस गळणे, त्वचा कोरडी पडणे आदींना सामोरे जावे लागते.

ठळक मुद्देप्रीती फटाले : जागतिक थायरॉईड दिनानिमित्त संवाद

औरंगाबाद : दररोजच्या आहारात मिठाचे योग्य प्रमाण जपण्याची गरज आहे. कारण मिठातूनच शरीराला विशेषत: थायरॉईड ग्रंथीला आयोडीन मिळते. या ग्रंथीला पुरेसे आयोडीन मिळाले नाही, तर गलगंड, थकवा, उदासीनता, विसरभोळेपणा, केस गळणे, त्वचा कोरडी पडणे आदींना सामोरे जावे लागते. त्यामुळे मिठातील आयोडीनचे प्रमाण जपण्याची गरज असल्याचे बालस्थूलतातज्ज्ञ डॉ. प्रीती फटाले म्हणाल्या. जागतिक थायरॉईड दिनानिमित्त त्यांच्याशी साधलेला हा संवाद.थायरॉईड ग्रंथी म्हणजे काय आहे?प्रत्येकाच्या गळ्यात थायरॉईड ही फुलपाखरासारखी ग्रंथी असते. त्यातून प्रामुख्याने थायरॉक्सिन आणि ट्रायआय डोथारोनीन ही दोन संप्रेरके स्रवत असतात. ही संप्रेरके मेंदूतील पिट्युटरी ग्रंथीद्वारे स्रवली जातात. थायरॉईड संप्रेरक शरीराची वाढ, विकास, शरीराचे तापमान, चयापचय, ऊर्जेचे नियोजन, मासिक पाळी आणि स्नायूंची शक्ती नियंत्रित करतात. थायरॉईड ग्रंथीच्या कार्यासाठी आयोडीन हा आवश्यक घटक आहे.प्रश्न : थायरॉईड ग्रंथीचा विकार कोणाला होतो?उत्तर : डिसेंबर २०१८ मध्ये फार्मास्युटिकल एज्युकेशन आणि रिसर्च इंडियाद्वारे प्रसिद्ध केलेल्या लेखानुसार भारतीय लोकसंख्येच्या सरासरी ३२ टक्के लोक थायरॉईड ग्रंथीच्या वेगवेगळ्या विकारांनी म्हणजे गलगंड, हायपोथायरॉयडिजम््, हायपरथायरॉयडिजम्, थायरोडायटिस आणि थायरॉईड कर्करोगाने ग्रस्त आहेत. थायरॉईड ग्रंथीचा आजार मुली, स्त्रियांनाच नव्हे, तर पुरुष आणि मुलांनाही होऊ शकतो. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार याप्रमाणेच थायरॉईड ग्रंथीचे विकार घराघरांत पोहोचले आहेत. आहारात आयोडीनच्या अपुऱ्या प्रमाणामुळे विकार उद््भवतात.प्रश्न : आयोडीन कमी पडल्याने कोणता धोका संभवतो?गर्भधारणेदरम्यान मातेला आयोडीनचा पुरवठा कमी पडल्यास नवजात अर्भकात जन्मजात हायईपोथायरॉडिजम् हा विकार उद्भवू शकतो. बाळ दूध व्यवस्थितपणे न पिणे, जास्त झोपणे, कावीळ जास्त काळ राहणे आदी लक्षणे आहेत. नवजात अर्भकाची वाढ आणि विकास खुंटून मूल मतिमंद होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे गर्भावस्थेत मातेला पुरेसे आयोडीन मिळण्याची खात्री करणे गरजेचे असते.प्रश्न : मिठातील आयोडीनचे प्रमाण कसे जपावे?उत्तर : अन्न शिजविताना मिठाचा वापर न करता ताटात मीठ वाढले पाहिजे. मिठाचा पुडा फोडल्यानंतर एक महिन्यानंतर त्यातील मिठ वापरता कामा नये. ते इतर गोष्टींसाठी वापरावे. मीठ स्वयंपाकघरात, शेगडीजवळ, उन्हात ठेवू नये. ते कायम हवाबंद डब्यात ठेवावे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्य