शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
2
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
3
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
4
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
5
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
6
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
7
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
8
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
9
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
10
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
11
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
12
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
13
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
14
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
15
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
16
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
17
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
18
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
19
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
20
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी

सावधान..! पशुधनालाही उष्माघाताचा धोका, वाढत्या उन्हामुळे जनावरे होतात अस्वस्थ

By विजय सरवदे | Published: April 25, 2024 3:45 PM

काळजी घेण्याचा सल्ला, जनावरांच्या शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी पशुपालकांनी काळजी घेतली पाहिजे.

छत्रपती संभाजीनगर : अलीकडे उन्हाचा पारा सतत वर सरकत आहे. उन्हाच्या काहिलीने जनावरेही अस्वस्थ होत आहेत. वाढत्या तापमानामुळे केवळ मनुष्यांना उष्माघाताचा धोका आहे असे नव्हे, तर जनावरांनाही उष्माघाताचा फटका बसू शकतो. त्यामुळे उन्हापासून जनावरांचे संरक्षण करावे, असे आवाहन जि. प. पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

जिल्ह्यात लहान-मोठे मिळून साडेपाच लाखांहून अधिक जनावरे आहेत. उन्हाच्या झळांनी पशुधनालाही‎ धोका निर्माण होतो. त्यामुळे‎ पशुपालकांनी काळजी घ्यावी. वाढत्या उष्म्याने त्यांचे शारीरिक तापमान (१०३ ते ११० ‎अंश फॅरानहाइट) वाढते. त्यांची ‎तापमान नियंत्रण करण्याची क्षमता कमी पडल्यास‎ शारीरिक तापमानात वाढ होते. त्यामुळे एका जागी उभे राहणे, बैचेन होणे, सतत उठ-बस करणे, भूक मंदावणे, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे. लहान-मोठ्या आजारांना बळी पडणे आणि दूध उत्पादनात मोठी घट होणे, अशी जनावरांमध्ये लक्षणे दिसून येतात.

गेल्या काही दिवसांपासून तापमानाने चाळिशी ओलांडली आहे. त्यामुळे जनावरांच्या शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी पशुपालकांनी काळजी घेतली पाहिजे. जनावरांना ऐन दुपारच्या वेळेत मोकळे सोडणे किंवा त्यांना बांधलेल्या ठिकाणी उन्हाचा त्रास जाणवणार नाही, याची काळजी घ्यावी. त्यांना सावलीत किंवा मोकळ्या हवेशीर जागेत बांधावे. उष्माघाताचा त्रास जाणवल्यास तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुरेखा माने यांनी केले आहे.

पिण्यासाठी २४ तास पाणी द्यासकाळी १० ते दुपारी ५ वाजेपर्यंत शक्यतो जनावरांना चरण्यासाठीही बाहेर सोडू नये. त्यांना थंड सावली असलेल्या ठिकाणीच बांधावे, त्यांच्या अंगावरती किमान दिवसातून दोन ते तीन वेळा पाणी टाकावे. तसेच त्यांना पिण्यासाठी २४ तास जास्त प्रमाणात पाणी उपलब्ध करून द्यावे, जेणे करून ते आपल्या शरीरातील तापमान संतुलित ठेवू शकतील. बैलांकडून‎ शेतीच्या मशागतीची कामे शक्यतो‎ सकाळी व संध्याकाळी कमी उन्हात‎ करून घ्यावीत.- डॉ. सुरेखा माने, पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद

टॅग्स :Heat Strokeउष्माघातAurangabadऔरंगाबादAgriculture Sectorशेती क्षेत्र