शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बरसो रे मेघा़़़ बरसो रे़़़

By admin | Updated: June 25, 2014 01:04 IST

लातूर : लातूर जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र पाच लाख ९५ हजार हेक्टर आहे़ आद्रा नक्षत्रात झालेल्या पावसावर देवणी ,निलंगा, शिरूर अनंतपाळ या तालुक्यातील शंभर हेक्टरवर पेरणी झाली़

लातूर : लातूर जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र पाच लाख ९५ हजार हेक्टर आहे़ आद्रा नक्षत्रात झालेल्या पावसावर देवणी ,निलंगा, शिरूर अनंतपाळ या तालुक्यातील शंभर हेक्टरवर पेरणी झाली़ परंतु, आर्द्रा नक्षत्र सुरू होऊन दोन दिवस झाले तरी दमदार पाऊस जिल्ह्यतील इतर तालुक्यात झालेला नाही़ दिवसा ढगाळ वातावरण व रात्री पाऊस होण्याऐवजी टिपूर चांदणे पडत असल्यामुळे जिल्हाभरातील शेतकऱ्यांच्या नजरा मात्र वरूणराजाच्या आगमनाकडे लागल्या आहेत़ लातूर जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र पाच लाख ९५ हजार हेक्टर आहे़ आद्रा नक्षत्रात झालेल्या पावसावर देवणी, निलंगा, शिरूर अनंतपाळ या तालुक्यातील शंभर हेक्टर वर पेरणी झाली परंतु पुरेशा आद्रार नक्षत्र सुरू होऊन दोन दिवस झाले तरी दमदार मोठा पाऊस जिल्ह्यातील इतर तालुक्यात झालेला नाही़दिवसा ढगाळा वातावरण व रात्री पाऊसा ऐवजी टिपूर चांदणे पडत असल्यामुळे जिल्हाभरातील शेतकऱ्यांच्या नजरा मात्र वरूणराजाच्या आगमणाकडे लागल्या आहेत लातूर जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीन, ज्वारी, बाजरी, मूग ,उडीद, तूर, मका, साळ, भुईमूग, सूर्यफूल इ. पिकांचा समावेश आहे़ जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र ५ लाख ९५ हजार हेक्टर कार्यक्षेत्र आहे़ जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीची कामे केली़ तसेच खता बियाणाचेही नियोजन केले मृग नक्षत्रात २० जुन रोजी लातूर जिल्ह्यातील लातूर, रेणापूर, औसा, अहमदपूर, उदगीर, जळकोट, चाकूर आदी तालुक्यात रिमझीम पाऊस झाला तर निलंगा, देवणी, जळकोट, शिरूर अनंतपाळ या तीन तालुक्यात दमदार पाऊस झाल्याने झालेल्या पावसावर बळीराजांने काळ्या आईची ओटी भरली परंतू आर्द्रा नक्षत्र कोरडे जात असल्याने व पावसाने हुलकावणी दिल्यामुळे शेतकऱ्यांचा नजरा आता मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत़ कृषी तज्ज्ञांच्या सल्यानुसार जूनअखेरपर्यत पाऊस पडला तरी शेतकऱ्यांचा पेरण्या वेळेवर होतील त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करू नये असेही त्यांनी सांगितले़ मृग नक्षत्राच्या सुरूवातील १०:२६:२६़, डी़एपी, १८:१८:१०, १४:३५:१४, १२:३२:१६ यासह इतर खताचीही मोठ्या प्रमाणात विक्री झाली परंतू नंतरच्या कालावधीत वरूनराजाच्या लांबण्यामळे खतविक्रीची ७० टक्के उलाढाल ठप्प झाली आहे़ तर बियाणाच्या ३० टक्के उलाढाल ठप्प झाली आहे़परिणामी खते, बियाणेधारक व्यापाऱ्यासह बळीराजा चिंतातुर झाल्याचे दिसून येत आहे़१०० हेक्टरवर पेरणी़़़जिल्हाभरात ५ लाख ९५ हेक्टर टक्के खरिपाचे क्षेत्र असतांनाही अल्पशा पावसामुळे निलंगा, शिरूर अनंतपाळ,देवणी या तालुक्यातील शंभर हेक्टरवर पेरणी झाली परंतु उर्वरित रेणापूर, लातूर, औसा, अहमदपूर, उदगीर, जळकोट, चाकुर या तालुक्यात मोठा पाऊस न पडल्यामुळे अध्यापही ५ लाख हेक्टर क्षेत्र अध्यापही उजाड असलेले दिसून येत आहे़ त्यामुळे पावसाच्या आगमनाची शेतकरी वाट पाहत आहेत़ खत व बियाणे विक्रीवर परिणाम़़़शेतकरी सुखी तर जग सुखी या उक्तीनुसार पाऊस न पडल्यामुळे पेरणीयोग्य पावसाच्या प्रतिक्षेत बळीराजा आहे़तर पाऊस न पडल्यामुळे खते बियाणाच्या दुकानावर गर्दी नसल्यामुळे खताची ९० टक्के उलाढाल ठप्प आहे तर बियाणाची ३० टक्के उलाढाल ठप्प झाली आहे़मृग नक्षत्र संपला आद्रा सुरू झाले तरी म्हणावा तसा पाऊस झालेला नाही़उशीरा होणाऱ्या पावसामुळे सुयफुल, मका,तुर आदी पिकावर परिणाम होणार नाही पंरतू खरिपाच्या इतर पिकावर मात्र या पावसाचा परिणाम असून उशीरा पेरणी झालेल्या पिकांच्या उत्पादनात मात्र मोठी घट होणार असल्याचे जिल्हा कृषी विकास अधिकारी मोहन भिसे यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले