शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
4
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
5
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
6
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
7
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
8
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
9
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
10
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता
11
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
12
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
13
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
14
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
15
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
16
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
17
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
18
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
19
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
20
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."

‘मतांचं विभाजन टाळा... भाजप-सेनेला पाडा’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 23:37 IST

औरंगाबाद : ‘लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याची तयारी सुरू आहे. २८ फेब्रुवारी रोजी ही घोषणा होईल. त्यादृष्टीने कामाला ...

ठळक मुद्देअशोकराव चव्हाण : राजीव गांधी स्टेडियमवरील जाहीर सभेत आवाहन

औरंगाबाद : ‘लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याची तयारी सुरू आहे. २८ फेब्रुवारी रोजी ही घोषणा होईल. त्यादृष्टीने कामाला लागा. मतांचं विभाजन टाळा आणि भाजप- सेनेला पाडा,’ असे कळकळीचे आवाहन आज येथे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी केले.ते राजीव गांधी स्टेडयमवरील जाहीर सभेस संबोधित करीत होते. तब्बल अर्धा-पाऊण तासाच्या भाषणात चव्हाण यांनी केंद्र व राज्य सरकारवर चौफेर टीका केली.हात जोडून विनंतीभाषणाच्या शेवटी अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांना उद्देशून ते म्हणाले की, ‘वंचित बहुजन आघाडीला माझी हात जोडून विनंती आहे की, भाजपला मदत होईल, असे काही करू नका. कृपया आपण सर्व जण एकोप्यानं राहूया. केवळ ३० टक्के मतांवर भाजपचं सरकार आलेलं आहे. उर्वरित ७० टक्के मते आता एकसंध राहिली पाहिजेत. मतांचं विभाजन टाळावं यासाठीच मी स्वत: प्रकाश आंबेडकर यांच्या घरी एकदा नव्हे, तर पाच वेळा गेलो. तशी जागावाटपाचीही फार मोठी गोष्ट नाही. स्वत: प्रकाश आंबेडकर हे खासदार बनावेत, ही आम्हा सर्वांचीच इच्छा आहे, असे त्यांनी जाहीरपणे नमूद केले.काँग्रेस आरएसएसच्या बाजूचा कसा असू शकतो?सभा संपल्यानंतर माध्यमांनी विचारले असता, अशोक चव्हाण यांनी सवाल उपस्थित केला की, काँग्रेस आरएसएसच्या बाजूचा कसा असू शकतो? काँग्रेस आरएसएसच्या विरोधात काल होता, आज आहे आणि उद्याही राहील. महात्मा गांधी यांच्या काळापासून काँग्रेसची आरएसएसविरोधी भूमिका स्पष्टपणे राहत आली आहे. त्यामुळे काँग्रेसची आरएसएसच्या संदर्भात लेचीपेची भूमिका असण्याचे कारणच नाही. उलट प्रकाश आंबेडकर यांच्यासह आरएसएसविरोधी सर्व शक्तींनी एकत्रित येण्याची आणि आरएसएसविरोधी लढा उभा करण्याची गरज आहे.प्रकाश आंबेडकर यांच्या निरोपाची वाट पाहत आहोत. त्यांचा निरोप येत नसल्याने काँग्रेस- राष्टÑवादीचे उमेदवार जाहीर करावयाचे थांबले आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले.संविधान बचाव... देश बचाव अशी घोषणा यावेळी माजी खा. एकनाथ गायकवाड यांनी दिली. बाबा सिद्दीकी यांनी ‘हमने बिखर के खुदको तमाशा बना दिया’ अशी आठवण करून दिली. आ. सुभाष झांबड यांनी मनपाच्या कारभारावर सडकून टीका केली. नामदेव पवार यांचेही घणाघाती भाषण झाले. त्यांनी ‘भावी मुख्यमंत्री... अशोक चव्हाण’ आणि या राज्याचा मुख्यमंत्री कसा असावा... अशोक चव्हाणांसारखा’ अशी घोषणा उपस्थितांकडून वदवून घेतली. प्रारंभी अशोक चव्हाण यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. आज माता रमाई यांची जयंती असल्याने त्यांनाही अभिवादन करण्यात आले.अशोक चव्हाण येण्यापूर्वी, मिलिंद पाटील, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुरेखा पानकडे, शहराध्यक्षा सरोज मसलगे पाटील, रेखा जैस्वाल, बाबा तायडे, डॉ. पवन डोंगरे, रवींद्र बनसोड, विलासबापू औताडे, इब्राहिम पठाण, केशवराव पा. तायडे आदींची भाषणे झाली. मंचावर माजी आमदार डॉ. कल्याण काळे, नितीन पाटील, प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस सुनीता तायडे- निंबाळकर, सचिव मीनाक्षी बोर्डे- देशपांडे, मोटेभाभी, अशोक सायन्ना, नारायणअण्णा सुरगोणीवार आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.अब की बार... आपटी मार..अबकी बार बस कर यार, अबकी बार काँग्रेस सरकार, अबकी बार आपटी मार, असे घोषवाक्य अशोकराव चव्हाण सादर करीत होते, तेव्हा त्यांना चांगला प्रतिसाद मिळत होता. मराठवाडा पोरका झाला आहे. पालकमंत्री फक्त झेंडावंदनाच्या वेळेस येतात. एरव्ही मराठवाड्याच्या हालअपेष्टा बघायला कुणाजवळ वेळ नाही. मुख्यमंत्र्यांना तर अजिबात वेळ नाही. कारण ते क्रिकेट खेळण्यात आणि विरोधकांना कुत्रे- मांजरे अशी उपमा देण्यात दंग आहेत; पण हेच कुत्रे-मांजरे यांच्या गळ्याचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. लोकांना पाहिजेत चारा छावण्या आणि यांनी सुरू केल्या डान्सबार लावण्या या त्यांच्या वाक्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. मराठा आरक्षण ही काही सरकारची मेहरबानी नाही. त्यासाठी सकल मराठा समाजाला दबाव निर्माण करावा लागला. ५८ मोर्चे काढावे लागले; पण लागू झाले का मराठा आरक्षण? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :PoliticsराजकारणAshok Chavanअशोक चव्हाण