शहरं
Join us  
Trending Stories
1
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
2
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
3
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
4
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
5
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
6
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
7
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
8
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
9
शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला
10
क्रिकेटरशी जोडलं नाव, आता करोडपती यूट्युबरची बायको होणार 'ही' अभिनेत्री? लग्नाची रंगली चर्चा
11
मोठी कारवाई! TMCच्या कार्यालयावर छापे; सरकारी जमिनीची कागदपत्रे, १००हून अधिक आधार कार्ड जप्त
12
लोकसंख्या वाढीसाठी चंद्राबाबू नायडूं यांची मोठी घोषणा! तिसऱ्या आणि चौथ्या अपत्यासाठी सुरू केली 'कॅश ऑफर' योजना! कारण काय?
13
लातूर ते पुण्याची 'ती' बिल्डिंग... नीट पेपर फोडण्यासाठी विषयांची वाटणी, प्राध्यापिका CBIच्या ताब्यात
14
Virat Kohli : किंग कोहलीचा विक्रमी धडाका! IPL इतिहासात कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं
15
Mouni Roy : संसार मोडल्यावर मौनी रॉय आणि दिशा पाटनी रिलेशनशिपमध्ये? जाणून घ्या, व्हायरल पोस्टचं 'सत्य'
16
आयडियाची कल्पना! सूट-बूट घालून विकतोय फ्राईड राईस; दरमहा ७ लाखांची कमाई
17
पंतप्रधान मोदी यांचा ८ वर्षांनी स्वीडन दौरा; व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण मुद्द्यांवर चर्चा
18
Summer Tips: उन्हाळ्यात लोक टक्कल का करतात? जाणून घ्या त्यामागील आरोग्यदायी फायदे!
19
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर ST खोल खड्ड्यात कोसळली, २५ प्रवासी थोडक्यात बचावले
20
मुलीचं मौन म्हणजे 'कबूल है-कबूल है-कबूल है...!' अफगाणिस्तानात तालिबानची बालविवाहाला मंजूरी
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत हवी फर्निचरची उद्यमनगरी

By admin | Updated: August 25, 2014 00:16 IST

नजीर शेख,औरंगाबाद जागा असेल तेथे फर्निचर उद्यमनगरी निर्माण करायला हवी, असे मत शेख आसेफ यांनी मांडले.

नजीर शेख,औरंगाबाद
आपल्या शहरातील व्यवसायाचा विचार केल्यास फर्निचर उद्योग हा आकार घेत असून आता शहरात किंवा शहर परिसरात जागा असेल तेथे फर्निचर उद्यमनगरी निर्माण करायला हवी, असे मत फर्निचर व्यावसायिक शेख आसेफ यांनी मांडले.
फर्निचर व्यवसायातील अनेक कुशल कारागीर आपल्या शहरात असल्याचे शेख आसेफ यांनी यावेळी सांगितले. ‘माझ्या शहरात काय हवे?’ यासंदर्भात ते म्हणाले की, फर्निचर विक्री आणि फर्निचर उत्पादन या दोन्ही गोष्टी आपल्याकडे चालतात. विवाहानिमित्त लागणारे, आॅफिस फर्निचर, बेड, इंटेरिअर, खिडक्या, दरवाजे, शालेय फर्निचर, हॉस्पिटल फर्निचर, उद्योगांसाठी लागणारे पायलट बॉक्सेस आदींची शहरात विक्री आणि उत्पादन होते. यामध्ये स्टील आणि लाकडी (वूडन) असे दोन्ही प्रकार आहेत.
शहरात फर्निचरची सुमारे १५० दुकाने असून या सर्वांची मिळून वार्षिक उलाढाल ही सुमारे सत्तर कोटींच्या आसपास असावी. एवढा मोठा व्यवसाय या शहरात विस्तारला आहे.
गेल्या काही वर्षांत नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावला आहे, तसेच शहर आणि परिसरात नव्याने घरांची निर्मिती होत आहे. त्यामुळे नव्या घरांमध्ये नवे फर्निचर लागतेच त्यामुळे शहरात हा उद्योग वाढत आहे. शहरात अनेक ठिकाणी फर्निचर निर्मितीचे काम चालते. यामध्ये स्टीलचे फर्निचर हे छोट्या छोट्या कारखान्यांमध्ये तर लाकडी फर्निचर हे मिळेल त्या जागेत तयार केले जाते. या व्यवसायात अडीचशेच्या वर स्थानिक कारागीर आहेत.
शिवाय, राजस्थान, उत्तर प्रदेश आदी राज्यांतून घरी, बंगल्यांमध्ये जाऊन फर्निचर तयार करणारे कारागीर वेगळेच आहेत. यामुळे ही संख्या आणखी वाढू शकते. या व्यवसायाचा हा पसारा असला तरी या व्यवसायाला म्हणून काहीच सवलती नाहीत. त्यामुळे केवळ फर्निचर व्यवसायासाठी औरंगाबादमध्ये उद्यमनगरी उभी राहिल्यास काही प्रमाणात सवलती मिळू शकतील व या व्यवसायाला उभारी मिळेल.
आपल्याकडे चीनमध्ये तयार होणारे फर्निचरही मोठ्या प्रमाणावर येत आहे. त्याची किंमतही कमी असते. चीनमध्ये लघु उद्योजकांना सवलती आणि प्रोत्साहन आहे. आपल्याकडे तसा प्रकार नाही. यामुळे काही सवलती देऊन फर्निचर तयार करण्याच्या उद्योगाला चालना द्यायला हवी. आपल्याकडे लाकडी खुर्च्या, दरवाजे आणि सोफे तयार करणारे कुशल कारागीर आहेत.
याठिकाणचे फर्निचर संपूर्ण मराठवाड्यात, तसेच बाहेरही जाते. औरंगाबादच्या तयार केलेल्या वस्तू इतर ठिकाणीही पसंत पडत आहेत. त्यामुळे या उद्योगाचा येथे आणखी विस्तार होऊ शकतो.