शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

औरंगाबादेत कचऱ्याला ७८४ वेळेस लागली आग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 8:31 PM

शहरात मागील १५ महिन्यांपासून कचराकोंडी निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देशहरातील कचरा आग लावून होतो नष्ट सफाई कर्मचारीच कचऱ्याला लावतात आग 

औरंगाबाद : शहरात मागील १५ महिन्यांपासून कचराकोंडी निर्माण झाली आहे. अग्निशमन विभागाला दररोज दोन ते तीन ठिकाणी कचऱ्याला लागलेली आग विझविण्यासाठी जावे लागते. मागील दहा महिन्यांत अग्निशमन विभागाने तब्बल ७८४ ठिकाणी आग विझविल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

१६ फेब्रुवारीपासून २०१८ पासून नारेगावसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी कचरा डेपोसमोर आंदोलन केले. महापालिकेची वाहने अडवून धरली. नंतर त्यांनी नारेगाव येथे कचरा टाकणे बंद करेपर्यंत माघार घेतली नाही. ग्रामस्थांची ही लढाई न्यायालयापर्यंत गेली. शेवटी न्यायालयानेही पालिकेला नारेगाव येथे कचरा टाकण्यास बंदी घातली. त्यामुळे शहरात कचराकोंडी निर्माण झाली आहे. त्यानंतर शहरात कचऱ्याचे हजारो डोंगर तयार झाले होते. या कचऱ्याला मनपा कर्मचारीच आग लावत होते. पोलीस बंदोबस्तात मिटमिटा भागात कचरा टाकण्याचा प्रयत्न झाला. नागरिकांनी दंगल घडवून आणली. या घटनेत अग्निशमन विभागाचे नवीन वाहन जळून खाक झाले. येथील जाळपोळीची घटना घडल्यानंतर राज्यभरात औरंगाबादचा कचरा प्रश्न पोहोचला. 

विधानसभेतही याचे पडसाद उमटल्यानंतर विभागीय संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली. समितीने हर्सूल, चिकलठाणा, पडेगाव व कांचनवाडी या चार ठिकाणी कचरा टाकण्यास मनपाला मुभा दिली. तसेच या ठिकाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचेही बजावले. मात्र, वर्ष उलटले तरी पालिकेने अद्याप प्रक्रिया केंद्र सुरू केले नाही. त्यामुळे शहरातील कचराकोंडी आजही कायम आहे. शहरात जागोजागी कचरा साचत असल्याने नागरिकांकडून त्यास आग लावण्याचे प्रकार घडत आहेत. मध्यंतरी तर कचरा कमी करण्यासाठी पालिकेचे सफाई कर्मचारीच कचऱ्याच्या ढिगारांना आग लावत असत्याचे समोर आले होते. मागील दहा महिन्यांत अशाप्रकारे शहरात ७८४ ठिकाणी कचऱ्याला आग लावण्यात आल्याचे अग्निशमन विभागाने दिलेल्या अहवालातून समोर आले आहे. 

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfireआग