शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

औरंगाबादमध्ये सैराटची पुनरावृत्ती! प्रेमविवाह करणाऱ्या बहिणीचं मुंडकं धडावेगळं केलं

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2021 5:13 PM

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन भावाला आणि त्याच्या आईला ताब्यात घेतलं आहे.

औरंगाबाद: महाराष्ट्रात ऑनर किलींगची घटना घडली आहे. प्रेम विवाह केल्यामुळे अल्पवयीन भावाकडून मोठ्या बहिणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. यादरम्यान तरुणीच्या पतीने पळ काढल्यामुळे त्याचा जीव वाचला. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात सैराटची पुनरावृत्ती झाली आहे. प्रेमविवाह केला म्हणून सख्या भावानेच 19 वर्षीय बहिणीची गळ्यावर कोयत्याचे वार करुन निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात तरुणीचे मुंडकेच धडावेगळे झाल्याची माहिती आहे. वैजापूर तालुक्यातील लाडगाव शिवारात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुळचा गोयेगाव येथील रहिवाशी आहे. बहिणीला भेटण्यासाठी तो आपल्या आईसोबत रविवारी लाडगावला गेला होता. यावेळी त्याने रागाच्या भरात आपल्या सख्ख्या बहिणीवर कोयत्याने वार केला.

नेमकं काय घडलं ?पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, किशोरी मोटे(19)असे हत्या झालेल्या विवाहीतेचे नाव आहे. किशोरीने सहा महिन्यापूर्वी पुण्यातील आळंदी येथे प्रेमविवाह केला होता. काही दिवसांपूर्वीचे ती आपल्या पतीसोबत लाडगाव शिवारात राहण्यासाठी आली होती. याची माहिती मिळताच भावाने आईसोबत लाडगाव गाठले. यावेळी बहिणीला पाहून त्याला राग अनावर झाला आणि त्याने कोयत्याने बहिणीच्या गळ्यावर सपासप वार केले.  हा सर्व प्रकार पाहून किशोरीच्या पतीने पळ काढला आणि आपला जीव वाचवला. शेजारील काही लोकांना या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी आरोपी भाऊ आणि आईला ताब्यात घेतले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस