शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत राष्टवादीला जिल्हाध्यक्ष मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 23:42 IST

राष्टÑवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील आले तरी औरंगाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षाच्या नियुक्तीला मुहूर्त लागेना. त्यामुळे या पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्यांचा हिरमोड न झाल्यास नवल.

ठळक मुद्देपक्षसंघटनाही ढासळली : कोट्यवधींच्या राष्टÑवादी भवनातही सामसूमच

स. सो. खंडाळकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राष्टÑवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील आले तरी औरंगाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षाच्या नियुक्तीला मुहूर्त लागेना. त्यामुळे या पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्यांचा हिरमोड न झाल्यास नवल.वैजापूरचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर हे राष्टÑवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असून नसल्यासारखे आहेत. २०१९ च्या निवडणुका जवळ येत असल्याने त्यांना त्यांच्या मतदारसंघातच लक्ष घालायला वेळ कमी पडतो. त्यामुळे मला मतदारसंघातच लक्ष घालू द्या, असा आग्रह त्यांनी आज नव्हे तर फार पूर्वीपासूनच धरून जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी टाळली आहे. सुनील तटकरे अध्यक्ष होते, तेव्हापासूनच ते जिल्हाध्यक्ष असून नसल्यासारखे आहेत. स्वत: अजित पवार यांनी येऊन हडकोतील राष्टÑवादी भवनात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. तेव्हापासून नव्या अध्यक्षाच्या नियुक्तीला मुहूर्त लागतच नाही. सुनील तटकरे गेले, आता जयंतराव पाटील नवे प्रदेशाध्यक्ष बनले. ते जाणकार व अभ्यासू म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या असतानाच अद्याप नव्या जिल्हाध्यक्षाच्या नियुक्तीला मुहूर्त लागत नाही. त्यामुळे इच्छुकांची घालमेल वाढली आहे.आमदार जिल्हाध्यक्ष असल्यास कामे होण्यात अडचणी येत नाहीत, हे धोरण अजित पवारांचे होते. त्यातून पूर्वी संजय वाघचौरे व आता भाऊसाहेब चिकटगावकर यांच्या गळ्यात ही माळ पडली होती. परंतु आमदार आधी आपल्या मतदारसंघाकडे लक्ष देतो व फार कमी वेळ संघटनेला देतो, असेच सिद्ध झाल्याने हा प्रयोग फसला असेच म्हणावे लागेल.सुधाकर सोनवणे यांचा कार्यकाळ तसा उल्लेखनीयच राहिला. विविध आंदोलने, राजकीय घडामोडी, निवडणुकांमध्ये राष्टÑवादी काँग्रेसचा बोलबाला असायचा. आता जणू औरंगाबाद जिल्हा राष्टÑवादीच्या नेत्यांनी वाऱ्यावरच सोडून दिला असल्याचे जाणवत आहे. अलीकडे झालेल्या विविध निवडणुकांमध्ये राष्टÑवादी काँग्रेसचा परफॉर्मन्स नगण्य राहिला आहे. राष्टÑवादी भवनातील चहलपहलही कमी झाली आहे. या पार्श्वभूमीवर सक्षम जिल्हाध्यक्षांची नियुक्ती लवकरात लवकर होईल काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.नावे नुसतीच चर्चेतभाऊसाहेब पाटील चिकटगावकर, संजय वाघचौरे व सुधाकर सोनवणे यांना सोडून रंगनाथ काळे, विलास चव्हाण, माजी आमदार कैलास पाटील गंगापूरकर, पांडुरंग तांगडे पाटील ही नावे पूर्वीपासूनच स्पर्धेत आहेत. यापैकी कोण अध्यक्ष होणार ही उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. जयंतराव पाटील यांना भेटून आलेल्या इच्छुकांच्या अपेक्षा वाढल्या असल्या तरी अजित पवार यांच्या मनात नेमके कोण आहे व काय आहे, यावरच सारे अवलंबून आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAurangabadऔरंगाबादPoliticsराजकारण