शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

औरंगाबाद मनपाकडून कचरा वर्गीकरणासाठी एक हजार कर्मचारी नियुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 11:43 IST

तब्बल एक हजार कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करण्यावर भर देण्यात येणार आहे.

ठळक मुद्देशहरात मागील पाच महिन्यांपासून कचराकोंडी सुरू आहे. महापालिका प्रशासनाने सोमवारी प्रत्येक निवडणूक वॉर्डासाठी १० कर्मचारी नियुक्त केले.

औैरंगाबाद : शहरातील कचरा कन्नड तालुक्यात नेऊन प्रक्रिया करण्याचा प्रयोग राजकीय सूडबुद्धीने हाणून पाडण्यात आला. शहरातील कचराकोंडी फुटू नये असे वाटणाऱ्यांचे पितळही यानिमित्ताने उघडे पडले. शहरात २५ हजार मेट्रिक टन कचरा असून, महापालिका प्रशासनाने सोमवारी प्रत्येक निवडणूक वॉर्डासाठी १० कर्मचारी नियुक्त केले. तब्बल एक हजार कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करण्यावर भर देण्यात येणार आहे.

शहरात मागील पाच महिन्यांपासून कचराकोंडी सुरू आहे. १५१ दिवसांपासून शहरातील १५ लाख नागरिक कचऱ्याची दुर्गंधी, त्यातील अळ्या, माशांचा प्रादुर्भाव मुकाटपणे सहन करीत आहेत. महापालिका प्रशासन कचराकोंडी तूर्त कशी फुटेल, नागरिकांचे आरोग्य अबाधित कसे राहील यादृष्टीने कोणतेच प्रयत्न सुरू केलेले नाहीत. शहरातील कचराकोंडी फोडण्यासाठी कन्नडचे आ. हर्षवर्धन जाधव यांनी पुढाकार घेतला. महापालिका प्रशासनाने जिल्हाधिकारी, तहसीलदार यांची परवानगी मिळवून पिशोर येथील सहकारी साखर कारखान्याच्या पडीक जागेवर रविवारी २० ट्रक कचराही टाकला. प्रखर विरोध, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झालेला नव्हता. स्वत: आ. जाधव समोर उभे राहून मनपाचे ट्रक रिकामे करून घेत होते. अचानक महापालिकेने कचरा टाकण्याची मोहीम थांबविली. कोणाच्या आदेशावरून मोहिमेला पूर्णविराम देण्यात आला हे गुलदस्त्यात आहे.

शहरातील कचरा शहरातच साचून राहावा असे कोणाला वाटते, त्या राजकीय मंडळींवर आ. जाधव यांनी सडकून टीकाही केली. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचे पितळ उघडे पडले. या डॅमेज कंट्रोलसाठी पदाधिकाऱ्यांनी वेगळी शक्कल लढविली. सोमवारी महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक शहरात दाखल होताच सकाळी ९ वाजता एका बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैैठकीत ११५ वॉर्डांमध्ये ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी महापालिकेचे वॉर्डनिहाय दहा कर्मचारी नियुक्त करावेत, असा आग्रह धरण्यात आला. आयुक्तांनीही क्षणार्धात होकार दर्शविला. दुपारी १ हजार कर्मचाऱ्यांच्या वॉर्डनिहाय नियुक्तीचे आदेशही काढण्यात आले. उद्यापासून हे कर्मचारी प्रत्येक वॉर्डात फिरून ओला व सुका कचरा वेगळा करण्यासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत.

रोगराई पसरल्यास जबाबदार कोण?१६ फेबु्रवारीपासून शहरात कचराकोंडी सुरू आहे. मध्यवर्ती जकात नाका, हर्सूल, चिकलठाणा, पडेगाव, कांचनवाडी, औैरंगपुरा आदी अनेक भागांत कचऱ्याचे मोठमोठे डोंगर आहेत. या कचऱ्यावर प्रक्रिया करणे, शहराबाहेर नेऊन खतनिर्मिती करणे, यावर महापालिका प्रशासन अजिबात विचार करायला तयार नाही. कचराकोंडीमुळे शहरात रोगराई पसरल्यास त्याला जबाबादार कोण राहणार आहे.

कर्मचाऱ्यांना दंड लावणारशहरातील प्रत्येक वॉर्डात शंभर टक्के डोअर टू डोअर कलेक्शन झालेच पाहिजे. ओला व सुका कचरा वेगळा करायलाच हवा. रस्त्यावर कोणी कचरा टाकला तर संबधित सफाई कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, वॉर्ड अधिकारी यांना सामूहिकपणे दंड लावण्यात येणार असल्याची घोषणा महापौैर नंदकुमार घोडेले यांनी केली. यानंतरही कामात सुधारणा न झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात येईल. इंदौैर महापालिकेने एक हजार कर्मचारी निलंबित केले होते. त्याच धर्तीवर महापालिका व्यापक उपाययोजना करणार आहे.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद