शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

मनपाचे प्रयोग! भव्य इमारतीसाठी ४० वर्षांपासूनची एका रांगेतील मोजून फक्त तीनच दुकाने पाडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2022 19:23 IST

महापालिकेच्या यंत्रणेला इमारतीसमोरील ३ दुकाने पाडण्यासाठी कोणी प्रवृत्त केले. या कारवाईचा ‘केंद्र’बिंदू कोण यावर मनपाच्या अधिकाऱ्यांनी उघडपणे सांगण्यास नकार दिला.

औरंगाबाद : जवाहर कॉलनी भागातील त्रिमूर्ती चौकापासून हाकेच्या अंतरावरील ३ पक्की दुकाने अतिक्रमण हटाव पथकाने सोमवारी जमीनदोस्त केली. गेल्या तीस-पस्तीस वर्षांपासूनची ही जुनी दुकाने सध्या उभ्या राहत असलेल्या टोलेजंग इमारतीला अडथळा ठरत होती. त्यामुळे न्यायालयाचा आदेश आहे, दुकानांचे बांधकाम अनधिकृत होते, असे म्हणून पाडण्यात आली. तीन व्यापारी व काही कार्यकर्त्यांनी या कारवाईला विरोध केला, परंतु पोलीस आणि प्रशासकीय बळासमोर हा विरोध अल्पावधीचा ठरला. ही दुकाने पाडताना व्यापाऱ्यांच्या कुुटुंबीयांनी केलेला आक्रोश अनेकांच्या हृदयाला भिडला.

जवाहर कॉलनीत सीटीएस क्रमांक १५५१५ येथे लक्ष्मीकांत अनंतराव जोशी यांच्या टोलेजंग इमारतीचे काम सुरू आहे. या इमारतीसमोर मनोज घोडके यांचे इलेक्ट्रीकचे दुकान होते. त्याच्या शेजारीच राजपूत यांची मोबाईल शॉपी आणि घोडके यांचे सुट्या खाद्यतेलाचे दुकान होते. मागील ४० वर्षांपासून हे तिन्ही व्यापारी या दुकानांवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. जोशी यांच्या तक्रारीवरून महापालिकेने अचानक त्यांना दुकाने पाडण्याची नोटीस दिली. व्यापाऱ्यांनी नोटिसीला न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने त्यांना स्थगिती आदेश दिला नव्हता.

महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाच्या पदनिर्देशित अधिकारी सविता सोनवणे, आर. एस. राचतवार, पी. बी. गवळी पोलीस बंदोबस्तासह सोमवारी सकाळी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी व्यापाऱ्यांना बळजबरी दुकाने रिकामी करायला लावली. न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले. न्यायालयाचे आदेश दाखवा, अशी मागणी व्यापारी, उपस्थित कार्यकर्ते राजू साबळे, सुनील सोनवणे यांच्यासह नागरिकांनी केली. मात्र, आदेश न दाखवताच पोलीस बळाच्या मदतीने दुकाने रिकामी करून क्षणार्धात जमीनदोस्तही केली.

मनपा अधिकारी उघडे पडले...या कारवाईनंतर ‘लोकमत’ने मनपा अधिकाऱ्यांकडे कोणत्या न्यायालयाचे आदेश आहेत, त्याची प्रत द्या अशी मागणी केली. मनपा अधिकाऱ्यांनी सारवासारव सुरू केली. विधि सल्लागारांनी न्यायालयाची स्थगिती नसल्याचे कळविले. नगररचना सहसंचालकांनी अनधिकृत बांधकाम म्हणून आम्हाला फाईलवर लिहून दिले. त्यामुळे दुकानांचे बांधकाम अनधिकृत म्हणून आम्ही पाडले, अशी पुष्टी जोडली.

कारवाईचा ‘केंद्र’बिंदू कोण?महापालिकेच्या यंत्रणेला जोशी यांच्या इमारतीसमोरील ३ दुकाने पाडण्यासाठी कोणी प्रवृत्त केले. या कारवाईचा ‘केंद्र’बिंदू कोण यावर मनपाच्या अधिकाऱ्यांनी उघडपणे सांगण्यास नकार दिला. आम्ही फक्त आदेशानुसार कारवाई केली, एवढेच सांगितले.

काय म्हणाले अतिरिक्त आयुक्तप्रश्न- जवाहर कॉलनीत शेकडो दुकानाच्या रांगेतील फक्त तीनच दुकाने पाडण्याचे औचित्य काय?रवींद्र निकम- अनधिकृत म्हणून आम्ही पाडले नाही, रस्त्यात अडसर ठरत होत्या म्हणून पाडल्या.प्रश्न- जेथील दुकाने पाडली त्याच्या आजूबाजूला किमान ५० घरे, दुकाने एका रांगेत आहेत, हीच तीन का?रवींद्र निकम- सरकारी मोजणी केली, नगररचनानेही ही बांधकामे रस्त्यात येत असल्याचा अहवाल दिला.प्रश्न- रस्ताच करायचा तर शेजारील अनधिकृत बांधकामांचे काय?रवींद्र निकम- आमच्याकडे कोणी तक्रारच केली नाही. फक्त याच दुकानांची तक्रार होती.प्रश्न- जोशी यांच्या इमारतीसाठी मनपाने तीन दुकाने पाडली का?रवींद्र निकम- होय, असे म्हणता येईल, आणखी तक्रारी आल्या तर इतरही पाडू.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाEnchroachmentअतिक्रमण