शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

औरंगाबादकरांनी घेतली दंडाची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 12:06 AM

कॅरिबॅग दिसली की, ५ हजार रुपये दंड आकारण्यात येईल. या कारवाईच्या भीतीने घरातील कापडी पिशव्या बाहेर निघाल्या आहेत.

ठळक मुद्देपरिणाम : बाजारपेठेत बहुतांश ग्राहकांच्या हाती आल्या कापडी पिशव्या

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कॅरिबॅग दिसली की, ५ हजार रुपये दंड आकारण्यात येईल. या कारवाईच्या भीतीने घरातील कापडी पिशव्या बाहेर निघाल्या आहेत. रविवारी बाजारपेठेत आलेल्या बहुतांश ग्राहकांच्या हातात पिशव्या दिसून आल्या. दुकानदार कॅरिबॅग देत नसल्याने अनेकांनी नवीन पिशव्या खरेदी केल्या.राज्यभरातील महानगरपालिकेने शनिवारपासूनच प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी सुरू करीत अनेकांवर दंडात्मक कारवाई केली. मात्र, सुस्त औरंगाबाद मनपाने सोमवारपासून कारवाईचा निर्णय घेतला; पण औरंगाबादकरांनी दंडात्मक कारवाईच्या भीतीने का होईना घरात ठेवलेल्या कापडी पिशव्या बाहेर काढल्या. रविवारचा दिवस असल्याने आज बाजारपेठेत ग्राहकांची नेहमीपेक्षा ३० ते ४० टक्क्यांनी गर्दी अधिक होती. ६५ ते ७० टक्के ग्राहकांच्या हातात कापडी, वायरच्या पिशव्या दिसून आल्या. गुलमंडीवरील किराणा दुकानदार ओमप्रकाश ओसवाल यांनी सांगितले की, आम्ही शेंगदाणे, साखर, तांदूळ, साबुदाणा सर्व कागदी पुड्यांमध्ये बांधून देत आहोत. ३० वर्षांपूर्वी आम्ही कागदातच किराणा बांधून देत होतो. पुन्हा आता ते दिवस आले. लोकही स्वीकारत आहेत. औरंगपुरा भाजीमंडीतील सागर पुंड या विक्रेत्याने सांगितले की, आज बहुतांश ग्राहकांनी सोबत कापडी पिशव्या आणल्या होत्या. काही ग्राहकांनीच पिशव्या आणल्या नव्हत्या. त्यांनी वायरच्या पिशव्या खरेदी करून भाज्या घेतल्या. फरसाण विक्रेते पंकज अग्रवाल म्हणाले की, आम्ही फरसाण कागदात बांधून देत आहोत.गुलाबजामून, जिलेबी, रसगुल्ला यासारखे पाकाचे पदार्थ घेण्यासाठी ग्राहकांनी स्वत:हून डबे आणले होते. यामुळे आम्हाला प्लास्टिक बंदीची माहिती देण्याची गरज पडलीनाही.रविवारच्या बाजारातही फरक जाणवलारविवारच्या आठवडी बाजारात बहुतांश भाजी विक्रेत्यांनी कॅरिबॅग देणे बंद केले होते. अनेक ग्राहक पिशव्या घेऊनच आठवडी बाजारात आले होते. भाजी विक्रेते चंदन दारकोंडे म्हणाले की, पूर्वी प्रत्येक फळभाजीसाठी स्वतंत्र कॅरिबॅग द्यावी लागत असे. आज मात्र ग्राहक एकाच पिशवीत गवार, भेंडी, मिरची, बटाटे, लसूण एकत्र नेत होते. काही विक्रेते प्लास्टिकच्या किराणा बॅगमध्ये फुटाणे, खारे शेंगदाणा विकताना दिसले. गांधीनगर रस्त्यावर हातगाडीवरून फळ विकणारेही पपई, अननस कागदात गुंडाळून देत होते. पिशव्या विक्रेते, मेहमूदभाई यांनी सांगितले की, जेथे ६० ते ७० पिशव्या विकल्या जात, तेथे आज दिवसभरात १४२ पिशव्या विकल्या.दुसऱ्या दिवशीही कारवाई शून्यचराज्यात प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी सुरूझाली आहे. राज्यभरातील अनेक जिल्ह्यांत दंडात्मक कारवाई करण्यात आली. मात्र, औरंगाबाद महानगरपालिकेने दुसºया दिवशी एकही कारवाई केली नाही. महानगरपालिकेच्या घनकचरा पथकातील दोन अधिकाºयांनी शहरातील प्लास्टिक विक्रेत्यांना सोमवारपासून कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला होता. यामुळे प्लास्टिक विक्रेतेही आज बिनधास्त दिसून आले.काही प्लास्टिक विक्रेत्यांनी दुकानातील किराणा बॅग, प्लास्टिकच्या अन्य बॅगांचे पॅकिंग करून ठेवणे सुरू केले होते, तर काहींनी दुकानातील प्लास्टिक पिशव्या गोदामात नेऊन ठेवल्या. अनेक विक्रेत्यांच्या दुकानांवर तुरळक खाकी कापडी पाकिटे दिसली. ५० ग्रॅम ते किलोपर्यंत किराणा सामान मावेल, एवढ्या आकारातील ही कागदी पाकिटे होती. मात्र, शहरवासी स्वत:हून प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करताना दिसून आले.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीAurangabadऔरंगाबादMarketबाजार